Friday, September 18, 2026

ज्युदाइक धर्म आणि हिंसा

 ज्युदाइक धर्मामधील पहिली हिंसा श्रीधर तिळवे नाईक 

मी एक गोष्ट नेहमीच सांगत आलेलो आहे की या जुड्या एक धर्मांच्या मध्ये मुळातच फार सुरुवातीपासूनच हिंसा आहे त्याचे एक उदाहरण पुढीलप्रमाणे 

Exodus 32 :28 मध्ये खुद्द मोजेसने जे काही केले आहे त्याची नोंद आपण ज्युदाइक धर्मातला पहिला वायलन्स म्हणून घ्यावी का असा प्रश्न पडतो गोल्डन का फ एपिसोड नंतर घडलेले हे सर्व आहे 

वेगवेगळ्या भाषांतरांच्या मध्ये हेच सांगितलेले आहे म्हणून सर्व पुढे देत आहे 

King James 21

And the children of Levi did according to the word of Moses, and there fell of the people that day about three thousand men.

ASV

And the sons of Levi did according to the word of Moses: and there fell of the people that day about three thousand men.

AMP

So the sons of Levi did as Moses instructed, and about three thousand men of the people [of Israel] were killed that day.

AMPC

And the sons of Levi did according to the word of Moses; and there fell of the people that day about 3000 men.

BRG

And the children of Levi did according to the word of Moses: and there fell of the people that day about three thousand men.

CSB

The Levites did as Moses commanded, and about three thousand men fell dead that day among the people.

CSBA

The Levites did as Moses commanded, and about three thousand men fell dead that day among the people.

CEB

The Levites did as Moses commanded. About three thousand people were killed that day.

CJB

The sons of Levi did what Moshe said, and that day three thousand of the people died.

CEV

The men of the Levi tribe followed his orders, and that day they killed about 3,000 men.

DARBY

And the sons of Levi did according to the word of Moses; and there fell of the people that day about three thousand men.

DRA

And the sons of Levi did according to the words of Moses, and there were slain that day about three and twenty thousand men.

ERV

The people from the tribe of Levi obeyed Moses. That day about 3000 of the people died.

EASY

The Levites obeyed Moses' command. About 3,000 Israelites died on that day.

EHV

The Levites did what Moses said, and that day about three thousand men from among the people fell.

ESV

And the sons of Levi did according to the word of Moses. And that day about three thousand men of the people fell.

ESVUK

And the sons of Levi did according to the word of Moses. And that day about three thousand men of the people fell.

EXB

The ·people from the family [L sons] of Levi obeyed Moses, and that day about three thousand of the Israelites died.

GNV

So the children of Levi did as Moses had commanded: and there fell of the people the same day about three thousand men.

GW

The Levites did what Moses told them, and that day about 3,000 people died.

GNT

The Levites obeyed, and killed about three thousand men that day.

HCSB

The Levites did as Moses commanded, and about 3,000 men fell dead that day among the people.

ICB

The people from the family of Levi obeyed Moses. That day about 3,000 of the people of Israel died.

ISV

The descendants of Levi did just as Moses told them, and about 3,000 people died that day.

JUB

And the sons of Levi did according to the word of Moses, and there fell of the people that day about three thousand men.

KJV

And the children of Levi did according to the word of Moses: and there fell of the people that day about three thousand men.

AKJV

And the children of Levi did according to the word of Moses: and there fell of the people that day about three thousand men.

LSB

So the sons of Levi did according to the word of Moses, and about three thousand men of the people fell that day.

LEB

And the sons of Levi did according to the word of Moses, and from the people on that day about three thousand persons fell.

TLB

So they did, and about three thousand men died that day.

MSG

The Levites carried out Moses’ orders. Three thousand of the people were killed that day.

MEV

The Levites did according to the word of Moses, and about three thousand men of the people died that day.

NOG

The Levites did what Moses told them, and that day about 3,000 people died.

NABRE

The Levites did as Moses had commanded, and that day about three thousand of the people fell.

NASB

So the sons of Levi did as Moses instructed, and about three thousand men of the people fell that day.

NASB1995

So the sons of Levi did as Moses instructed, and about three thousand men of the people fell that day.

NCB

The sons of Levi did as Moses had commanded them. On that day three thousand men from among the people perished.

NCV

The people from the family of Levi obeyed Moses, and that day about three thousand of the Israelites died.

NET

The Levites did what Moses ordered, and that day about 3,000 men of the people died.

NIRV

The Levites did as Moses commanded. About 3,000 of the people died that day.

NIV

The Levites did as Moses commanded, and that day about three thousand of the people died.

NIVUK

The Levites did as Moses commanded, and that day about three thousand of the people died.

NKJV

So the sons of Levi did according to the word of Moses. And about three thousand men of the people fell that day.

NLV

So the sons of Levi did as Moses said. About 3,000 men fell that day.

NLT

The Levites obeyed Moses’ command, and about 3,000 people died that day.

NRSVA

The sons of Levi did as Moses commanded, and about three thousand of the people fell on that day.

NRSVACE

The sons of Levi did as Moses commanded, and about three thousand of the people fell on that day.

NRSVCE

The sons of Levi did as Moses commanded, and about three thousand of the people fell on that day.

NRSVUE

The sons of Levi did as Moses commanded, and about three thousand of the people fell on that day.

OJB

And the Bnei Levi did according to the word of Moshe; and there fell of HaAm that day about three thousand men.

RGT

So, the children of Levi did as Moses had commanded. And about three thousand men of the people fell that day.

RSV

And the sons of Levi did according to the word of Moses; and there fell of the people that day about three thousand men.

RSVCE

And the sons of Levi did according to the word of Moses; and there fell of the people that day about three thousand men.

TLV

So the sons of Levi did as Moses said, and that day from among the people there fell about 3,000 men.

VOICE

The Levites did exactly as Moses told them to do, and about 3,000 men were killed that day.

WEB

The sons of Levi did according to the word of Moses. About three thousand men fell of the people that day.

WYC

And the sons of Levi did by the word of Moses, and as three thousand of men felled down in that day. (And the Levites obeyed Moses, and three thousand men fell down dead that day.)

YLT

And the sons of Levi do according to the word of Moses, and there fall of the people on that day about three thousand men,

 Exodus 32:27

Exodus 32:29

हे सर्व करण्याचे कारण काय तर हे सर्वच्या सर्व लोक पुन्हा एकदा pagan म्हणजेच मूर्ती पूजक झाले होते आणि त्यांनी idolatry चा गुन्हा केला होता 

आता विचार करा मोजेसच्या काळामध्ये 3000 लोक मारले गेले किंवा तशी मोजेस ने ऑर्डर दिली 

बरं हे लोक कोणी परके नव्हते हे मोजेस बरोबर होते आणि तरीसुद्धा त्याने ही आज्ञा दिलेली आहे त्याच्या संतापातून हे घडलेले आहे 

याच्याही आपण मुळात गेलो तर आपणाला आणखी काही गोष्टी सापडायला लागतात मुळातच इथे अशी आहे की खुद्द ईश्वरच खालील प्रमाणे धमकी देत आहे 

Ezekiel 5:17

New International Version

17 I will send upon you famine and evil beasts, and they shall bereave thee; and pestilence and blood shall pass through thee, and I will bring the sword upon thee. I, the Lord, have spoken it.”

ASV

and I will send upon you famine and evil beasts, and they shall bereave thee; and pestilence and blood shall pass through thee; and I will bring the sword upon thee: I, Jehovah, have spoken it.

AMP

Further, I will send against you hunger and wild beasts, and they will bereave you of children; virulent disease and bloodshed also will pass through you, and I will bring the sword on you. I, the Lord, have spoken.’”

आता प्रश्न असा आहे की दैवत जर का दुष्काळ पाठवणारा जनावरे पाठवणारा असेल तर मग देवात आणि माणसांच्यात फरक काय ?

श्रीधर तिळवे नाईक 

 परंपरा म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक 

परंपरा म्हणजे काय ह्या प्रश्नाचा विचार करायचा असेल तर सर्वात प्रथम स्मृती या प्रोसेसचा विचार करावा लागतो कारण स्मृती ठेवण्याची प्रोसेस आपल्या मेंदूमध्ये जिवंत आहे म्हणूनच आपण परंपरेचा विचार करू शकतो . आपल्या परंपरेचे मूळ आपल्या स्मृती ठेवण्याच्या मेंदूच्या सवयी मध्ये आहे.

माणसाच्या स्मृती विषयी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत पण आता मुळातच या संदर्भातले जे विज्ञान आहे तेच प्रमाण मानले जाते आणि मानायला हवे 

सर्वसाधारणपणे आता स्मृतीच्या सहा प्रोसेस आपण स्वीकारायला हव्यात आणि त्यापैकी काही स्वीकारल्याही जातात पहिली चिन्हीकरण म्हणजेच माणसाला जे जे इंद्रियांच्या द्वारे प्राप्त होते ते सर्व तो किंवा त्याचा मेंदू पूर्णपणे स्वतःमध्ये चिन्हीफाय करतो कोडीफाय करतो हे फाय होताना नेमके काय काय घडते हे सांगणे मात्र अलीकडे अधिक गुंतागुंतीचे आणि अजूनही विश्लेषणाला खुले आहे .

दुसरी प्रोसेस अर्थातच अर्थनिर्णयन आहे या प्रोसेसमध्ये जे सर्वच्या सर्व आलेले आहे किंवा इंद्रियांच्या द्वारे किंवा मज्जा संस्थेच्या मार्फत प्राप्त झालेले आहे त्याचे अर्थ निर्णयन केले जाते आणि काय साठवायचे काय नाही कशासाठी साठवायचे का साठवायचे यासारख्या अनेक प्रश्नांचा आदमास घेत आलेला डाटा साठवला जातो अनेकदा त्या डाटावर प्रोसेस सुद्धा होतात जे साठवणे जगण्यासाठी गरजेचे नाही असे मेंदूला किंवा मेंदूतील नियंत्रकाला (मी याला इंग्लिश मध्ये कंट्रोल सेटर म्हणतो) वाटते ते फेकून दिले जाते .

तिसरी प्रोसेस अर्थातच साठवण आहे यामध्ये पूर्णपणे जे जे आवश्यक वाटते ते ते सर्व काही साठवले जाते. साठा करून ठेवणे ही माणसाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच माणूस अनेक गोष्टींचा साठा करत असतो यामध्ये कळत नकळत भविष्यकाळ फार महत्त्वाचा होत जातो कारण साठा हा नेहमी भविष्यकाळाची तरतूद म्हणून केला जातो आपण एखाद्या व्यक्तीची स्मृति जेव्हा साठवतो तेव्हा त्यामागचा उद्देश एकच असतो तो म्हणजे भविष्यात त्या व्यक्तीशी डील करताना व्यवहार करताना भावविवाह करताना आपणाला निर्णय घेता यावेत. माणसाला शेवटी निवड करावी लागते आणि निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला काही गोष्टींची निवड करावी लागते आणि काही गोष्टी सावडून सोडून द्याव्या लागतात . सिलेक्शन ऑफ चॉईस ही एक अपरिहार्य अशी माणसाच्या आयुष्यात असलेली स्थिती असते आणि ती मेंदूमध्ये आणि स्मृतीमध्ये कार्यरत असते . तसे तिला कार्यशील व्हावे लागते . सर्वसाधारणपणे दुःख देणाऱ्या स्मृती या सावधगिरीसाठी म्हणून कधी कधी जिवंत ठेवल्या जातात पण त्या फक्त सावधगिरीला गरजेच्या असलेल्या अंशात्मक भागांना सामावून घेतात आणि ज्या ताप देतात त्यांना फेकून देतात .

चौथी प्रोसेस ही अर्थातच स्मरण किंवा आठवण आहे जर का एखादी गोष्ट समोर आली की आपण ती यापूर्वी आपल्या स्टोरेज मध्ये आहे का नाही याचा पडताळा करतो आणि जर का ती स्मरण साठ्यात असेल तर तिचे कनेक्शन ताबडतोब समोरच्या गोष्टीशी जोडतो त्यामुळे जगण्यात अनेक प्रकारचे येऊ शकत असलेले अडथळे आपणाला टाळता येतात उदाहरणार्थ आपल्याला गोष्टी ओळखणे फार गरजेचे असते आता प्रत्येक वेळेला व्यक्तीसमोर आली की नवी ओळख निर्माण करणे हे अनेकदा वेळ घालवणारे ठरते त्यामुळे साहजिकच असा आपला वेळ जाऊ नये आपले आयुष्य वाया आज जाऊ नये म्हणून मेंदू प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र स्वतःमध्ये आपल्या पद्धतीने तयार करतो त्यामुळेच आपणाला चटकन स्मरण होऊन आपणाला त्या गोष्टीची ओळख ताबडतोब पटते आणि आपण त्याप्रमाणे आपल्या वागण्याची पद्धत ठरवतो 

पाचवी प्रोसेस स्मरणरंजन आहे अनेकदा आपण एकांतात बसलो की आपणाला चांगल्या आणि सुखद वाटणाऱ्या गोष्टींचे स्मरण होते आणि आपण स्वतःच्या सुखद गोष्टींचे रंजन करत बसतो स्मरण सुख आणि स्मरण दुःख यादेखील दोन प्रक्रिया कायमच ऍक्टिव्ह असतात आणि आपण अनेकदा त्यांना कुरवाळत राहतो विशेषता हे एकांतात घडत असते मात्र ते एकांतात घडत असले तरी अनेकदा लोकांच्या लोकांतात सुद्धा स्मरण रंजन नावाचा प्रकार असतो इथे आपण कळत नकळत स्वतःच्या सुखासाठी म्हणून त्या आठवणी कुरवाळत बसतो . कारण ते आपल्याला गोड फील देतात . सार्वजनिक गोड फील आणि गुड फील हा कळत नकळत उत्सवाचा भाग असतो .

याशिवाय स्मृतीची पडताळण ही सहावी प्रोसेस सुद्धा कधी कधी ऍक्टिव्हेट होते कारण आपण नेटवर्किंग करत असताना अनेकदा होते काय की आपला निर्णय चुकलाय असे आपल्या लक्षात येते आणि हा निर्णय का चुकला किंवा हा निर्णय का बरोबर आला किंवा आता पुढचा निर्णय कसा घ्यावा या संदर्भामध्ये ज्या घटना घडून गेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या आपण स्मरणात आणून त्यांची कनेक्शन्स इंटर कनेक्टिव्हिटी या सगळ्यांची पडताळणी करतो या सगळ्याला पडताळण असे म्हणतात उजळणी करताना सुद्धा अनेकदा आपण पडताळणच करत असतो किंबहुना उजळणी केल्याशिवाय पडताळण करता येऊ शकत नाही .

स्मृती ही या सर्व प्रोसेसची बनलेली असते आणि ती बायोलॉजिकल असते जैविक असते आणि त्यामुळेच स्मृतीचा विचार हा सर्वाधिक महत्त्वाचा विचार होय .

स्मृती ही जीवनावश्यक आहे हे एकदा कळाले की मग तिचा विचार करताना आपणाला अनेक गोष्टींचा विचार करता येतो .

माणसाला ज्याप्रमाणे जगण्यासाठी स्मृती आवश्यक असते त्याचप्रमाणे संपूर्ण त्याच्या गणाला स्मृती आवश्यक असते का हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे माणसाला जगताना फक्त स्वतःच्या स्मृतीच नाही तर अनेकदा इतरांच्या स्मृती सुद्धा उपयोगी पडतात म्हणूनच तर आपण अनेकदा दुसऱ्याचा ऑपिनियन दुसऱ्याचे मत विचारतो . विशेषतः काही लोक आपल्याला आपल्यापेक्षा जास्त शहाणे आहेत असे वाटते आणि त्यामुळे आपण त्यांचे मत विचारात घेतो एका अर्थाने ही सुद्धा पडताळणी असते पण या पडताळणी मध्ये आपण इतरांचे स्मृति सहाय्य घेतो आणि त्यांचे अर्थनिर्णन सुद्धा निर्णय करताना विचारात घेतो 

यातूनच मग सामूहिक स्मृती नावाची गोष्ट निर्माण होते आणि खरा गोंधळ तिच्यामुळे चढतो कारण कुठलीही गोष्ट सामूहिक झाली सामाजिक झाली की तिच्या स्वतःच्या म्हणून काही सत्ता तयार होत जातात आणि या सत्ता अनेकदा तुमच्या वैयक्तिक स्मृतींना आणि स्मृती समृद्धींना हानिकारक ठरू शकतात अनेकदा सत्ताधारी या सामूहिक स्मृतींच्या जीवावरच समाजावर राज्य करायला बघत असतात आणि म्हणूनच आपणाला आपल्या स्मृतीचा जितका विचार करावा लागतो तितका सामूहिक स्मृतीचा सुद्धा कधी कधी विचार करावा लागतो .

प्रश्न असा आहे की यांचे स्वरूप नेमके काय आहे तर त्यासाठी आपणाला सामूहिक स्मृतींची कालिक बाजू लक्षात घेतली पाहिजे 

जगामध्ये आत्तापर्यंत ५ महायुगे होऊन गेली आणि यातल्या प्रत्येक महायुगाने स्वतःचे सामूहिक स्मृती म्हणून काही स्मरण जागे ठेवलेले दिसते आणि अनेकदा तर या जागे ठेवण्याची विशिष्ट पद्धत बनलेली दिसते 

यातून अनेकदा काही गुंतागुंतीच्या गोष्टी तयार होतात मुख्य म्हणजे माणसाची वैयक्तिक स्मृती आणि त्याच्या आसपास असणाऱ्या त्याच्या गणाची म्हणजेच राष्ट्राची किंवा जगाची समृद्धी स्मृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का की त्यांच्यामध्ये अद्वैत आहे की द्वैत आहे की पूर्ण भेद आहे ?

माझ्या मते सर्वच्या सर्व अवस्थांची शक्यता असते म्हणजे अद्वैत अभेद विशिष्ट अद्वैत ,विशिष्ट अभेद , युग्म, द्वंद्व भेद ,पूर्ण भेद वगैरे वगैरे ज्यांची चर्चा मी मार्गी आणि देशी या ग्रंथांमध्ये केलेली आहे 

सामूहिक स्मृती आणि वैयक्तिक स्मृती यांचे संबंध कधी सौख्याचे तर कधी ताणलेले राहतात आणि त्यातूनच कधीकधी व्यक्तीचे समाजाशी खटके उडायला लागतात 

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण अधिक परंपरेचा विचार नीट करू शकतो 

स्मृति म्हणजे परंपरा असे मानले जाते काय हा पहिला प्रश्न आहे माझ्या मते परंपरेवर ज्यांनी ज्यांनी गांभीर्याने चर्चा केलेली आहे त्या सर्वांना स्मृती वेगळी आणि परंपरा वेगळी हे मान्य केले आहे 

जर या गोष्टी भिन्न आहेत तर मग त्या नेमक्या काय आहेत असा प्रश्न आपोआपच यातून निर्माण होतो 

माणसाच्या होमोसोपियन या रूपाची उत्क्रांती कशी झाली ते आता तुम्हाला उत्क्रांतीच्या कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळेल आपण याला आदिम महायुग असे म्हणू शकतो आणि त्याची सुरुवात होमो इरेक्टस पासून करू शकतो त्यानंतर मग तो होमो सेपियन म्हणून विकसित झाला आणि ज्याला आता आपण आदिम कालखंड किंवा प्रागेतिहासिक कालखंड म्हणतो तिथे येतो या कालखंडामध्ये आपण असे म्हणू शकतो की चिन्ह व्यवस्था माणूस तयार करायला लागला . एका अर्थाने हा चिन्ह मानवाचा कालखंड आहे जो एकमेकांशी संदेशवहन करत एकमेकांची कॉपी करत एकमेकांना चिन्ह गोष्टी द्यायला शिकला उत्क्रांत होऊ लागला एक प्रकारची संवेदनज्ञानशिलता त्याच्यात विकसित होत गेली आपल्या आजच्या स्मृतीचे मूळ या कालखंडात आहे माणसाच्या आजच्या स्मृतीचे बीज या कालखंडात प्रामुख्याने रुजत गेले . पूर्वीही ते होते परंतु त्याची उगवण्याची क्षमता खूप अल्प होती पण चिन्हव्यवस्थेच्या उदयामुळे हळूहळू गोष्टी लक्षात ठेवणे तो शिकला आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टी इतरांना द्यायला ही शिकल्या .

या आदीम महायुगात त्याला स्वतःची कल्पनाशक्ती सापडली आणि कलेचा उदय झाला कलेमधून हळूहळू शहाणपण , श्रद्धा आणि सत्ता प्रणाली उदयाला आल्या आणि पुढे मग याला शह देण्यासाठी म्हणून मोक्षयुग आले या मोक्ष युगाने श्रद्धांना आव्हान दिले पण राजकीय सत्तांना मोक्ष धोकादायक वाटायला लागल्यामुळे त्यांनी हळूहळू पुन्हा एकदा धर्म नावाची राजकीय विचार प्रणाली निर्माण करून मोक्ष बळकावला आणि श्रद्धा तर त्यांच्याच ताब्यात होती 

यातून एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कला ही स्वतःच परंपरा आहे का ? आणि कला ही जर स्वतःच परंपरा असेल तर मग कलेचे आणि परंपरेचे नाते अद्वैती मानावे का ? 

मोक्षाने केवळ अनुभवाला महत्त्व देण्या ऐवजी विद्यांना सुद्धा महत्त्व द्यायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक विद्या उदयाला आल्या या विद्यांना अनेकदा भारतामध्ये भगवान शंकर जबाबदार आहेत आणि त्यांचा अत्यंत समर्थपणे वारसा चालवला तो त्यांच्या मुलाने ज्याचा उत्सव आता आपण साजरा करणार आहोत आणि तुम्ही लोक सुट्टीवर जाणार आहात 

त्यामुळे साहजिकच जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा आपल्याकडे परंपरेचा विचार अधिक होतो . कारण गणपती हा काही फक्त परंपरेचा देव नव्हे तो विद्येचा देव आहे . साहजिकच गणपतीच्या नावाखाली तुम्ही वाटेल तेवढी बौद्धिक चिकित्सा करू शकता किंवा हाच एक असा काळ असतो ज्या वेळेला भारतामध्ये काही विचारमंथन होण्याची शक्यता असते . त्यामुळेच बापटांच्या सारखे काही विद्वान परंपरेच्या विषयी आपल्याला प्रश्न विचारू शकतात मी पहिल्याच व्याख्यानामध्ये परंपरा शिकणे का आवश्यक आहे ते सांगितले होते याचे कारण परंपरेचा प्रश्न कायमच उत्सव जेव्हा येतो तेव्हा तेव्हा निर्माण होतो 

याचे कारण उघड आहे कारण उत्सव हा नेहमीच परंपरेतून निर्माण होतो 

प्रश्न असा आहे की मग स्मृति वेगळी आणि परंपरा वेगळी असे जर असेल तर इतिहास वेगळा आणि परंपरा वेगळी असे आहे का तर या प्रश्नाचे सुद्धा उत्तर होकारार्थी आहे 

सर्वसाधारणपणे आपण कालखंडाची जेव्हा मांडणी करतो तेव्हा इतिहास पूर्व , प्राचीन, मध्ययुगीन ,अर्वाचीन, आधुनिक आणि उत्तराधुनिक असे युरोपियन लोकांनी स्पॉन्सर केलेले कालखंड आपल्याला सहज माहिती असतात तुमच्यापैकी इतिहास शिकलेल्या लोकांना हे कालखंड नक्की माहिती असतील 

यातील जो उत्तर आधुनिक आणि आधुनिक कालखंड आहे त्याने प्रामुख्याने परंपरेचा विचार पुढे आणला हा विचार का पुढे आणला गेला 

या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला गेलो तर आपण आणखी एका ज्ञानाच्या महायुगात पोहचतो याला ज्ञानाचे महायुग किंवा विज्ञानाचे महायुग म्हणता येते याचे कारण त्या कालखंडाच्या केंद्रस्थानी विज्ञान आहे या विज्ञानयुगामध्ये सुधारणावादी , प्रबोधनवादी , पुरोगामी आणि उत्तर पुरोगामी असे चार कालखंड येतात 

आणि याच कालखंडामध्ये सामूहिक स्मृतीची रचना वैज्ञानिक पद्धतीने करण्याची पद्धत उदयाला आली जिला आपण आता इतिहासाची पद्धत किंवा इतिहास म्हणतो . वैज्ञानिक पुरावे मिळत नाही तोवर त्या भूतकालीन गोष्टीवर किंवा स्मृतीवर विश्वास ठेवायचा नाही असा दृष्टिकोन इतिहासामध्ये असतो . यावर माझे एक पुस्तकच आहे त्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही . चौथी नवता : नवअनियतकालिकांचा इतिहास यामध्ये मी इतिहासाचा सांगोपांग विचार केलेला आहे 

तर परंपरेचा विचार मी अलीकडेच रंगभूमीच्या रंगवाच्या नावाच्या एका नियतकालिकामध्ये मांडलेला आहे तोही तुम्ही पाहायला हरकत नाही 

इतिहासाला शह देण्यासाठी म्हणून आधुनिकतेने परंपरेची संकल्पना पुढे आणली असे म्हटले जाते इतिहास आणि परंपरा यांच्यामध्ये एक मोठा फरक असा असतो की इतिहास भूतकालीन असतो तर परंपरा ही आत्ता वर्तमानात उपस्थित असते जिवंत असते सळसळत असते किंबहुना इतिहास नेहमी मेलेला असतो आणि परंपरा नेहमी जिवंत असते हाच या दोघांच्यातला फरक आहे . विठ्ठल हा इतिहास नाही ती महाराष्ट्राची परंपरा आहे भगवान शंकर हा इतिहास नाही ती भारताची परंपरा आहे कारण वर्तमान काळात सुद्धा ती उपस्थित आहे 

प्रश्न असा आहे की परंपरा काय आहे किंवा हा इतिहास काय आहे याबाबत आधुनिकता असे सांगते की या सर्व कन्स्ट्रक्शन्स आहेत रचना आहेत आणि हा दृष्टिकोन खूप क्रांतीकारक होता याचे कारण असे की आत्तापर्यंत आपण असे समजत होतो की इतिहास म्हणजे वैज्ञानिक सत्य असते. प्रत्यक्षामध्ये आधुनिकतेने आधुनिक इतिहासकारांनी हे सिद्ध केले की प्रत्यक्षात जे जे पुरोगामी कालखंडात इतिहास लिहिले गेले ते सर्वच्या सर्व कन्स्ट्रक्टेड होते रचले गेलेले होते आणि रचणाऱ्या लोकांनी ते अत्यंत पद्धतशीरपणे स्वतःच्या हितसंबंधांच्यासाठीच रचले होते . आपल्याकडे या गोष्टीचा अजूनही पुरेसा प्रभाव पडलेला नाही . आपण इतिहासाबाबत अजूनही पुरेसे आधुनिक झालेलो नाही किंवा उत्तर आधुनिक झालेलो नाही .कारण हे गृहीतक स्वीकारले तर मग फुले आणि आंबेडकर यांनी निर्माण केलेला इतिहास रचलेला इतिहास ठरतो किंवा सावरकर प्रबोधनकार ठाकरे यांनी निर्माण केलेला इतिहास रचलेला इतिहास ठरतो आणि असे रचलेले इतिहास असतील तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात या प्रश्नांना तोंड देण्याची नैतिक ताकद आपल्यामध्ये नसल्यानेच आपण असे प्रश्न उभा करत नाही आपण पुरोगामी वादामध्ये जास्तीत जास्त घोटमळत राहतो आणि इतरांना सुद्धा तसेच घोटमळत ठेवतो आधुनिक तिच्या दृष्टिकोनातून मात्र हे सर्व इतिहास रचलेले इतिहास आहेत आणि असे सर्व रचलेले इतिहास विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधातून निर्माण होतात अशी आधुनिकतेची धारणा आहे साहजिकच या लोकांनी आपले इतिहास रचले तेव्हा त्यांचे काय प्रकारचे हितसंबंध गुंतलेले होते ते हे आता तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे पण अशा प्रकारचे धाडस दाखवले जात नाही याचे कारण फुले किंवा आंबेडकर यांची अशा प्रकारची आधुनिक चिकित्सा कोणीही करू इच्छित नाही सर्वजण पुरोगामी होण्यातच धन्यता मानत आहेत .

साहजिकच भारतामध्ये आता परंपरेचा विचार करताना ही परंपरा नेमकी कशी रचली गेली कोणी रचली तिच्यामध्ये कसे कोणी कोणी कसे फेरफार घडवले यामागे कोणाकोणाचे कसे हितसंबंध गुंतलेले होते अशा प्रकारचे प्रश्न आपण उपस्थित करत आहोत . परंपरा ही जर कन्स्ट्रक्टेड असेल तर मग अशा प्रकारचे विश्लेषण अपरिहार्य आहे .

एका अर्थाने संपूर्ण परंपराच आपण विश्लेषणाच्या चौकटीत आणू पाहतो आहोत चौकटीत आणायला पाहतो आहोत कारण आता आपण एका उत्तर आधुनिक कालखंडामध्ये जगत आहोत . उत्तर आधुनिकता इतिहासाच्या केवळ रचनेकडे फक्त लक्ष देत नाही तर ती त्या इतिहासाची त्या भूतकाळाची त्या स्मृतीची विरचना करते आधुनिकता रचना असेल तर उत्तराधुनिकता विरचना आहे. साहजिकच खंडी खंडी करणे खांडोळी करणे हे वीरचनेच्या तत्त्वांमध्ये बसत असल्याने ते आता खूप प्रचलित होताना दिसते आणि आवेशगिरी वाढताना दिसते .

प्रश्न असा आहे की रचनेमध्ये वैज्ञानिक सत्य असते की नाही तथ्य असते की नाही असले तर त्याचे काय प्रमाण असते हे आपण पाहणार आहोत की नाही की वैज्ञानिक पुराव्यांच्याकडे पाठ करून आपण परंपरांची फक्त खोटी कन्स्ट्रक्शन तयार करणार आहोत ? चौथ्या नवतेमध्ये आता फक्त आधुनिक रचना आणि उत्तर आधुनिक विरचना येत नाही तर वैज्ञानिक चिकित्सा पण येते इतिहास सुद्धा पुन्हा येतो जो इतिहास मेलेला होता तो चौथ्या नवतेने पुन्हा जिवंत केलेला आहे मात्र जिवंत करताना जे रचले गेलेले इतिहास होते ते नेमके कोणी रचले कसे रचले का असले यांचे विश्लेषण करावे लागते हे करत असतानाच त्या सर्व इतिहासांच्या मध्ये जे जे वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे सिद्ध होणारे आहे त्याला स्वीकारण्याची तयारी आपण केली पाहिजे असे चौथी नवता सांगते. इथे इतिहास एक जालना आहे . म्हणजेच आता वर्तमान काळामध्ये आपण हळूहळू इतिहासाकडून रचनेकडे रचने कडून वीरचनेकडे आणि वीरचने कडून आपण चौथ्या नवतेमध्ये जालनेमध्ये आणि उत्तर जालनेमध्ये दाखल झालेलो आहोत . 

स्मृतींचा मुख्य उद्देश हाच मुळात कनेक्टिव्हिटी जिवंत ठेवणे हा असतो . त्यामागे सुरक्षिततेचा उद्देश असतो . प्रत्येक मेंदू स्वतःला आणि स्वतःच्या जीवाला शाबूत ठेवण्याची धडपड करतो आणि त्यामुळे या धडपडीचा एक भाग म्हणून स्मृती अस्तित्वात येते त्याचप्रमाणे सामूहिक स्मृती सुद्धा यासाठीच अस्तित्वात असते एक तर पिढ्यान पिढ्या आपण आपल्याला मिळालेले शहाणपण आपल्याला मिळालेले दर्शन आपल्याला मिळालेले तत्त्वज्ञान आपल्याला मिळालेले विज्ञान पुढच्या पिढ्यांना देऊ इच्छितो आणि साहजिकच त्यामुळे स्मृती आवश्यक बनते तशीच इतिहास ,परंपरा आणि जालना आवश्यक बनते 

म्हणजे एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की इतिहास हे सुद्धा एका अर्थाने स्मृती सारखे सहा प्रोसेसने बनलेले आहे त्याचप्रमाणे परंपरा ही सुद्धा या सहा प्रोसेसने युक्त आहे आणि आता जालना सुद्धा या सहा प्रोसेसने युक्त आहे त्यांना कुणाला टाळता आलेले नाही म्हणजेच एका अर्थाने आपण परंपरा पाहतो म्हणजे स्मृतीचे नव्याने अर्थनिर्णयन करतो आपण ते आपल्या स्मृतीतून सामूहिक स्मृतीतून बाहेर काढतो तिचे वैज्ञानिक पद्धतीने अर्थनिर्णयन करतो तिला ज्ञानाच्या नव्या प्रकाशात पुन्हा रचतो पुन्हा एकदा नीट आठवतो मग आपणाला असे म्हणता येईल का इतिहास असो की परंपरा या दोन्ही गोष्टी म्हणजे स्मृति नव्हे तर स्मृतीसमृद्धीचे केलेले मानवी अर्थनिर्णयन आहे चिन्ह निर्णयन आहे. 

याच्याही पुढे जाऊन मग असे म्हणता येईल का की या सर्व गोष्टी चिन्ह सृष्टीत घडतात म्हणूनच त्या फक्त चिन्हसृष्टीतच रेंगाळत राहतात आणि माणूस हा चिन्हसृष्टीतच रेंगाळत असल्याने त्याच्यासाठी त्या सर्वात महत्त्वाच्या बनत जातात . 

म्हणजे एका अर्थाने परंपरा रचल्या जातात . त्या विरचीत होतात . जालीत होतात आणि विजालीत होतात . वर्तमान काळात त्यांचे रूपांतर जालनामध्ये होते . 

श्रीधर तिळवे नाईक 

( मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकॅडमी मध्ये ७ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ दिलेल्या व्याख्यानाचा आणि प्रश्नोत्तरांचा एक तुकडा )


Wednesday, September 16, 2026

प्रबोधनकार ठाकरे ,ब्राह्मणी हिंदुत्व विरुद्ध क्षात्र हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक 

प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिवस ! साहजिकच मग त्यांच्या या जन्मदिनी त्यांनी मांडलेल्या विचारांची चिकित्सा केली जाते 

ठाकरे नेमके कुठून आले याची चर्चा त्यांच्याच पुस्तकामुळे जास्त झाली आणि ते स्वतः उत्तर प्रदेशातून आले होते अशा प्रकारची मांडणी पुढे आली . याला उत्तर म्हणून मग ठाकरे यांचे मूळ आडनाव पनवेलकर होते किंवा धोडपकर होते अशी मांडणी आली . माझ्या दृष्टीने ते कुठून आले महत्त्वाचे नाही उत्तम मराठी त्यांनी आत्मसात केली की नाही हा खरा प्रश्न आहे आणि याबाबत ठाकरे यांची भाषा पूर्णपणे स्वतंत्र आणि ब्राह्मणेतर चळवळीचेच प्रतिनिधित्व करणारी आहे जी /जे अजूनही अनेक ब्राह्मणांना डायजेस्ट होत नाही . असो.

त्यांच्या भाषेशी नाते दलित चळवळीतील अनेक साहित्यिकानी जुळवून घेतले आणि नामदेव ढसाळ यांनी तर नंतर सरळ सरळ शिवसेनेत प्रवेश केला याचे कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरे नीट वाचले होते. अनेकांना अजूनही त्यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना स्वीकारणे कळालेले नाही त्यांना असे वाटते की प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व हे संघाचे हिंदुत्व आहे प्रत्यक्षामध्ये असे नाही आणि हे कळालेले पहिले दलित नेते म्हणून नामदेव ढसाळ यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षामध्ये ठाकरे यांचे हिंदुत्व हे पूर्णपणे भिन्न हिंदुत्व आहे आणि जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत ढसाळ आणि श्रीधर तिळवे कळणे शक्य नाही अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हळूहळू ठाकरे यांच्या हिंदुत्वात रूपांतर होत आहे आणि त्याला ब्राह्मणी हिंदुत्व ठामपणे विरोध करत आहे . खरे तर आज ना उद्या हे होणारच होते आता त्याची सुरुवात झालेली आहे . माझा अंदाज चुकला नाही तर भविष्यकाळ हा ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आहे . प्रश्न फक्त इतकाच आहे की हे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामुळे भारतामध्ये प्रचार पावणार आहे की शिवसेनेमुळे ते प्रचलित होणार आहे ? सध्या तरी भागवत गोंधळलेले दिसतात एकीकडे त्यांना प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाच्या आकर्षण आहे तर दुसरीकडे संघामध्ये ब्राह्मणी हिंदुत्व असणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्याने त्यालाही सांभाळायचे आहे त्यामुळे फार मोठा गोंधळ उडालेला दिसतो आणि भागवतांच्या वक्तव्यामध्ये भाषणांच्या मध्ये फार मोठी तारेवरची वैचारिक सर्कस सुद्धा बघायला मिळते . त्यामुळेच आपणाला प्रबोधनकार ठाकरे काय म्हणत होते हे नीट समजून घ्यावे लागते. मुळात या हिंदुत्वाची पार्श्वभूमी 19 व्या शतकामध्ये मांडत असलेल्या भूमिकेत आहे .

१९ व्या शतकातले हिंदुत्व हे पूर्णपणे ब्राह्मणी हिंदुत्व होते आणि चिपळूणकर हे सांस्कृतिक तर टिळक हे राजकीय हिंदुत्व ब्राह्मणी पद्धतीने ब्राह्मण्य पाळत मांडत होते विसाव्या शतकात मात्र सावरकर यांचे वेदांती हिंदुत्व आले आणि त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे यांचे क्षात्र हिंदुत्व आले . दोघेही बुद्धीप्रमाणवादी असले तरी दोघांच्या मध्ये एक फरक होता तो म्हणजे सावरकर स्वतःचा ब्राह्मणी चेहरा पूर्णपणे कधीच दूर करू शकले नाहीत त्या उलट प्रबोधनकार मात्र स्पष्ट आणि स्वच्छ पणाने ब्राह्मणी हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यामुळेच त्यांनी क्षात्र हिंदुत्व मांडले. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर आमचे हिंदुत्व शेंडी मध्ये आणि पंच पळी मध्ये नाही हे उद्धव ठाकरे यांचे उद्गार! त्याची प्रेरणा स्पष्ट आणि स्वच्छपणाने प्रबोधनकार ठाकरे आहेत . त्यांची ब्राह्मण धर्मावर अशी टीका" शेंडीने कापलाय गळा" या त्यांच्या ग्रंथामध्ये आलेली आहे ते म्हणतात,"शेंडी, जानवे, आणि कर्मकांड याने माणसाची उंची ठरत नाही—विचार आणि कृती ठरवतात. धर्माच्या नावाखाली माणसाला गुलाम बनवणं म्हणजे देवतेचा अपमान !"

परंपरेबाबतचे सुद्धा त्यांचे विचार फार स्पष्ट होते ते म्हणतात , "विचारशून्य परंपरा म्हणजे समाजाच्या गळ्याला शेंडीने फास घालणं. अंधश्रद्धा हीच खरी गुलामगिरी आहे."

साहजिकच मग त्यांची धर्माची व्याख्या बदलते ते म्हणतात ,"जात-पात नष्ट करून माणूस म्हणून उभं राहणं हेच खऱ्या धर्माचं लक्षण."

त्या बदललेल्या व्याख्यानुसार साहजिकच मग ब्राम्हणत्वाची व्याख्या ही बदलते ते म्हणतात,"ब्राह्मणत्व म्हणजे ज्ञान आणि सेवा, जातीय गर्व नव्हे."

येथे आपणाला विवेकानंदांनी जी चार युगांची संकल्पना मांडली होती तिचे नवे रूप दिसते आणि ब्राह्मण आणि क्षात्र या गोष्टीकडे जाणीव म्हणून पाहिले जाते मी माझ्या स्वतःच्या टीका हरण या ग्रंथामध्ये चार जाणीवांचा हा विचार फार पुढे नेला होता पण नंतर तो राहुल कोसंबी यांच्याप्रमाणे काही लोकांनी या विचाराचा इतिहास माहीत नसल्याने तो भरकटवत नेल्याने पूर्णपणे मी बाजूला केला. मात्र १९५० पूर्वीच्या इतिहासाचा विचार करताना मला अनेकदा आजही आपल्या जाणिवांचे प्रकार ब्राह्मण जाणीव क्षत्रिय जाणीव अशा तऱ्हेने दिसते . याचे कारण उघड आहे आपले आजही जाणिवेचे असणे हे वर्णग्रस्त असते अलीकडे तर काही जणांच्या बाबतीत ते चक्क जातीग्रस्त सुद्धा झालेले दिसते यांच्या विरोधात अर्थातच शैव धर्मातली समाज एक संकल्पना वावरत असते ज्याची मांडणी मी नेहमीच आतापर्यंत करत आलेलो आहे .

पण नवीन काही मांडायचे असेल तर प्रबोधनकार म्हणतात ,"समाज सुधारायचा असेल, तर रूढींचा भंग करावा लागतो.जुनं म्हणून सोनं मानणं म्हणजे विवेकाचा अपमान"

अर्थातच ज्याला नवता मांडायचे असते त्याला प्रश्न विचारायला लागतात . प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ,"ज्याला प्रश्न विचारायची भीती वाटते, त्याला उत्तर मिळण्याची पात्रता नसते."

या काळामध्ये धर्मचिकित्सा हीच खरी चिकित्सा असे मांडणारा आरंभीचा पुरोगामी वाद खूप प्रचलित होता साहजिकच त्याला प्रत्युत्तर म्हणून "धर्मचिकित्सा हीच खरी धर्मसेवा. माणसाने स्वतःच्या विचारांनी जगावं, दुसऱ्याच्या कर्मकांडांनी नव्हे.शेंडीने गळा कापला जातो तेव्हा विचारांनी तो वाचवता येतो" असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात .

त्यामुळे साहजिकच वर्णव्यवस्थेला ठाम विरोध आहे आणि तो अनेक प्रकारच्या लिखाणांमध्ये वारंवार व्यक्त होताना दिसतो .

आंबेडकर यांच्या नादाला लागून अनेक फुलेवादी बहुजनवादी लोक महात्मा गांधी यांचा द्वेष करायला लागले तर संघाच्या नादाला लागून अनेकदा महात्मा गांधी यांच्या संदर्भात सुद्धा वादग्रस्त विधाने खुद्द ठाकरे कुटुंबाकडून आलेली आहेत. प्रत्यक्षामध्ये प्रबोधन ठाकरे मात्र फार वेगळे होते . ते महात्मा गांधी यांच्याकडे कसे पाहत होते ?

प्रथम ते महात्मा फुले यांच्या संदर्भात काय म्हणतात ते पाहू .ते म्हणतात,"

एकीकडे केवळ व्यापारी, दुसरीकडे तुंबडीबाजीची पर्वा करणारे परके इंग्रज सरकार, आणि तिसरीकडे अनाडी रयतेच्या अज्ञानावर चरण्यास सवकलेला धोरणी बाण्डगुळ्या भटवर्ग. अशा तिरंगी सामन्याला तोंड देउन, जोतीबाला जेवढे काही देशकालानुसार करता आले,तेवढे त्याने केले. पण, अखेर त्याची शेतकरी आणि कामगार वर्गाच्या जागृतीची चळवळ बाण्डगुळ्या पांढरपेश्या भटानी आणि भटेतरानी चिरडून टाकली. 

चालू घडीच्या राजकारणात शेतकरी आणि कामगारांचे महत्त्व क्रान्तीचे स्फोट कसकसे उडवित आहे, हे पाहिले म्हणजे ज्येतिबाच्या बाबड्या बोलाच्या खेडवळी चळवळीचे मर्म आणि महत्त्व जितके स्पष्ट होते तितकेच चिपळूणकर टिळक प्रभृति बाण्डगुळ्या गुंडांच्या शहरी चळवळीचे नासके धोरण नागडे उघडे पडते. बाण्डगुळ्यांच्या राजकारणात मामलदार मुनसफीच्या वाढत्या जागा, कौन्सिलातल्या खुर्च्या इत्यादि बाबी कितीहि असल्या तरी घोंगड्या शेतकरी, आणि त्याची मरती शेती या बाबीना त्याच्या ओसरीवरहि जागा नसे. ज्योतिबाची चळवळ शेताच्या बांधावरची. ती या शहरी शहाण्याना क्षुद्र कां वाटू नये ? पांढरपेशांची उखळे पांढरी झाली कीं, स्वराज्याचा स्वर्ग हाती आला, एवढ्याच अनुभवाची या वाण्डगुळ्यांची परंपरा. भटांना पेशवाई मिळाली की भटभोजनातल्या खरकट्या पत्रावळींच्या उकीरड्यालाहि ‘मराठी साम्राज्य’ नाव द्यायला यांची तयारी. 

अशा मुर्दाड मनाच्या माणसानी ज्योतिबाची चळवळ पाळण्यातल्या पाळ्यात कितीही ठेचली, तरी गांधींनी तीच चळवळ पुन्हा जिवंत करताच तिच्यापुढे टिळक चिपळूणकरी बडव्याना पगड्या पागोटी घासताना आपल्या नाकांच्या अणकुचीदार बोंड्याहि थबकटून घ्याव्या लागत आहेत, हा काळाचा महिमा खरोखरच रम्य आणि चिन्त्य आहे."

ते महात्मा फुले यांची ब्राह्मणवादाकडून पाळण्यातच ठेचली गेलेली चळवळच पुढे महात्मा गांधी यांनी पुनर्जीवित करून पुढे चालवली असे मानणारे होते आणि यामागचे स्पष्ट आणि स्वच्छ कारण म्हणजे महात्मा गांधी हे शेवटी ब्राह्मणेतर वर्गातून आलेले होते . ते म्हणतात , " गांधीजींनी हरिजनउद्धाराचा कार्यक्रम हाती घेतलाय म्हणून ऑर्थोडॉक्स लोकांचा संताप उसळून आलाय "

(प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय :खंड पहिला)

ज्योतिबा फुले यांना ब्राह्मण धर्माविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सोबत मुसलमान असणे फार आवश्यक वाटत होते काहीसा हाच विचार नंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेला आहे त्यामुळेच ते म्हणतात ,"शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता ?

मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून, तिला रसातळाला नेण्याचा यत्न करणे, हा तर प्रत्येक मनष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्रस्वातंत्र्याचा धर्म उद्दिपित करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय. शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे होते. महाराष्ट्र म-हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? म-हाठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी म-हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्त्वाकांक्षेने बालवयातच फुरफुरलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणा-या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारीकडे काग्र लक्ष ठेवून, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्यप्राप्तच होते. त्याने अफझुलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय. अफझुलखानाच्या स्वारीचा उद्देश, त्याने विजापुरास मारलेली पैज. येताना वाटेत केलेले अत्याचार, आणि शिवाजीविरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. अफझुलखान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित अदिलशाही सत्तेने फेकलेला बांबगोळाच होय, ही त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच, शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच, त्याच्या डावाशी प्रतिडाव खेळला, आणि अखेर अतुल्य प्रसंगावधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद करून, शिवाजीचा महाराष्ट्र – स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहजगत्या टाचेखाली विझणारी ठिणगी नव्हे, "

-प्रबोधनकार ठाकरे

(दगलबाज शिवाजी या ग्रंथामधून)

थोडक्यात काय महात्मा फुले यांची ब्राह्मणे तर सामाजिक चळवळ, महात्मा गांधी यांची राजकीय चळवळ आणि हिंदुत्ववादी लोकांची धार्मिक चळवळ यांचे नेटवर्क प्रबोधन ठाकरे जमवतात आणि त्यामधून आपले क्षात्र हिंदुत्व व्यक्त करत राहतात . प्रश्न असा आहे की ते हे सर्व काही करताना बहुजनांचे हिंदुत्व मांडतात का ?

माझ्या मते या दिशेने त्यांची वाटचाल झालेली स्पष्टपणे दिसते महात्मा फुले यांच्याप्रमाणे त्यांनी सुद्धा बहुजन लोकांचे देव वेगळे आहेत असे स्पष्टपणे सांगितले होते आणि हे देव कोणते हेही सांगितले होते . बहुजनांचे खरे देव खंडोबा ज्योतिबा तुळजाभवानी हेच आहेत अशीच त्यांची मांडणी होती पण विरोधाभास असा होता की त्यांचा आवडता संत मात्र समर्थ रामदास होता आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना तो वारकरी संप्रदायापेक्षा अधिक मिशनरी वाटत होता जे त्यांच्या काळामध्ये ख्रिश्चन मिशनरींचे मिशनरी कार्य सर्वत्र दिसत असल्याने त्यांना महत्त्वाचे वाटत होते . खुद्द त्यांनी स्वतः स्वतःच्या पद्धतीने एक मिशनरी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या या हिंदू मिशनरी संकल्पनेतूनच आत्ताची शिव सैनिक ही संकल्पना विकसित झालेली आहे दुर्दैवाने तिचा जितका विकास अजून व्हायला हवा होता तितका तो झाला नाही आणि त्याचे फार मोठे तोटे शिवसेनेला झालेले आहेत .त्यामुळेच अनेकदा समर्थ रामदास यांचे त्यांनी समर्थन केलेले दिसते कारण समर्थ रामदासांनी अशा प्रकारची चळवळ महाराष्ट्रात उभी करून दाखवली असे त्यांचे म्हणणे होते प्रत्यक्षामध्ये आता नवीन जे पुरावे आलेत त्यावरून स्पष्ट दिसते की शिवाजी महाराजांच्या चळवळीशी समर्थ रामदासांचा काडीचाही संबंध नव्हता परंतु नंतर शिवाजी महाराजांचे जे वारस आले त्यांच्याशी मात्र रामदास पंथाचा फार खोल आणि व्यापक संबंध होता . या समर्थ चळवळीमधूनच प्रेरणा घेत आणि त्याची सांगड मिशनरी ख्रिश्चन लोकांच्या बरोबर घालत त्यांनी हिंदुत्वाच्या मिशनरीची संकल्पना मांडली पण हे समर्थन करताना कळत नकळत रामदास अनेकदा वर्णव्यवस्थावादी होतात हे त्यांच्या लक्षात आलेले नाही . त्यामुळे मिशनरी वर्क पण आहे पण कोणासाठी आहे तर ब्राह्मण धर्मासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी आहे असाच निष्कर्ष आपणाला समर्थ रामदास यांच्या बाबतीत काढावा लागतो त्यामुळे त्याचे उदाहरण आता एकविसाव्या शतकात आपण घेऊ नये हेच बरे . मात्र या हिंदुत्ववादी मिशनरीच्या संकल्पनेचा प्रभाव बहुदा हेडगेवार यांच्यावर पडलेला असावा आणि त्यातूनच मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण झाला असावा .

प्रबोधनकार यांची शाहू महाराजांच्या बरोबर असलेली मैत्री सुद्धा अशाच प्रकारच्या मराठ्यांचा वर्ण कोणता याच प्रश्नाच्या अंगाने आलेली आहे . आणि पुरावे गोळा करताना इतिहासकार सोबत असावेत म्हणून महाराजांनी त्यांना बोलावले आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण खटल्यामध्ये त्यांना मदत केलेली दिसते . ही मैत्री शेवटपर्यंत टिकली . या खटल्यामध्ये कळत नकळत मराठे क्षत्रिय आहेत की नाही हा प्रश्न होता . माझ्या मते हा संदर्भच वेगळा असायला हवा होता पण या काळामध्ये ब्राह्मण धर्माची चौकट हीच हिंदू धर्माची चौकट बनल्याने साहजिकच सर्व प्रबोधनाचा विचार हा वर्ण विचार होऊन गेला . वास्तविक मराठा हा पूर्णपणे वीर समाज आहे आणि तो शैव आहे त्याचे कुलदैवत खंडोबा किंवा तुळजाभवानी आहे. भारतामध्ये शैव समाज स्वतंत्र समाज म्हणून अस्तित्वात असतो हेच त्या काळामध्ये कोणाला मान्य नव्हते त्यामुळे साहजिकच प्रत्येक गोष्टीचा विचार करताना आपण ती गोष्ट वैचारिक चौकटीत बसवताना वर्ण चौकटीत बसवली पाहिजे असा काहीतरी गैरसमज या काळात लोकांचा झाला होता त्यामुळे साहजिकच वीर समाज असलेले सर्वच्या सर्व शैव समाज मग ते मराठा असोत की शीख असोत की राजपूत असोत की जाट असोत स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेण्यामध्ये हळूहळू धन्यता मानायला लागले . त्याचा प्रचंड प्रभाव या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर पडलेला दिसतो त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या सीकेपी समाजाच्या संदर्भातील सर्व पाळीमुळे शोधून आपण क्षत्रिय कसे आहोत याची मांडणी त्यांनी केलेली दिसते .

प्रश्न असा आहे की हा क्षात्र हिंदुत्वाचा विचार आता पूर्णपणे बहुजनांच्या हिंदुत्वाकडे आपणाला नेता येणार आहे का ? 

माझा यापुढचा विचार असा की मुळातच ज्यांना आपण अलीकडे ब्राह्मण समजतो त्यामधील 90% लोक हे मूळचे शैव आहे आणि ते पंडित आहेत त्यांना सुद्धा पुरोगामी पद्धतीने पुढे नेत आणि ब्राह्मण हे टायटल काढून घेत आपण पंडित समाजामध्ये सामील करून घेतले पाहिजे . खुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा या प्रकारचे धोरण अवलंबलेले दिसते आणि पंतांचा म्हणजेच पंडितांचा समावेश आपल्या मंत्रिमंडळात केलेला दिसतो . फक्त त्यांनी त्या काळातील पंतांचे ब्राह्मण हे टायटल काढून घेतले नाही पण आता मात्र हे टायटल काढून घेतले पाहिजे कारण ते शेवटी वर्ण व्यवस्था पुन्हा आणते असा अनुभव आहे .

माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की आपण जे ब्राह्मण आहे त्यांना पंडित बनवावे जे स्वतःला आता क्षत्रिय समजतात त्यांना आपण वीर समाज आहोत याची जाणीव करून द्यावी जे वैश्य आहे त्यांना त्यांच्या मूळ वाणी पणी समाजाची आठवण करून द्यावी आणि संपूर्ण वर्णजात व्यवस्थाच जाळून राख करावी ही व्यवस्था हिंदू लोकांच्या हिंदवी लोकांच्या मुळावरच आलेली आहे आपण मुस्लिम आणि इंग्रज लोकांच्याकडून तिच्यामुळेच हरलेलो आहोत . त्यामुळे यापुढे जर का आपणाला टिकायचे असेल तर एकत्र करायचे असेल तर एकप्राण व्हायचे असेल एकात्म व्हायचे असेल तर जितक्या लवकर आपण आपल्या समाजातून भारतामधून वर्ण जात व्यवस्था हाकलून देऊ तितके बरे ! हळूहळू का होईना परंतु भाजपमधील हिंदुत्ववादी विचार सुद्धा आता या दिशेने जाताना दिसतो आहे आणि तो तसा जाताना दिसत असल्यानेच अलीकडे अचानकपणे ब्राह्मणी हिंदुत्व या नव हिंदुत्ववादी विचाराला पूर्णपणे मागे खेचत आहे . माझे मत असे की तुम्ही काँग्रेसवाले असा नाही तर संघवाले असा हिंदुत्ववादी असा नाही तर सेक्युलर असा भारताच्या भल्यासाठी किमान या एका मुद्द्यावर एकत्र यायला आता हरकत नाही . काही काळ आपणाला जनरल, ओबीसी बीसी दलित आणि आदिवासी असे पंचप्रवर्ग स्वीकारायला लागतील पण हे सुद्धा लवकरात लवकर जावेत इतकी आपली आर्थिक व्यवस्था प्रगत झाली पाहिजे सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली पाहिजे आणि राजकीय करणामधले या वर्ण जात व्यवस्थेचे कणे मोडून पडले पाहिजेत . जेवढ्या लवकर हे सर्व होईल तेवढा आपला विकास जास्त वेगाने होईल अन्यथा बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असे सर्व फोलाचे होऊन जाईल 

प्रबोधनकार ठाकरे यांचे अंतिम उद्दिष्ट हे जर आपणाला साध्य करायचे असेल तर आता अधिक काही नवीन बदल स्वीकारावे लागतील . 

श्रीधर तिळवे नाईक