Wednesday, January 29, 2025

 चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी १


महाराष्ट्रात अलीकडे युवाल हरारी याची चर्चा जोरदार चालू आहे याचे कारण अमेरिकेतल्या पॉप लिटरेचरची एकंदरच जगभर असलेली लोकप्रियता आहे अत्यंत सोप्या भाषेत वैज्ञानिक सत्य सांगणे हे सायंटिफिक पॉप लिटरेचरचे वैशिष्ट्य असते ते हरारीच्या लेखनामध्ये ओतप्रत भरलेले आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आश्चर्यकारकरीत्या हे करताना तो व पु काळ्यांच्याइतकाच लाघवी असतो साहजिकच अशा प्रकारचे वाचन करणाऱ्या लोकांना तो एक देवदूत वाटला तर आश्चर्य नाही 


आमच्या पिढीने चौथ्या नवतेचे काही प्रश्न निर्माण केले त्यांची स्वतःच्या डाटा उपलब्धतेनुसार उत्तरेही दिली आणि हे प्रश्न आता अधिक व्यापक डाटा घेऊन दुसऱ्या पिढीत सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणे झिरपलेले आहेत हे आपणाला हरारीच्या लेखनावरून स्पष्टपणे प्रतीत होते मराठीत त्याचा अनुवाद होतो हा नेहमीच मला पॉझिटिव्ह इव्हेंट वाटत असतो याचे कारण मराठीमध्ये चौथी नवता पसरवायची असेल तर असे सर्व वैज्ञानिक पॉप लिटरेचर अनुवादित होणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्या भोवताली काय चालले आहे हे नीट समजून घेईल मला नेहमीच या गोष्टीचा आनंद होतो की चौथ्या नवतेच्या दुसऱ्या पिढीतील प्रणव सखदेव हे अत्यंत ताकतीने त्याचा अनुवाद करत आहेत


कुठलेही तत्त्वज्ञान जेव्हा उदयाला येते तेव्हा ते अत्यंत किचकट असते उदाहरणार्थ जिला आज आपण उत्तर आधुनिकता म्हणतो ती प्रथम फ्रेडरिक Nietzsche याने अत्यंत व्यवस्थित मांडली परंतु त्याच्या समकालीन लोकांना ती झेपलेली दिसत नाही कारण त्या काळामध्ये उत्तर आधुनिक विज्ञान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले नव्हते पुढे आईन्स्टाईन मुळे सर्व गोष्टी सोप्या होत गेल्या आणि Nietzsche काय म्हणतो हे अधिक नीट समजत गेले पुढे मग उत्तराधुनिकता नीट समजावून सांगणाऱ्या पॉप लिटरेचरची निर्मिती व्हायला लागली फार प्राचीन काळापासून युरोपमध्ये ही प्रथा आहे आणि सोफिस्ट लोक ती नेहमीच चालवत आलेले आहेत अलीकडे तर या लोकांचे मूळ सॉकॅटिस मध्ये आहे आणि सॉक्रेटीस हा त्यांचा आद्य पुरुष आहे अशा प्रकारची मांडणी पुढे येते आहे भारतामध्ये शैव परंपरेमध्ये हा सर्व खटाटोप पंडित लोकांच्याकडे दिलेला होता त्यांनी तो कितपत नीट पार पाडला हा एक आता मोठा प्रश्न आहे युरोशीयन परंपरेमध्ये श्रुतीमध्ये हे काम ब्राह्मण लोकांनी हातात घेतले खरे परंतु त्यांनी चक्क त्या आधारे एक धर्म निर्माण करून टाकला आणि प्रत्येक धर्म स्वतःच्या ताब्यात घेण्याचे व ताब्यात ठेवण्याचे टेकनिकच डेव्हलप केले पाश्चात्त्य देशांमध्ये असा उद्योग तिकडच्या धर्माधिकारी लोकांनी केलेला होता आणि जीजस बळकावला होता त्या विरोधात प्रोटेस्ट ठेवून प्रोटेस्टंट निर्माण झाले आपल्याकडे मात्रे अजूनही असे प्रोटेस्ट निर्माण झालेले नाहीत अपवाद फक्त बसवेश्वर गुरुनानक आणि महात्मा फुले हे शैवच आहेत युरेशियन धर्मांनी मात्र कायमच तडजोडी स्वीकारलेल्या दिसतात आणि ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य केलेले दिसते अलीकडेच कुंभमेळ्यावर ब्राह्मण धर्माने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो पण सरते शेवटी तो फसलेला दिसतो खुद्द अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांनी हर हर महादेव म्हणतच पवित्र स्नानाची डुबकी घेतलेली दिसते अशा प्रकारचे वर्चस्व पाश्चात्त्य देशांमध्ये धर्माधिकारी लोकांचे राहिलेले नाही साहजिकच तिथे वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक पॉप लिटरेचर अतिशय चांगल्या रीतीने निर्माण होते अर्थात तिथेही कधीकधी सपाट करण्याच्या नादामध्ये मूळ सिद्धांताला धक्का लागतो तेव्हा वाद निर्माण होतो

साहजिकच असे लोक निर्माण होणे योग्य की अयोग्य हा कायमच वाद आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात तो कायमच निर्माण होऊन राहिलेला आहे


युवाल हराळीचे स्कूल कुठले असा प्रश्न नेहमी मला अनेक लोक विचारत असतात माझे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे त्यासाठी आपणाला थोडे आईन्स्टाईन कडे जावे लागते उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन ची सापेक्षतेची थेरी नीट समजत नव्हती तेव्हा बर्ट्रांड रसेल ह्याने अतिशय सोप्या भाषेत ते समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषे स्पष्ट करण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला होता (एबीसी ऑफ रिलेटिविटी)आणि हा प्रयत्न यशस्वी झाला इतका की खुद्द आईन्स्टाईनने जगात फक्त तीनच लोकांना सापेक्षता कळलेली आहे आणि त्यातील एक रसेल आहेत असे सर्टिफिकेट दिले होते आणि तिथून पुढे लोकप्रिय वैज्ञानिक वाङ्मयाचे एक नवीन रसेल स्कूल निर्माण झाले हरारीचे पूर्वज निपजायला सुरुवात झाली याला मी रसेलियन पॉप लिटरेचर म्हणतो हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण मांडणी ठेवत असतात आणि त्याचबरोबर काही इन्साइटससुद्धा पुरवत असतात कारण मुळात ते स्वतः तत्त्वज्ञ असतात हरारी या स्कूलमध्ये येतो असे लोकांना गाभा समजावून सांगणारे काही सोफिस्ट लोक प्रत्येक पिढीमध्ये निर्माण होणे फार गरजेचे असते पाश्चात्त्य देशांमध्ये अशी परंपरा कायमच राहिलेली आहे आपल्याकडेही धार्मिक क्षेत्रात मोक्षिक क्षेत्रात अनेक कीर्तनकार हेच करत असतात मात्र आपल्याकडे अनेकदा मूळ गाभा अत्यंत भ्रष्ट होत जातो उदाहरणार्थ पुराणे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत किंवा वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तने आपण ऐकली तर आपणाला असे दिसते की संत तुकारामांच्या अभंगाची कधीकधी चांगली आणि कधीकधी टोकाची सोपी करण्याच्या नादामध्ये मनोरंजक विश्लेषणे झालेली आहेत विज्ञानामध्ये मात्र जितकी निर्मिती या अंगाने व्हायला हवी होती त्या अंगाने झालेली नाही त्यामुळे साहजिकच हरारीचे महत्त्व मराठीसाठी तरी प्रचंड आहे किंबहुना प्रत्येक ग्रंथालयामध्ये हा मनुष्य जाणे आवश्यक आहे कारण त्या निमित्ताने का होईना पण चौथी नवता ही भानगड काय आहे हे अधिकाधिक उलगडत जाण्याची शक्यता असते 


श्रीधर तिळवे नाईक


चौथ्या नवतेची दुसरी पिढी युवाल हरारी २


उत्तराधुनिकतेने धर्म पुन्हा केंद्रस्थानी आणायला मदत केली आणि चौथ्या नवतेमधल्या सर्व विचारवंतांना त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी पेलावी लागली हरारी याला अपवाद नाही 


माझी स्वतःची याबाबतीतले मांडण अशी होती की धर्माशी आणि धार्मिक कट्टरतेशी सामना करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी मोक्ष प्रमोट करावा लागेल धर्म हा धर्माला उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे धर्माला उत्तर द्यायचे असेल तर ते मोक्षानेच देता येते हरारीला मोक्ष उपलब्ध नाही हे त्याचे दुर्दैव किंवा असे म्हणू की झियोनिस्ट दुर्दैव ! साहजिकच तो पुन्हा एकदा ज्यू धर्माच्या सेकंड टेम्पल वार कडे जातो आणि पुढे मग झियानिजमिक राष्ट्रवाद कसा आहे हे सांगायला लागतो इतकेच नव्हे तर जू लोकांचा राष्ट्रवाद ज्यू लोकांना का नाकारला जातो असा प्रश्नही तो उपस्थित करतो ज्या भूमीवर ज्यू लोक क्लेम करतायेत तो क्लेम कसा ऐतिहासिक आहे हेही पटवण्याचा प्रयत्न करतो प्रश्न असा आहे की हे त्याला का करावे लागते? दुसरा प्रश्न असा आहे की हे हिंदुत्ववादी लोकांच्या सारखे आहे का ? म्हणजे ब्राह्मण धर्माला अलीकडे जो लोकांच्या सारखी स्वतंत्र राष्ट्राची आवश्यकता वाटायला लागलेली आहे ब्राह्मणे तर चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जर भारतात पसरली तर ब्राह्मण धर्माचे हकालपट्टी होणे अटळ आहे असे ब्राह्मण धर्मे लोकांना वाटते प्रत्यक्षात त्या तथ्य नाहीये परंतु त्यांना तसे वाटते हे मात्र खरे आहे म्हणूनच अधून मधून ब्राह्मणांसाठी स्वतंत्र राष्ट्र मागितले जाते प्रश्न असा आहे की ब्राह्मणांना स्वतःचा हा ब्राह्मण धर्म जो सरळ सरळ वंशवादी आणि वर्णवादी आहे टिकवावासा का वाटतो एवढे सगळे रामायण आणि महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा वारंवार मुस्लिम आणि इंग्रजांच्या कडून पराभूत झाल्यानंतर सुद्धा वर्ण व्यवस्थेचा हा दुराग्रह का सुटत नाही स्वतःला टॉपला ठेवण्याचा हा आग्रह का सुटत नाही हे खरे तर खरोखर अवघड होऊन बसलेले आहे एक प्रकारे हा एक वंशवाद आहे आणि तो जेनेटिकल नाहीये तर ज्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला ते ब्राह्मण अशा प्रकारच्या कट्टर व्याख्येतून तो आलेला आहे त्यात ब्राह्मण्यतरांचे स्थान हे कायमच दुय्यम राहणार हे उघड आहे पण आश्चर्यकारकरीत्या हे दुय्यम स्थान सुद्धा अनेकांना सुखकारक वाटते की काय अशी सद्यस्थिती आहे ज्यू लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाहीये कारण मुळात ज्यू च एक महाटोळी आहे अशी त्यांची धारणा आहे जिच्यात अनेक किमान 13 टोळ्या येतात असे त्यांना वाटते ज्यू आणि ब्राह्मण लोकांना आपण देवाकडून निवडले गेलेलो आहोत असे वाटत असतं ब्राह्मण स्वतःला त्यामुळेच बिनधास्तपणे भूदेव म्हणवून घेऊ शकतात खरे तर बौद्धिक पातळीचा विचार केला तर जितके क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन जीव लोकांचे आहे त्याच्या धड २% कॉन्ट्रीब्युशन सुद्धा ब्राह्मण धर्माला आणि ब्राह्मण लोकांना देता आलेले नाही याचे कारण त्यांची बुद्धी त्यांनी धर्मामध्ये वाया घालवली याउलट ज्यू लोकांनी आपली बुद्धी सायन्स व तंत्रज्ञानाकडे वळवून अनेक जागतिक दर्जाचे सायन्स आणि तंत्रज्ञानातले काम करून दाखवले आणि त्यामुळे ज्यू लोकांच्या बद्दल एक प्रचंड आदर सर्वत्र आहे अपवाद फक्त मुस्लिम लोक आहेत अशा प्रकारचे काम करून दाखवले तरी हिटलरला हे लोक शत्रू वाटावे शत्रु वाटावेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे सर्वात वाईट गोष्ट त्याचा अहंकार हा आर्य अहंकार होता आणि आश्चर्यकारकडी त्या ब्राह्मण लोकांना हा आरे असण्याचा अहंकार फार प्राचीन काळापासून आहे किंबहुना भारताला आर्यावर्त म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली होती ब्राह्मण असो किंवा रोमन कॅथोलिक असोत या दोघांच्याही मुळामध्ये मुळात युरेशियन मुळे आहेत आणि आश्चर्यकारकरीत्या ती अजूनही ऍक्टिव्ह आहेत की काय अशी मला शंका येत असते कारण हे दोघेही कायम स्वतःला वेगळे काढत असतात मुळसा ख्रिश्चन धर्म आर्यन ख्रिश्चन धर्म कसा काय बनला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा इतिहास आहे आणि त्यामध्ये रोमन अरे लोकांनी अत्यंत मेजर बजावलेला आहे असे असून सुद्धा आश्चर्यकार्यक रित्या हे दोन धर्म एकमेकाचे शत्रू होण्याऐवजी आता एकत्र येऊ बघतात याचे कारण हिटलरने स्वतःला आर्य वंशी म्हणून प्रमोट केले असले तरी स्वतःचा धर्म मात्र त्याने ख्रिश्चन असा सांगितलेला आहे तो खरंतर कितपत ऑथेंटीक आहे याविषयी मला शंका आहेत कळत नकळतपणे  प्रोटेस्टन्ट धर्मात त्यांच्या संस्थापकाचा म्हणजेच मार्टिन ल्युथर याचा जो धर्म होता त्यात जू लोकांचा जो द्वेष चालला होता तो द्वेष जर्मन परंपरेतून त्याच्याकडे चालत आलेला होता असे आता दिसते त्यासाठी लागणारे तर्कशास्त्र आर्य सिद्धांताने त्याला पुरवावे आणि हेच सिद्धांतन ब्राह्मणांना सुद्धा आपले वाटावे याहून शोकांतिका काय ? हरारी जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला हे सगळे डायनॅमिक्स किती कळलेले असते याबद्दल मला शंका आहेत साहजिकच हिटलरच्या सर्व कारवायांनी जीव लोकांच्या मध्ये ज्यू लोकांच्या मध्ये एक प्रकारे असुरक्षितता निर्माण केली आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या सर्वांसाठी आणि स्वतःच्या धर्माच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज भासायला लागली ही परिस्थिती आपण जर का हिटलरच्या काळात गेलो तर आपण नीट समजून घेऊ शकतो आणि ज्यू राष्ट्राला मान्यता ही देऊ शकतो त्यामुळे भारताचा इस्त्राईल या स्वतंत्र राष्ट्राला असलेला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा भारताने कायम स्वरूपात ठेवलाच पाहिजे कारण नैतिकदृष्ट्या तो योग्य आहे पुन्हा कोणी ज्यू विरोधात काही करणारच नाही याची कसलीही खात्री माणसाच्या संदर्भात देता येत नाही आता ही जी इनसिक्युरिटी आहे ज्यामधून इस्त्राईल तयार झाला त्याच्याबाबतीत ऑब्जेक्शन कोणाचे आले तर आश्चर्यकारक लिहिता हिटलर यातून सुटला आणि मुस्लिमांना आता इस्त्राईल नकोसे झाले आहे साहजिकच इस्त्रायल पासून मुस्लिम आणि मुस्लिमांच्या पासून इस्त्राईल आता इन सिक्युअर झालेले आहेत आणि त्यातूनच आत्ताच्या गाजा पट्टीचा प्रश्न आलेला आहे 

प्रश्न असा आहे की ब्राह्मण लोकांच्या मध्ये ही जी इन सक सिक्युरिटी आली आहे तिचे मूळ नेमके कशात आहे आणि  कुठून आली ?

 

वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जी प्रचंड ज्यू लोकांची हिंसा केली तशीच हिंसा काश्मीरमध्ये पंडित लोकांच्या वाट्याला आली त्यामुळे साहजिकच एक प्रचंड भय ब्राह्मण धर्मी लोकांच्या मध्ये निर्माण झालेले आहे साहजिकच आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावेच लागेल ही एक प्रखर जाणीव ज्या मागे खुद्द त्यांचे धार्मिक टेक्स्ट आहे सतत जो लोकांच्या मध्ये जशी  वाढत गेली आणि शेवटी इस्त्राईलची निर्मिती झाली  तसे काही भारतात झाले आहे का महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये अचानक ब्राह्मण लोकांच्यावर हल्ले झाले ते खरोखरच इतके तीव्र होते का की ज्यामुळे ही इन्सिक्युरिटी निर्माण व्हावी ? की ब्राह्मण लोकांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी लोक ते गप्प बसतील त्यांनी प्रतिकार करता कामा नये कारण ब्राह्मणाची हत्या करू नये असे ब्राह्मणांच्या धर्मात सांगितलेलेच आहे प्रत्यक्ष मध्ये ब्राह्मणे तर लोक हे पाळतात असे नाही त्यामुळे मग ही इन्सिक्युरिटी आली आहे का भारतातले ब्राह्मण लोक आणि त्यांचा ब्राह्मण धर्म हा अनेकदा ज्यू लोकांच्या धर्मासारखा आहे असे ब्राह्मण लोकांना वाटत असते आणि म्हणूनच त्यांना इस्त्राईलबद्दल आणि ज्यू धर्माबद्दल प्रेम वाटत असते त्यामुळेच हरारीच्या अनुवादाला आपल्याकडे अनेकदा हिंदुत्ववादी प्रचंड प्रमाणामध्ये उत्तेजन देताना दिसतात कारण शेवटी हरारी फिरून फिरून गंगावेस या म्हणीप्रमाणे ज्यू धर्माकडे परततो 


प्रश्न असा आहे की ज्यूधर्म हा काही आंतरराष्ट्रीय धर्म आहे का? तर नाही ! त्यामुळेच एकीकडे हरारी स्वतःची मांडणी आंतरराष्ट्रीय असे आहे असे मानतो आणि दुसरीकडे झियनिझमचे पूनरागमन झाले पाहिजे असेही म्हणतो चौथ्या नवतेत ही सक्ती झालेली आहे कारण शेवटी इस्लामला पर्याय म्हणून कोणता धर्म द्यायचा हा सर्वांच्या पुढेच प्रश्न ठाकला आहे आणि याचे कारण इस्लाम हा पसरत चाललेला आहे धर्म नाकारला की धर्म येत नाही अशी एक पुरोगामी समजूत होती त्या समजूतिला पूर्ण छेद इस्लामने दिलेला आहे आणि याचा दबाव युवाल हरारी वर आहे मला स्वतःला वैयक्तिक रित्या शैव धर्म निवडण्याची सक्ती झाली याचे कारण आत्ताची इस्लामने आणि ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली परिस्थिती आहे मी बौद्ध धर्म निवडण्याचाही प्रयत्न केला होता परंतु ते शक्य नाही हे माझ्या लक्षात आले विशेषतः भारतात तर ते अजिबात शक्य नाही पण जिथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे तिथे बौद्ध धर्माची शक्यता नाकारता येत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की आज ना उद्या चीनला बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल जापान ने तो आधीच स्वीकारलेला आहे भले त्यांनी त्याला झेन हे नाव दिले असेल याला पर्याय नाही कारण ब्रम्हांडाशी आणि निसर्गाशी नाते जोडणे हे माणसाला आवश्यक वाटते त्याची ती एक मूलभूत गरज आहे आणि ती अन्न आणि वस्त्र यांच्या इतकीच खोल आहे अशा वेळेला तुम्ही एक तर काल्पनिक नाते जोडू शकता किंवा खरे नाते जोडू शकता मोक्ष खरे नाते जोडतो धर्म काल्पनिक नाते जोडतो यापैकी काय निवडायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे याबाबतीत माझे म्हणणे असे की काल्पनिक नाते निवडायचे असेल तर निदान मग असा धर्म निवडावा जो अधिकाधिक शैक्षणिक दृष्ट्या ओपन असेल सहिष्णू असेल ज्याने पुरोगामी वाद पचवलेला असेल आणि भारतात असा धर्म शैव धर्म असल्याने मी शैव धर्माची निवड करतो आता कोणी त्याला हिंदूशैव म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही कारण टायटल पेक्षा माझा मुख्य भर हा आशयावर आहे 

हरारी याच्यापुढे असलेला पेच हा काँग्रेस पुढे असलेल्या हिंदू मुस्लिम प्रश्नासारखा आहे त्यामुळेच पाकिस्तान द्यायचे की नाही असा जो प्रश्न होता तसेच पॅलेस्टाईन द्यायचे की नाही असा हा प्रश्न आहे पॅलेस्टाईन नंतर आलेत आणि तरीही ते स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र क्लेम करतात हा क्लेम हिस्टॉरिकल आहे की नाही हा खरा मुद्दा आहे गमतीचा भाग असा आहे की सांगितले जाते ते सर्व दंतकथात्मक आहे धार्मिक आहे आणि ती श्रद्धा आहे असा मांडण केला जातो साहजिकच मग भारत पाकिस्तान युद्धासारखी ज्यू पॅलेस्टाईन युद्ध चालू राहणे अटळ आहे कारण मूळ भूमी आमची आहे अशी ज्यू लोकांची श्रद्धा आहे तर नंतर आलेल्या मुस्लिम लोकांनी आमची भूमि का मागावी आणि तीही एका दंतकथेच्या आधारे असा त्यांचा प्रश्न आहे वास्तविक इस्त्राईलसाठी स्वतंत्र राष्ट्र ही सुद्धा धार्मिक दंतकथा आहे तर प्रत्यक्षात देवाने असे प्रॉमिस दिले होते की नाही हे कोण ठरवणार ? शेवटी हा सारा खेळ श्रद्धेच्या प्रदेशात जातो आज ना उद्या हरारीला मोक्षाकडे वळावेच लागेल किंबहुना अलीकडे जू-धर्मामध्ये हादिस हा एक संप्रदाय कळत नकळत मोक्षाच्या दिशेने जातो की काय अशी शंका येणे इतपत वाटचाल करतो आहे त्यामुळे आज ना उद्या हरारी या दिशेने जाईल पण सध्या तरी तो ही धार्मिक चौकट घेतो आहे आणि त्या आधारे इस्त्राईलच्या काही गोष्टींना प्रमोट करतो आहे आणि काही ठिकाणी रिव्हॅल्युएशन मागतो आहे 

पुढे जाऊन मग अर्थातच टेररिझमच्या संदर्भात मांडणी करणे अटळ बनते उत्तर आधुनिकतेने दहशतवाद हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक प्रश्न म्हणून पाहिला पण चौथ्या नवतेमध्ये मात्र तो इतका झिरपला की तो वैयक्तिक आयुष्यात आला माझ्या बांधकाम चालू आहे या काव्यसंग्रहामध्ये यासंदर्भात अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि चॅनेल लव हॉरर अँड टेरर या काव्यसंग्रहात सुद्धा अनेक गोष्टी आलेल्या आहेतच वेगवेगळ्या प्रसिद्ध प्रकाशित काव्यसंग्रहात काही कविता आहेतच कारण चौथ्या नवतेमध्ये दहशतवाद ही फक्त धार्मिक गोष्ट राहत नाही तर मुळात ती वैयक्तिक होत जाते मोहम्मद अली जिना यांनी पुरोगामी दहशतवाद मांडलाा आयातुला खोमेनी यांनी उत्तराधुनिक दहशतवाद मांडला आणि आता अल कायद्याने चौथ्या नवतेचा दहशतवाद मांडलेला आहे यामध्ये सर्वात गाजलेला अमेरिकेवरचा ट्विन टॉवर अटॅक होता ज्याचे जगभर पडसाद उमटले आणि साहजिकच सर्वच विचारवंतांना त्याविषयी चर्चा करणे आवश्यक बनले माझ्या कव्हीं या काव्यसंग्रहात त्यामुळेच आयातुला खोमनी आणि ट्वीन टॉवर वरचा अटॅक या दोन्ही घटनांच्या वर कविता आहेत 

पुरोगामी दहशतवाद हा पुरोगामी राष्ट्र निर्माण करण्यासाठी केला जातो जिना यांची स्वतःची अशी खात्री होती की हिंदू हे अत्यंत मागासलेले असून ते पुरोगामी नाहीत उलट पुरोगामी वादाला इस्लाम हा जास्त पूरक आहे जी त्यांची गैरसमजुत होती अगदी अशाच प्रकारे धार्मिक तत्वावर आधारित आपणाला इस्रायली ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेले दिसेल बहुतांशी उत्तर आधुनिक विचारवंत हे ज्यू असल्यामुळे साहजिकच इस्त्राईलच्या निर्मितीला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला कारण त्यांची स्वतःची सिक्युरिटी त्यामध्ये होती हरारी ही याला अपवाद नाहीत परंतु कळत नकळत अमेरिका ही ज्यू लोकांची सेकंड ज्यू भूमी असल्यामुळे ती इस्त्रायलला नेहमी प्रोटेक्शन देत असते उत्तर आधुनिकता त्यामुळे नेहमीच ज्यू धर्माला पूरक राहिलेली दिसते भारतात ब्रााह्मण धर्माला अशा प्रकारचे प्रोटेक्शन क्षत्रिय वर्ण देतो अगदी वैचारिक पातळीवर सुद्धा सदानंद मोरे यांच्यासारखे लोक स्वतःला क्षत्रिय घोषित करून ब्राह्मण धर्माालाा व वर्णाला व्यवस्थित संरक्षण देत असतात या नात्यामुळे साहजिकच चौथ्या नवतेत शैव धर्माची पुन्हा एकदा नवीन मांडणी करायची वेळ आली आहे. त्याची पार्श्वभूमी अर्थातच पुरोगामी कालखंडामध्ये शैव धर्माने जे केले त्यात आहे ह्या कालखंडामध्ये मात्र शैव धर्म पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिलेला होता कारण त्यामागे बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराज संभाजी महाराज होळकर आणि महात्मा फुले यांचे अथक प्रयत्न होते हरारीला आधुनिकतेसंदर्भात असे काही करण्याची गरज भासली नाही त्याला ऑलरेडी आधुनिक आणि उत्तर आधुनिक ज्यू वारसा आहे त्यामुळे साहजिकच तो अधिक स्पष्टपणे चौथ्या नवतेची भूमिका खुलेपणाने मांडू शकतो मात्र बेसिक कडे जाण्याची गरज त्यालाही भासते 

मुळात जी भूमी एकेकाळी  डायनासोरची वस्तीस्थान होती ती आता पॅलेस्टाईन आणि ज्यू यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे अशी मांडणी करत तो पुढे सरकत असतो कारण त्याला हे आता हमास आणि इस्त्राईल यांच्यातील युद्ध संपुष्टात यावे असे वाटत असते कळत नकळत आत्ताचे वातावरण हे कट्टर धार्मिक आहे असे त्याला वाटत असते आणि तो काही मधला मार्ग काढता येईल का ते चाचपत असतो शांती प्रस्थापित कशी करता येईल ते चाचपत असतो प्रश्न असा आहे की संपूर्ण चौथ्या नवतेचाच हा लोच्या आहे काय? 

कारण एकीकडे कट्टर धार्मिक उन्माद आहे आणि दुसरीकडे नव्याने निर्माण झालेले चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान आहे यातील ज्यांना चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान निवडायचे आहे त्यांच्यापुढे जो पेच निर्माण होतो तो स्पेशल चौथा नवतेचा पेच आहे यावर एक उपाय म्हणून संपूर्ण नास्तिकता स्वीकारत धर्म संपूर्णपणे नाकारत पुढे जाता येते परंतु हे पुढे जाणे  नकळत इस्लामवादाला प्रोत्साहन देते जरा सर्वच धर्मावर चौफेर हल्ला झाला तरच हा धर्माविरोधात असलेला हल्ला यशस्वी होऊ शकतो पण आपल्याकडे काही अतिशहाणे पुरोगामी लोक सेक्युलर दृष्टिकोनातून मांडणी करताना इस्लामची बाजू मांडत बसतात आणि ते मांडताना अल्पसंख्यांक वादाला ते उत्तेजन देतात त्यांच्या अधिकारांना उत्तेजन देतात त्यामुळे हा मार्ग अंतिमता इस्लामच्या इस्लामीकरणाला पूरक ठरत जातो आणि यामुळेच अधिक सावळा गोंधळ वाढलेला आहे किंबहुना पुरोगामी लोकांची जी दिशा आणि दशा झालेली आहे ती यामुळे झालेली आहे लोकांचा पुरोगामी लोकांच्यावर विश्वास उरलेला नाही कारण ते इस्लामच्या मागे ठाम उभे आहेत अशी त्यांची समजूत आहे किंवा कदाचित लोकांचे बरोबर असलेले आकलन आहे पुरोगामी लोक हे सर्व काही स्पॉन्सर केलेले आहे असे म्हणून मखलाशी करत बसतात आणि सामान्य माणसं ही काहीतरी बिनडोक असतात आणि हिंदुत्ववाद्यांना ती मॅनेज करणे फार सोपे जाते वगैरे गैरसमजुती बाळगून आपला डिस्कोर्स रेटत असतात प्रत्यक्षात लोकांनाच इस्लामचे भय वाटत आहे हे यांच्या लक्षात येत नाही आणि हे भय त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेले असते याची ते साधी दखल सुद्धा घेत नाहीत त्यांना वाटते की गोळवलकरांची पुस्तके वाचून सामान्य माणूस बिथरला आहे 

इस्त्राईल बाबत असे काही होत नाही त्यामुळे एका अर्थाने हरारी काही गोष्टी साफ बघू शकतो मांडू शकतो एका अर्थाने चौथी नव्हता जितकी भारतामध्ये धर्मामुळे डागाळली जाते तितकी इस्त्राईलमध्ये डागाळली जात नाही आणि त्याचा फायदा कळत नकळत हरारीला मिळतो 

श्रीधर तिळवे नाईक

 चॅनेल ज्ञा 

तुझ्यासाठी लायक बनण्याची प्रक्रिया 

आणि तिचं प्रेशर 

प्रत्येक हाडावर 

तळमळीचा स्टॅमिना टिकवत 

मी धडपडतोय 

तुझ्या डोळ्यातील त्या होकाराला 

जो फक्त माझ्यासाठी असेल 


आयुष्याच्या अँप्युटेशनचे प्रयोग माझ्या फोकस्ड चालण्यात 

मुंबईचे आयझोमर्स सर्वत्र 

जाणार तरी कोठे ?

आयुष्य थोडंच पायमोजा आहे 

सुपरइम्पोझिशन एक सारखं असायला ?


बिल्डिंगा किंचाळत नाहीत आताशा 

कान पेनिट्रेट करणारी किंचाळी थाटून मॉडेलसारख्या बसतात 


मी हात उंचावतोय होकाराचा 

समोरचा नकार डाऊन करत 

शटर तोंडावर मारत 


"निदान घरात ऑफिस घेऊन येतो म्हणून भांडायला 

ऑफिस कमव"


मी जिथे जातो तिथे शून्य निर्विकारपणे हाकलले जाते 


ह्या देशाला मुमुक्षु फक्त आश्रमात हवेत 

ऑफिसमध्ये नकोत 


जुन्या गोष्टी निगुतीनं मरायच्या 

नव्या थेट युजलेस म्हणून फेकल्या जातात कचऱ्यात मरायला 

नव्या जागा ह्याही अशाच 

तात्कालिक कॉन्ट्रॅक्टवर कितीकाळ काम करणार 

आणि कचऱ्यात कितीवेळा जाणार ?


बुद्धिमान माणसं कुणालाच नको असतात ह्या देशात 

ज्याला त्याला दास हवेत 

सरंजामदारी मानसिकता 

आधुनिक कपड्यात 

कार्पोरेट फेफड्यात 


मी फाफडा खात खात फाफडतोय फाफलत 

कफल्लत 


घरी परतावंसं वाटत नाहीये मला 

पण रस्त्यावर थांबून तरी 

कोणता समुद्र कमावणार आहे ?

 

मी घरात शिरतोय फ्लॉप चेहरा घेऊन 


तुला वाटतंय 

मी बूट पुरेसे झिजवलेले नाहीत  


मी झिजलेले पाय तुला दाखवत नाही 

बुटात लपवतो 


श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

Saturday, June 9, 2018

श्रीवाहिनी हे फेसबुकवर सादर केलेले महाकाव्य संपले सोमवार ते रविवार अश्या सात दिवसातील घडामोडी न्यूज चॅनेल प्रमाणे सादर करत २० थिम्स हाताळणे असे त्याचे स्वरूप झाले होते हे ठरवून झाले न्हवते तर लिहिता लिहिता झाले होते एखादा लेखक एखाद्या संस्कृतीला पेलत नाही किंवा त्या संस्कृतीतील साहित्याचे ठेकेदार तो पेलू देत नाही म्हणून त्या लेखकाने थांबून चालत नाही त्याने आपले काम नीट करणे गरजेचे असते मराठीत दोन्ही बाजुंनी गोंधळ असतो स्वतःला कलावादी , संरचनावादी वा सहिंतावादी म्हणवणारे समीक्षक लेखकही केवळ निखळ संहिता वाचून मत बनवत नाहीत तर स्वतःचे हितसंबंध बघून मत बनवतात तर सामाजिक बांधिलकी मानणारे लेखक समीक्षक युरोपियन प्रबोधनाने स्पॉन्सर केलेल्या विचारप्रणालीत अद्यापही रांगत आणि रंगत असतात ह्यांच्या वैचारिक बाललीला ह्या प्रचंड बोर करतात अशावेळी चौथ्या नवतेला मिळणारा अल्प प्रतिसाद हा गृहीत धरावा लागतो . ज्या मोजक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचे आभार

ह्या महाकाव्यातील मुख्य  थिम्स पुढीलप्रमाणे होत्या

१ बातम्या देण्यापुर्वीची मानसिक हालचाल आरंभ
२ फेक न्यूज ,बाबरी मशीद, जाहीर रित्या घेतलेल्या चुंबनाचा वाद , ज्योतिषशास्त्र , बाबालोक व अनुयायी , लेखन आणि अभिनय व पोस्टमॉडर्निझम  या विषयावरील सात दिवसाच्या बातम्या
३ फॅशन आणि किचन
४ कॉलेज जगत आणि तरुणाईचे स्वगत
५ रुईया कॉलेजमधील रोमान्स
६ जे एस हॉल मधील रोमान्स
७ मीरारोड दहिसरमधील लिव्ह इन रिलेशनशिपमधील रोमान्स
८ स्पोर्ट्स
९ वर्किंग प्लेस
१० चौथी नवता
११ कविता आणि सॉंग्ज
१२ मार्क्सवादी व परिवर्तनवादी कार्यकर्त्याची सात स्वगते इंटिमेट इंटीलिजन्स
१३ मुंबईत चाललेली मोबाइलवरची संभाषणे आणि त्यांचा येणारा मोबाईला फील
१४इंटरनेट चॅटिंग
१५मुलाकात INTERVIEW
१६प्रार्थना
१७सिनेमा
१८स्वतःलाच फेस TO फेस करणे
१९मृत्युशय्येवरून सात स्वगते
२० थोडं अध्यात्मिक

ह्या थिम्स सात दिवसांच्या सातत्यात वावरत्या ठेवून १९९२ ते २००७ ह्या दरम्यानची मुंबई जालनगरी व तिच्यातील नागरी जीवन  पेलणे असे ह्या महाकाव्याचे स्वरूप होते असे आता दिसते ह्या संग्रहानंतर  २००७ नंतर माझे अनुभवविश्व पूर्ण बदलले आणि त्यातून थोड्या वेगळ्या कविता जन्मल्या ज्यांना मी नेट सिरीज मध्ये टाकले आहे.

माझा स्वतःचा आणि माझ्या साधनेचा भूतकाळ हा माझ्या लिखाणात विखुरला गेलेला असा अचानक पाहावा लागतो आणि हे मजेशीर असते माझे मित्र माझ्या ह्या कविता ज्या नेटाने टाईप करून वा संकलित करून इथे टाकतायत ते तारीफके काबील ! हे लोक नसते तर माझ्या ह्या कविता इतक्या सातत्याने फेसबुकवर दिसल्या नसत्या . ते मला गुरु मानत असले तरी मी त्यांना मित्र मानतो कारण माझा गुरु वैग्रे भानगडीवर विश्वास नाही . सुदैवाने ते भक्त नाहीत अन्यथा त्यांच्यापासूनही दूर जावे लागले असते . त्यांचे आभार !

अलीकडे मी फार कमी कविता लिहितोय कारण कवितेचा फ्लो थांबलाय क्वचित एखादेवेळी झिरपणी झिरपते . एकेकाळी आपण इतक्या भरभरून कविता लिहीत होतो हेच आता आश्चर्यकारक वाटते आणि साधकाचा टोकाचा एकांत तर त्याला जबाबदार नसावा ना असा प्रश्न पडतो . असो सर्वांचे पुन्हा आभार !

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, March 13, 2018


चॅनेल बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे नाईक 
पोपट 
प्रेम करणं मुश्किल म्हणून तर हा द्वेष 
नागडं हिंडणं कठीण म्हणून तर हा वेष 
विवेक बाळगणं डिफिकल्ट म्हणून तर हा त्वेष 

सत्य शोधण्याऐवजी अफवा उडवणं आसांन 
आत्मा खोडण्याऐवजी शरीर क्रुसिफायणे सोपं 
इजनेस होण्यापेक्षा इजिनेस होणे इजी 

शतक बाळगण्यापेक्षा बाळग दशकाचं बदक 
मोद खाण्यापेक्षा खा कर्मकांडाचा मोदक 
नदी चमकवण्यापेक्षा पी बिस्लरीतील उदक 

हे सर्व नाकारलेस म्हणून तर तुझा पोपट झाला 

एक छान झाले 
काही काळ का होईना 
पण लोकांचे तोते उडवलेस 

श्रीधर तिळवे नाईक 
(चॅनेल बांधकाम चालू आहे ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

एक विचार 
मरताना ही केस लक्ष्यात राहील का ?
मरताना हे दुःख लक्ष्यात राहील का ?

विसर सगळ्याचाच  पडत जातो 
विसर सगळ्यावरच पडत जातो 
विसर सगळ्यांनाच  पडत जातो 

विसर पडल्यानंतर 
काय शिल्लक उभे राहिल ?

जे लोक मदतीला आले त्यांची  नावेच ना ?

शेवटी उरेल ती माणूसकी 
जी तुझ्या मदतीला धावली 

मरताना तीच लक्ष्यात ठेव 
वारताना तिच्यातच वार 
***

मी विठ्ठलावर कविता लिहितोय 
मी  कवितेवर  विठ्ठल लिहितोय 
मी कवितेत विठ्ठल लिहितोय  
मी कवितेने विठ्ठल लिहितोय 
मी विठ्ठलने कविता लिहितोय 

माझ्यावर केस टाकण्यासाठी विठ्ठल कवितेत दाखल होतोय 
मी कविता लिहावी म्हणून कवितेत विठ्ठल दाखल होतोय
मी कविता लिहावी म्हणून 
विठ्ठल 
बांधकाम चालू आहे ही माझी कविता सोबत घेऊन 
निघून चाललाय 

मी बांधकामावर केस झाल्यानंतरही लिहितोय 
मी लिहितोय 
***

विठ्ठल 
विठ्ठल तुमच्यातही  आहे 
माझ्यातही  

केस विठ्ठलाच्यातच चालू आहे 
तुमच्यातून चालू आहे 
माझ्यावर चालू आहे 

पोलीस विठ्ठलालाच शोधतायत 
माझ्यातून शोधतायत 
आणि तुमच्यातून 

कविता विठ्ठलानेच लिहिलीये 
माझ्यातून लिहिलीये 
तुमच्यातून वाचलीये 

विठ्ठल माझ्यातूनच पळतोय 
तुमच्यातून पाठलाग करतोय 

केस विठ्ठलापुढेच चाललीये 
विठ्ठलच लढतोय 
आणि विठ्ठलच हारतोय 

मी निमित्त आहे 
तुम्ही निमित्त आहात 
विठ्ठल निमित्त आहे 

विठ्ठल असे करोडो नैमित्तीक डेली एपिसोड पहात 
विठ्ठलतोच आहे 
***

विठ्ठलप्रश्न 
विठ्ठलही कंडीशनिंग 
भक्तीही कंडिशन्ड 

तुमच्या माझ्यात अग्रीमेंट होऊच शकत नाही 
हे सत्य 

वाळून गेलेली सत्ये आणि त्यांचा पाचोळा मी गोळा करत नाही 

मी शेतकरी 
नवी झाडे  लावतो तीही ऋतूनुसार 

मी ऋत आहे ताओ आहे फ्लो आहे 

माझी कविता ही तर फक्त थ्रो आहे 
जी थ्रू झाली नाहीये 
कारण विठ्ठलही  कंडीशनिंग 
भक्तीही कंडिशन्ड  

विठ्ठल सर्वत्र असेल 
तर तो माझ्या कवितेतही असेल 
आणि तुमची तुमच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी 
त्याने माझ्याकडून 
ही कविता लिहून घेतली असेल  

तुम्हाला हे पेलणार नाही 
कारण विठ्ठलही कंडीशनींग 
भक्तीही कंडिशन्ड 

विठ्ठल सापेक्ष कि विठ्ठल निरपेक्ष ?
विठ्ठल शैव धनगर कि विठ्ठल वैष्णव ?

एकाचा ईश्वर  दुसऱ्याचा सैतान  
एकाचा देव दुसऱ्याचा  राक्षस 
एकाचा सूर दुसऱ्याचा असुर 

चायनाने पाय बारीक केला 
युरोपने रक्ताचा फुटबॉल केला 
पण विठ्ठल मात्र विकेटवरच उभा राहिला 
त्याने शूद्रांना शूद्र ठेवले 
आणि अस्पृश्यांना अस्पृश्य 

शेजाऱ्यावर प्रेम करा 
पण शेजारच्या गावावर हल्ले करा 
इतके वर्तुळबंद चलाख आपण 

शूद्रांना आणि गुलामांना अक्कलच नसते म्हंटल्यावर 
दासकर्म सोपेच कि 
शेवटी जे ते विचार कंडिशन्ड 

विविधता मान्य करावी तरी पंचाईत 
एकतेचा गळा घोटावा तरी पेचप्रसंग 
असंगाशी संग फिक्स 
प्राणाशी गाठ फिक्स 

फिक्सिंग आणि मुक्ति 

तुम्ही केस टाकली 
ह्याचं दुःख नाही 
पण ज्याने केस टाकली 
तो कलावंत असूनही 
त्याने सारासार विचार केला नाही 
ह्याचे दुःख आहे 

"मी ह्याचे चॉकलेट देणार नाही ..... .....  .... 
मी तुझ्याशी "असा वागलास  तर ... " खेळणार  नाही .... ... 
राजा सिलॅबस जसा लिहिलाय तसाच अभ्यास कर 
नाहीतर परीक्षेत नापास होशील .... .... 
माझ्या समोरून चालता हो ...... ....... ......... "

हे सर्व लहानपणापासून 
ऐकतोच आहे कि 
तुम्ही तरी वेगळं काय बोलताय ?

तुम्हाला वाटतंय कि 
मी तुम्हाला दुःखी केलंय 
आणि मला वाटतंय कि 
तुमची जखम सेल्फमेड आहे 

मी कवी लोकांच्यातला ब्लॅक शीप आहे का ?
माझी स्पिरिच्युअल अटीट्युड फक्त 'अटीट्युड ' वाटतो का ?

माझा अहंकार जगजाहीर आहे 
आणि ती माझी खास जागीरही आहे 

जे वाईट 'वाटते' ते 'वाईट ' ठरते 
जे चांगले 'वाटते ' ते 'चांगले ' ठरते 

वाईट पिक्चर पाहून आलेली माणसे 
चांगली कविता जाळू शकतात 

आसपास सर्वत्र फ्लॉप चित्रपटच आहेत का ?

लहान मुलांना दुखवू नये 
समाज हा लहान मुलांचा गोतावळा  आहे का ?

मी कुठल्याही गोष्टीची पिसे काढतो 
कारण मी शहामृग नाही 

मला तुमची लाज वाटते 
तुम्हाला मी तुमच्यात आहे ह्याची लाज वाटते 
पण उद्या आपल्याला लाज वाटली 
ह्याचीच लाज वाटली तर ...... 

माणसे फक्त बुद्धीने  बदलत नाही 
माणसे फक्त कवितेने बदलत नाहीत 
ती बदलली तर फक्त काव्यात्मक बुद्धीनेच बदलतात 

उजळणीत जळणे आहे मग उजळणे आहे 
स्वतःला पेटवायची तयारी करता मग ?

माझा विठ्ठल हा तुमच्या विठ्ठलांच्यातलला ब्लॅक शिप आहि का ?
माझा विठ्ठल ही माझी फक्त स्पिरिच्युअल अटीट्यूड आहे का ?

मी वाद घालत नाहीये 
मी माझ्यातला विठ्ठल खणतोय 

मी तुमच्याशी कायदेशीर  लढाई लढत नाहीये 
मी माझ्यातले आत्मयुद्ध तुम्हाला दाखवतोय 

ह्यात आनंद नाहीये 
ना मला ना तुम्हाला 

माझी जिरवली  तरी 'मी ' थोडाच जिरणार आहे ?
फारतर ह्या रेप बिझनेसला 
रॅप कवितेत ओतेन 

Is The Whole Episode Nonsense ?

Most heated poet किंवा Most hated poet 
बहाल करता मग ?

रेप सेलिब्रेट  करणारा कॅम्प उघडून  
कॅम्पेन चालवता का मग ?

माझ्यावर बॅन लादून 
माझ्या नवतेचे स्फोट थांबवता का मग ?

मी प्रश्न विचारणारा माणूस आहे 
तुमच्या रेडिमेड उत्तरांची पंचाईत करणारा 

माझ्या जिभेची शिल्पे बनवून 
त्यांना शवागारात टांगता का मग ?
आणि आता आजचा प्रश्न विचारतो 

विठ्ठलाची पोझिशन तीच आहे 
कि माझ्या प्रश्नानंतर ती बदलतीये
***

चालून आलेल्या वारकऱ्यास उपदेश 
तू वारकरी आहेस 
हा निव्वळ अपघात आहे 
इंग्लडमध्ये जन्माला असतास 
तर ख्रिश्चन झाला असतास  
किंवा जापानमध्ये बौद्ध 

तू वारकरी आहेस 
हा निव्वळ योगायोग आहे 
माझ्या घरी जन्मला असतास 
तर शैव झाला असतास 

तू वारकरी आहेस 
पण सर्वच वारकरी  नाहीयेत 
अनेकांचा विठ्ठल हा देव नाहीये 

तुला हे सर्व घाबरवून टाकते का ?

श्रद्धा मजबूत असण्याचे दिवस संपले राजा 

विविधता आहे 
आणि तिला बांधकामानेच जोडत ठेवले पाहिजे 
किंवा एक मोठी भिंत 
किंवा एक मोठा प्रसाद 

मुळे हलतायत म्हणून डचमळतोयस कशाला ?
तू थोडाच झाड आहेस ?
विमाने बांधली गेली राजा 
आता ती कल्चरल करायची वेळ झाली 
उठ 
म्हणजे उडायला लागशील 
***

स्टेटस्टीकल 
नव्यान्नव टक्के लोकांच्या मते 
विठ्ठल पळालेलाच नाही 
तो श्रीधर तिळवे ह्यांच्या क्षणभंगुर  कवितेला 
चिरकालीन हास्याने पंढरपुरात बसून नमवतो आहे 

दहा टक्के सामान्य माणसे 
तिळवेंना फाशी दिल्यास 
त्यांना विठ्ठल ही काय चीज आहे ते कळेल 
असे म्हणतायत 

सदतीस पॉईन्ट पाच टक्क्यांच्या मते 
तिळवे दलित असल्यानेच 
त्यांचा विठ्ठलावर रोष आहे 
त्यांना मंदिरप्रवेश दिल्यास 
ते कवितेतून माघार घेतील 

तिळाव्यांना विचारले असता ते म्हणाले 
"ही स्टॅटीस्टीकल खाज आहे 
माझ्याकडे टिनोवेट आहे 
ते देऊ का ? "
***

शोध 
ज्या शोधाचा शेवट होत नाही 
त्या शोधाची मी सुरवात तर केली ना ?

विठ्ठल ही फार डाऊटफूल केस आहे 
म्हणून विचारतोय 

पोस्टमॉडर्नची  रिप्लेसमेंट म्हणून 
विठ्ठलाच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे ?

अलीकडे देव 
भक्त तयार करतोय कि टेरेरिस्ट 
तेच कळत नाही 

जे स्वतःच घाबरलेत 
ते जगाला घाबरवणारच 

जगात कायमच अनेक GOD नांदत होते 
आणि ते एकमेकाला जोडून नव्हते 

त्यामुळे हा पकडला कि तो सुटणारच 
आणि जो सुटला 
तो शत्रू वाटणारच 

बरं पकडलाय तोही आपण स्वतः पकडलाय 
कि आपल्या हाताच्या दावणीला बांधला गेलाय 
हा प्रश्न आहेच 

भुते वाढतायत, करण्या वाढतायत, लिंबू मिरच्या वाढतायत 
विज्ञान फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवतायत  

मी विठ्ठल पकडत नाहीये 
कारण मला 'समग्र ' पकडायचे आहे 

माझ्या आसपास समग्रतेची कापलेली बोटे 
आणि काळी बाहुली 
***

भाषण 
समजा मी आदिमानवाच्या गुहेत गेलो 
आणि विठ्ठलाची पूजा केली चित्रे काढली विठ्ठलाची 
तरी मी आदिभक्त होईन का विठ्ठलाचा 
किंवा विठ्ठल आदिदेव माझा ?

समजा मी तुकारामांच्या मांडीला मांडी लावून  बसलो 
तरी तुकामारामाची कविता मला कळेल का ? किंवा माझी तुकारामाला ?

शेवटी आपण 'आज ' असतो 
'इथे ' असतो 

शेवटी आपला विठ्ठल 'आजचा ' असतो 
'इथला ' असतो 

आपण आज जेन्युईन असू शकतो 
बोगसही 
जंक असू शकतो 
हंकही -
 पण आपण आज असतो ---- म्हणून आज मी विचारतोय 

What's Today's Vithal ?  
Is Viththal spiritual logic of Today's Marathism ?

आपणाला विठ्ठल रेडिमेड मिळालाय 
म्हणून तर आपण त्याला लाइटली घेत नाही ना आताशा ?
विठ्ठल आपले काय करतो ? आपल्यात भक्त तयार करतो 
विठ्ठलाचे आपण काय करतो ? भक्ती करतो ?

भक्ती ही लॉजिकची आत्महत्या असते का ?
कि लॉजिक भक्तीची हत्या  असते ?

आपणाला विठ्ठल म्हणताच स्टॅगनेशन येते का ?
कि स्टॅगेशन येताच आपण. विठ्ठल विठ्ठल करतो ?

आपण मराठी संस्कृति तरंगू  देत नाही का ?
जाहिराती उत्तम चालतायत 
आणि दिंड्याही 

इज गोतावळा वर्किंग इन फेवर ऑफ विठ्ठल ?
विठ्ठलाला आपण काय देतोय ?

शेवटी फेरीवालाही पोलिसांना हफ्ते देत असतो 
तेव्हा इन्डायरेक्टली सरकारलाच टॅक्स देत असतो 

आपण कुणाला स्पिरिच्युअल हफ्ता देतोय ?
आणि कुणाला टॅक्स ?
विठ्ठलाला ?

विठ्ठल हे ग्रॅण्ड नॅरेटिव आहे 
की लोकल नॅरेटिव ?

मी सपाट आहे की अफाट 
हे कसं ठरवणार ? कोण ठरवणार ? की विठ्ठलाच्या वतीने तुम्ही ठरवणार ?

आणि प्रत्येक इन्फॉर्मेशन  टॉवरबरोबर 
तुमच्या सपाटीतून 
मी माझी उंची वाढवतोय 
असं म्हंटल तर.... 

हल्ली कुठलीही गोष्ट मला इलिगल तरी वाटते 
किंवा अनएथिकल 

कुठलेही कंझप्शन क्रिमिनल तरी वाटते 
किंवा उदास तरी 

'एक्सपोज ' हीच मूळ पोझ झाली आहे का ?

मला गुंतागुंत  दिसतीये 
पण कळत नाहीये 
ऍकेडेमिक्स आणि  गॉसिप 
ह्यांच्यात फरक नाही राहिलाय 
म्हणून मी माझी जिज्ञासा 
सोपेपणाला विकू का ?
मी एक क्रूर सुरवात आहे कदाचित 
जिचा शेवट प्रेमळ करुणामय असू शकतो 

मी चालायला   सुरवात तर  केलीये 
आता केस पकडून  माझ्या पाठी लागायचे 
कि माझ्या बरोबर समत्वाने  चालत सत्यापर्यंत पोहचायचे 
हे तुम्ही ठरवायचे आहे
***

श्रीधर तिळवे नाईक 
(चॅनेल बांधकाम चालू आहे ह्या काव्यफाईलीतून )


एक्झीट 
तुम्ही मला कितीही मृत्यूच्या दारात न्या 
मी पाहुण्यासारखा त्याच्या घरात जाईन - राहीन - त्याला खाईन 
आणि पुन्हा  थेट दारातून 
आयुष्याच्या घरात रहायला येईन 

माझी कविता पैश्याच्या  तालावर नाचते ?
हो नाचते 
पण पैश्याच्या उरावर नाचते आणि पैश्यातून परततेही 

कविता लिहिताना मी मार्क्सवादी नव्हतो 
म्हणून हे सांगतोय 

अर्थशास्त्र  चुकले म्हणून काव्यशास्त्रानेही चुकले पाहिजे 
असं कुठं लिहिलय ?

सत्य राज्याच्याद्वारे माझ्यावर चालून येतय 
म्हणून का मी सत्तेला  प्रतिष्ठा द्यावी ?

मी सत्याला प्रतिष्ठा देणारा माणूस आहे 

सत्यच सत्याला निर्माण करू शकते 

म्हणून सत्याचे उत्पादन अशक्य आहे 
तेव्हा केस टाकून गर्दीने गोळा केलेले  सत्य मी मान्य करेन ह्या भ्रमात राहू नका 

लिहा 
माझ्या विरोधात लिहा 
मला जाणता लिहा 
मला वाचता लिहा 

आपल्या रक्तातच स्वार्थ  आहे 
आणि आपलं काळीज 
रक्ताशिवाय लिहिताच येत नाही 

माझी विरचनाही महारचनेसाठी असते 
तिच्याही विरोधात  लिहा 
आणि हा विरचित काळजांचा हैदोस 
असाच चालवत रहा
पण चालवताना लक्ष्यात ठेवा 
बुंदसे  जो जाती है 
 वो हैदोससे वापस नही आती 

माझ्यावर केस टाकणारा  क्षण कुरूप होता - मान्य करा 
किंवा तो क्षण 
अधिकच कुरूप करा
मग ती कुरूपता 
सामूहिक करा - पुढे जा 
आणि आख्खा समाज
 'कुरूप एकसंधतेने नटलेला समाज ' 
करा 

नटवा स्वतःला, इतरांना, सगळ्यांना 

नटवा आणि नट व्हा 

मी अभिनयातून "EXIT" घेतोय 
***

म्हणून म्हणतो  
रजनीश पण आहे आणि टेररिस्टही 
कृष्णमूर्ती पण आहे आणि विठ्ठलही 
साई पण आहे आणि सत्यसाईबाबापण 

हे सगळं नाकारून 
मी शोधतोय समग्र होकाराचा अर्थ 

मी स्वतःच एक पुस्तक आहे 
आणि मी स्वतःच निरक्षर आहे  

निरक्षरता जी माझ्यात आहे 
निःअक्षरतेचा महामार्ग असेल कदाचित 

Desemiotisation चा उकिरडा तिच्या शेजारी 
कोकसारखा दिसला म्हणून 
थोडाच माँ की कोख होणार आहे ?

हे  जग रोम आहे कि रूम ?
हा जगण्याचा डान्स रोमान्स आहे कि चान्स ?

जगाला केंद्र नसेल 
तर माझ्या जगण्याचे केंद 
मी माझ्यात जगेन 
आणि जगवेन 

मी भ्रमावर बसणारा भ्रमर नाही 
मी ग्रामर मास्टर करणारा ग्रुमरही नाही 

मी भाषा आहे आणि भाषेचा मालकही 
मी स्वतःला विठ्ठलाकडे गहाण टाकलेले नाहीये 

माझ्या डोक्यावर मुळात टेन्शनचे एवढे कर्जच नाही 

मी विचलित करणारे अर्थचलन  आहे 
माझी मुख्य अडचण मीच आहे 

मी डूमवर विश्वास ठेवणारा डूमर ही नाही 
मी बुमवर विश्वास ठेवणारा बुमर ही नाही 

मी आडवा पडतो 
आणि उभ्याने वाढतोही 

मी सपाट  होतो 
आणि खोलात प्रगाढतोही 

मी 'मी ' विरुद्ध लावला गेलेला  ह्युमन बॉम्ब आहे 

मला विठ्ठलाला बांधू नका 
मला भक्तिला टांगू नका 

मी कलेच्या तलवारीने लढतोय 
आणि कलेकलेने वाढतोय 

मी जाळेच असे बांधतो आहे 
कि ज्यात मी ट्रॅप होत नाहीये 

माझे उंदीर  मांजरांना कुरतडतायत 

म्हणून म्हणतो 
आडवे नका जाऊ 

आडवे व्हाल 
आणि माझा क्रूस आकाशापर्यंत व्हर्टिकल होत   
तुमच्यावरून  सहज चालून सत्यापर्यंत पोहचेल
***

दोन तर चॉईस आहेत 
कुटुंब किंवा मोक्ष 

समाजाने स्पॉन्सर केलेला मोक्ष 
ह्यात आहे कुठे ?

समाज ईश्वराचीही सोमिओडीटी बनवतो 
म्हणून मीही सोमिओडीटी बनू ?

जो कमोडिटीही बनला नाही 
तो सेमिऑडिटीं  काय बनणार ?

स्वतःला शाबूत  ठेवण्याची विद्या 
माझ्यात जन्मजात आहे 

ठीक आहे 
तुमच्या हातात सत्ता आहे 
कायदा आहे 
पोलिस आहेत 
पण म्हणून माझ्या कवितेला  लोटांगण घालायला लावू ?

तुम्ही माझ्या पार्टनरला फितवलं म्हणून 
स्वतःचं काळीज  तुमच्या रक्तात मिसळू ?

कागद उजाडला  म्हणून काय झालं  
मी त्वचेवर कविता लिहून 
तिचे फोटो प्रकाशित करेन

लेखणी तुटली म्हणून काय झाले  
मी रक्त भरून 
त्याची शाई बनवून 
कवितेचा टॅटू सर्वांगावर उमटवेन  

मी मोक्षाच्या मागे आहे 
यशस्वी होणाऱ्या नवसाच्या मागे नाही 

देवाचे आशीवार्द तुम्हाला लागतात 
मला तर आख्खा देव लागतो 

मी चाललोय  मुक्त स्वतंत्र 
आणि माझी पशुसारखी दिसणारी सावलीही 
दैवी बनत  
माझ्या मागोमाग येतिये 
***

समाधान  
 मला व्हाया ज्ञानेश्वर 
व्हाया नामदेव 
व्हाया एकनाथ 
व्हाया तुकाराम 
                                विठ्ठलापर्यंत पोहचायचेच नाहीये 
मला व्हाया विठ्ठलही 
                               सत्यापर्यंत पोहचायचेच नाहीये 
मला सत्याचे थेट दर्शन घ्यायचे आहे 

मला सर्वच पंथ प्रदर्शन वाटतात 
म्हणूनच कुठल्याही दिण्डीत सामील होता 
मी एकटाच चालतो आहे 

कदाचित विठ्ठल मला पावणार नाही 
कदाचित सत्य मला दिसणार नाही 

पण मी माझ्या पावलांनी माझ्या अटीवर 
मीच तयार केलेल्या वाटेने चालतो आहे 
हे सुख काय कमी आहे

माझ्या ह्या एकचालीला तम्ही बदचाल म्हणू शकता 
शेवटी हे युग समूहचालींचे आहे 
आणि मी ते माझ्या पावलांनी वितळवत 
त्याच्या धातूने आत्ममुद्रा घडवत 
सगळीकडे  खुळखुळतो  आहे

माझा आवाज मोठा नाही 
पण प्रामाणिक आहे 

माझा गळा त्याने समृद्ध  होतो आहे 
आणि माझा पायरव  त्याची बोटे पकडून 
सत्याच्या दिशेने चालतो आहे 

मला सत्य मिळो ना मिळो 
माझा आवाज मला माझ्या गळ्यात मिळाला
ह्यातच मला समाधान आहे 
***
संवाद 
मी चीड आणणारा भक्त आहे 
कारण मी देवही संशयास्पद करतो 

तुम्ही भीड बाळगणारे भक्त आहात 
कारण तुम्ही देव श्रद्धास्पद करताहात 

मी निर्भीड  आहे 
म्हणूनच माझ्या आसपास भीड नाहीये 

तुम्ही भीड आहात 
म्हणूनच तुमच्या आसपास मी नाहीये 

ही केस 
आपणाला जोडतीये  
मात्र हा संवाद आहे कि विवाद 
हे मला ठाऊक नाही 

पुलाचे बांधकाम चालू आहे 

मी केऑस लांबणीवर टाकत नाहीये 
फक्त त्यातील पूर्वग्रहाचे  विष काढून टाकण्याची 
युक्ति शोधतोय 

जिथे दातच दंतकथा बनून गेलेत 
तिथे कविताही ज्युसेबलच लागणार 

माझी  शैलीच अशी कि 
मी वाचकांना  खडे चघळायला भाग पाडतो 

पुन्हा पुन्हा चावायला लावणारा लेखक 
कुणाला  आवडेल ?

मी मराठीत लोकप्रिय नाही 
आणि दखलपत्रही नाही 
त्यामुळेच मी तुमच्यात  दाखल होण्याची शक्यता सुतराम नाही 

तुम्ही मला टाळून पुढे का जात नाही ?

MOST HATED POET  च्या पोस्टरवर 
माझा फोटो कशाला 
मी द्रष्टा आहे 
हा माझा गैरसमजही असू शकतो 

मला टाळून 
सरळ पुढे जा ना 

बघा मी नुस्ते म्हंटले 
आणि भराभर सर्वत्र हिरवे सिग्नल पडले 

जा 
फक्त माझ्या अंगावर गाडी घालून जाऊ नका 
म्हणजे झालं  
***

डाऊनलोडिंग 
                    ।। ।।
केवळ पोस्टमॉडर्निझमला शह म्हणून 
मला नवा मेगॅयुटोपिया रचायचा नाहीये 

मला फक्त नवे क्षण 
नव्यानेच जालवत 
स्वतःला सर्वत्र विणायचे आहे 

मला माझ्याकडे केऑसचे ऑर्केस्ट्रेशन करून  
नव्या साऊंडची ध्वनीनिरपेक्ष शांतता साधायचीये शांति साधायचीये 

शक्यता नापास झाल्या म्हणून 
त्यांच्यावर प्रयोग करणे मी 
थोडेच थांबवू ?

मीडियाटिक वास्तववाद 
पोर्नोग्राफिक वास्तववाद 
नंगानाच घालतायत म्हणून 
मी थोडाच स्वतःचा ट्रान्सडन्स बंद करू ?

माझ्या आत एक ट्रान्सबाला आहे 
जी नाचते 
आणि हे  नवे युगही वाचते 

तिचे हावभाव क्वोटेबल नाहीत 
मेजरेबल तर मुळीच नाहीत 
फक्त मुमेंटेबल आहेत 
आणि मुमेंटफ्रेंडलिही आहेत 

तिचा आउटगोईंग एफर्ट 'रटाळ ' इरेझ करत जातो आहे 
तर तिचा इनकमिंग इफेक्ट 'मेंदू ' रिचार्ज करतो आहे 

'मी ' अनेक आहेत - रिचार्ज्ड - डिस्चार्जड - कायम चार्जड - माझ्या मेंदूत 
आणि 'मी ' ह्या शब्दाला पर्याय नाही 
म्हणूनच  अनेक 'मी ' च्या तोंडानी मी /आम्ही बोलतोय 

माझे पोस्टर तुम्हाला भेटणार नाही 
कारण पोस्टमॉडर्निझम सर्वाना पोस्टर बनवत असताना 
मी स्वतःची डिजिट्रेट्स बनवत होतो 
आणि डी जे  बनून वाजवत होतो 

लोक म्हणालेही कि किती आत्मकेंद्रित हा 
स्वतःचीच लाल करतो 
त्यांना माहित नव्हते  कि 
ते त्याच  रंगात रंगतायत 
ज्या रंगात मार्केट त्यांना स्पॉन्सर करतंय 

         ।। ।। 
मी नगरकर ही आहे खेडेकरही 
उड्डाणही आहे आणि चट्टानही 

मी चांगदेवानी पाठवलेला कोरा कागदही आहे 
आणि ज्ञानेश्वरांनी  ज्या हाताने भिंत चालवली तो हातही 

माझा आशय पहा 
मी माझे गर्भाशय इनडिटेल त्यात मांडले  आहे 

मी मुळांना हात घालतोय 
कुळांना लाथा 
माझे  घराणे केवळ श्वास घेत नाहीये 
ते आख्खे वातावरण इकोफ्रेंडली सुरात गाते आहे 

मी माणसाचे पाणी ईश्वरावर शिंपडून त्याला जिवंत करतोय 
माझ्यात दोघेही जिवंत होतायत 

मी अनेक विटांवर अनेक  कटीवर 
माझे अनेक हात ठेवतोय 
आणि एक  डिजिटल भाषा 
एका नव्या युगाचा नवा अभंग  म्हणून 
मला तिच्यात डाउनलोड करतीये 
***

घर सोडताना 
घर सुटताना हे केसमुळे सूटतय ह्याचं दुःख 

घराला आगगाडी  म्हणतानाही 
हे घर आपलं आहे 
ह्याची उबदार जाणिव 
खणखणत तोल सांभाळायची 

फुलांनी  धक्का दिला तर सुवास घर सांभाळायचा  
खिडक्या गरम झाल्या तर वारा गारवा ओतत जायाचा

आपण दोघेही  पाऱ्यासारखे एकाच थर्मामीटरमध्ये अडकून 
आता निघतोय 
तर ताप तडकतोय 

विखुरलेल्या वैभवाचे अवशेष शोधत 
निमर्नुष्य जगायला लागलेलो नुक्तेच आपण 
आणि आता हा समूह 
टोळ्यांच्या तडजोडींना आपण दुखावले म्हणून  
आपल्यावर चालून 

कुठलेच नाते एवरग्रीन नसते 
जे हिरवे  असते ते पिवळे होऊन गळून पडते 
ऋतूसंहाराचा शेवटचा धडा वाचताना 
हे केसचे नवीन पुस्तक ?

निळ्या लाटावर चुंबन लिहिणारे तुझे ओठ वाळतायत 
तुझे श्वास नाकात फ्रिडम स्ट्रगल करतायत 

परफ्युम शोधता हे नरक का उगवले 
की स्वर्गाच्या सुवासाचा हा कायदेशीर कावा आहे ?

ताटातून ताटातूट  आवाज करतीये  
निरोप पुनर्भेटीविषयी साशंक आहे 

मी घर सोडतोय 
कि समुद्र दोन्ही हातांनी उधळत 
स्वतःला वाळवंटावर क्रुसिफाय करतोय ?
***

तू  

माझी बुडणारी कविता तरंगायला 
मी काही तुकाराम नाही 
आणि तुही नाहीस त्या तुकारामाचा विठ्ठल  

ही केस तरंगेल की बुडेल 
मला माहित नाही 

मी घाबरलोय असेही नाही 
फक्त माझ्या आवाजाला गेलेला तडा 
माझा गळा कापेल 
ह्या प्रश्नाने संशयित  आहे 

श्वास तुकारामाच्या नावाने आत येतायत 
आणि फुफ्फुसं  स्फोटक होत उन्हाळा वाढतायत 

मी मरतोय तरंगतोय 

भोवताली रद्दीची इंद्रायणी 
आणि माझ्याच फुफ्फुसांनी मला लावलेली अभंग आग 
***

देव 
मी गणपतीपुढे बहाणे शिलगावले अभ्यास  करण्याचे 
हनुमानापुढे खोट्या  उड्डाणाची नाटकं  केली आणि सूर्याचे कपडे काढले 
मी बिरोबापुढे  कंटाळवाण्या दफ्तराचे शिरकाण केले  
रामापुढे धोकादायक भुतांची ऐतिहासिक भुताळसेना पळवून लावली 
मी दत्तात्रयांपुढे सर्व विषयांची कुत्री बांधून त्यांचे भुंकणे पहिले 

प्रत्येकवेळी मी सेफच राहिलो 
आणि मला खात्री होती 
देव माझी सेफ्टी कधीच धोकादायक करणार नाहीत 

देव होते माझ्यासारखेच निरागस 
आणि माझ्या स्टिकरसारखेच जवळ बाळगावे इतके सुंदर 

मी काहीही केले तरी 
ते कधीच माझ्या बालपणावर कोपले नव्हते 
त्यांचा कल्ट खेळकर  आणि गंमतदार होता 

आज त्यांचा कल्ट मला सोडून चाललाय 
माझ्या आतील बालपण सपाट होत चाललंय 
वाटतंय की माझ्या आतील देवांचा मर्डर झालाय 
 आणि त्यांची शवे भक्तांपुढे सरेंडर  होऊन  
श्वासात फम्बलतायत 

मी केसच्या कागदपत्रांच्या ढिगात 
ढगासारखा बसून फम्बलिंग पाहतोय 
निगेटिविटीचा तडका माझ्या  रक्ताला डसत चाललाय 

मी सोंग करतोय 
कि मी काहीच गमावलेले नाही 
आणि माझे देव 
माझ्या डोळ्यांपुढून स्वतःची आत्महत्या  
जिवंतपणाचा कसलाही आवाज करता 
भक्तात रेटत 
माझ्यातून नाहीसे होतायत 

मी देव गमावतोय 
आणि भक्त 
त्यांनी कमावलेला देव 
माझ्यावर लादत 
ताकद कमावतायत 
***

अश्लीलतेचा काळोख माझ्या अंगावर टाकून 
मला लोक सांगतायत 
ही लाइमलाईट प्राप्त करण्यासाठी  कॉन्स्पीरसी आहे 

माझ्या शोकात्मिकेचे सेटिंग लावून 
लोहार निघून गेला 
दुष्ट परिणामांच्या पुलाखालील  पाण्यातून 

मिडिओक्रसी टिकवणारे कुठल्या सनातन लोणच्यातून 
जन्म  घेतात कुणास ठाऊक 
हे काहीसाठी चविष्ट काहींसाठी बेचव 

माधव नावाचा नेब्युला जाणीवपूर्वक उजळणी भडकवतोय पत्रकारितेतून 

अश्लीलतेच्या आतील पवित्रता कुणालाच दिसत नाहीये 
काळोख काळे गुलाब स्पॉन्सर करतोय 
आणि कवितेचा दगड उमलण्याचा हट्ट कायम राखत 
सर्वांगाने झुंजतोय 

त्याचा  परमेश्वर होणार की नाही माहिती नाही 
पण तो 
एका बांधकामाचा पाया होईल  हे नक्की 

बांधकाम चालूच आहे
आणि ते ह्या निरव शांततेतही फक्त मलाच ऐकू येतंय 
***