Saturday, July 25, 2026

चॅनेल स्पिरिच्युअल ह्या

 लोक श्रीधर तिळवे नाईक 


 १


लोक खूप स्ट्रॉंग असतात 

त्यांचा उथळपणा खूप स्ट्रॉंग असतो 


त्वचा पाहणारे त्यांचे डोळे विकट असतात 

जे बिकट न पाहता 

सरसकट पाहतात 


तू त्यांचे काय करू शकतोस ?



लोक व्यवस्था बनवतात 

तिचे काहीही करता येत नाही 

लोक धर्म बनवतात 

त्याचे काहीही करता येत नाही 

लोक कार्पोरेट बनवतात 

त्यांचे काही करता येत नाही 


लोकांचे काहीच करता येत नाही 

कारण लोकांच्याकडे लोकसंख्या असते 



लोकांची शाही आली कि 

लोकांचे प्रश्न सुटतील 

असं तुला वाटलं होतं 


आणि लोक त्यांच्या शाहीतही 

देव आणि राजे वसवत राहिले 

नेते आणि अभिनेते देव्हाऱ्यात बसवंत राहिले 


लोकांच्या शहाणपणावर अनेक अफवा बेतल्या गेल्या 

आणि शेवटी गंज सापडल्यावर कळले 

मेटल्स नाहीसे झालेत 



एक आयुष्य 

लोकांच्या कल्याणासाठी वेचलेलं 

लोकांच्या मूर्खपणात वाया गेलं 


आता ह्या आयुष्याचं 

तू काय करणारेस ?



लोक 

त्यांच्यासाठी वाया गेलेल्या आयुष्याचे फोटो बनवतात 

किंवा पुतळे 


एरव्ही लोकांना त्यांच्यासाठी वेचल्या गेलेल्या आयुष्याविषयी 

काहीही देणेघेणे नसते 


लोक स्वार्थी असतात 

आणि लोकांचा स्वार्थ ज्यांना वापरता येतो 

त्यांना ते नेते बनवतात 


तुझा निस्वार्थीपणा 

हा त्यांच्यासाठी फक्त चेष्टेचा विषय आहे 

तेव्हा हे वाया गेलेले आयुष्य नीट गोळा कर 


समाधी लाव 


लोकांच्यातून 

त्यांच्या नीचपणातून मुक्त होण्याचा 

आणि त्यांच्या मूर्खपणाला माफ करण्याचा 

सर्वोत्तम उपाय 

मोक्ष आहे 


श्रीधर तिळवे नाईक 


{चॅनेल सिरींजमधील चॅनेल स्पिरिच्युअल ह्या काव्य फाईलीतून }

Wednesday, January 29, 2025

 चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी १


महाराष्ट्रात अलीकडे युवाल हरारी याची चर्चा जोरदार चालू आहे याचे कारण अमेरिकेतल्या पॉप लिटरेचरची एकंदरच जगभर असलेली लोकप्रियता आहे अत्यंत सोप्या भाषेत वैज्ञानिक सत्य सांगणे हे सायंटिफिक पॉप लिटरेचरचे वैशिष्ट्य असते ते हरारीच्या लेखनामध्ये ओतप्रत भरलेले आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आश्चर्यकारकरीत्या हे करताना तो व पु काळ्यांच्याइतकाच लाघवी असतो साहजिकच अशा प्रकारचे वाचन करणाऱ्या लोकांना तो एक देवदूत वाटला तर आश्चर्य नाही 


आमच्या पिढीने चौथ्या नवतेचे काही प्रश्न निर्माण केले त्यांची स्वतःच्या डाटा उपलब्धतेनुसार उत्तरेही दिली आणि हे प्रश्न आता अधिक व्यापक डाटा घेऊन दुसऱ्या पिढीत सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणे झिरपलेले आहेत हे आपणाला हरारीच्या लेखनावरून स्पष्टपणे प्रतीत होते मराठीत त्याचा अनुवाद होतो हा नेहमीच मला पॉझिटिव्ह इव्हेंट वाटत असतो याचे कारण मराठीमध्ये चौथी नवता पसरवायची असेल तर असे सर्व वैज्ञानिक पॉप लिटरेचर अनुवादित होणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्या भोवताली काय चालले आहे हे नीट समजून घेईल मला नेहमीच या गोष्टीचा आनंद होतो की चौथ्या नवतेच्या दुसऱ्या पिढीतील प्रणव सखदेव हे अत्यंत ताकतीने त्याचा अनुवाद करत आहेत


कुठलेही तत्त्वज्ञान जेव्हा उदयाला येते तेव्हा ते अत्यंत किचकट असते उदाहरणार्थ जिला आज आपण उत्तर आधुनिकता म्हणतो ती प्रथम फ्रेडरिक Nietzsche याने अत्यंत व्यवस्थित मांडली परंतु त्याच्या समकालीन लोकांना ती झेपलेली दिसत नाही कारण त्या काळामध्ये उत्तर आधुनिक विज्ञान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले नव्हते पुढे आईन्स्टाईन मुळे सर्व गोष्टी सोप्या होत गेल्या आणि Nietzsche काय म्हणतो हे अधिक नीट समजत गेले पुढे मग उत्तराधुनिकता नीट समजावून सांगणाऱ्या पॉप लिटरेचरची निर्मिती व्हायला लागली फार प्राचीन काळापासून युरोपमध्ये ही प्रथा आहे आणि सोफिस्ट लोक ती नेहमीच चालवत आलेले आहेत अलीकडे तर या लोकांचे मूळ सॉकॅटिस मध्ये आहे आणि सॉक्रेटीस हा त्यांचा आद्य पुरुष आहे अशा प्रकारची मांडणी पुढे येते आहे भारतामध्ये शैव परंपरेमध्ये हा सर्व खटाटोप पंडित लोकांच्याकडे दिलेला होता त्यांनी तो कितपत नीट पार पाडला हा एक आता मोठा प्रश्न आहे युरोशीयन परंपरेमध्ये श्रुतीमध्ये हे काम ब्राह्मण लोकांनी हातात घेतले खरे परंतु त्यांनी चक्क त्या आधारे एक धर्म निर्माण करून टाकला आणि प्रत्येक धर्म स्वतःच्या ताब्यात घेण्याचे व ताब्यात ठेवण्याचे टेकनिकच डेव्हलप केले पाश्चात्त्य देशांमध्ये असा उद्योग तिकडच्या धर्माधिकारी लोकांनी केलेला होता आणि जीजस बळकावला होता त्या विरोधात प्रोटेस्ट ठेवून प्रोटेस्टंट निर्माण झाले आपल्याकडे मात्रे अजूनही असे प्रोटेस्ट निर्माण झालेले नाहीत अपवाद फक्त बसवेश्वर गुरुनानक आणि महात्मा फुले हे शैवच आहेत युरेशियन धर्मांनी मात्र कायमच तडजोडी स्वीकारलेल्या दिसतात आणि ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य केलेले दिसते अलीकडेच कुंभमेळ्यावर ब्राह्मण धर्माने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो पण सरते शेवटी तो फसलेला दिसतो खुद्द अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांनी हर हर महादेव म्हणतच पवित्र स्नानाची डुबकी घेतलेली दिसते अशा प्रकारचे वर्चस्व पाश्चात्त्य देशांमध्ये धर्माधिकारी लोकांचे राहिलेले नाही साहजिकच तिथे वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक पॉप लिटरेचर अतिशय चांगल्या रीतीने निर्माण होते अर्थात तिथेही कधीकधी सपाट करण्याच्या नादामध्ये मूळ सिद्धांताला धक्का लागतो तेव्हा वाद निर्माण होतो

साहजिकच असे लोक निर्माण होणे योग्य की अयोग्य हा कायमच वाद आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात तो कायमच निर्माण होऊन राहिलेला आहे


युवाल हराळीचे स्कूल कुठले असा प्रश्न नेहमी मला अनेक लोक विचारत असतात माझे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे त्यासाठी आपणाला थोडे आईन्स्टाईन कडे जावे लागते उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन ची सापेक्षतेची थेरी नीट समजत नव्हती तेव्हा बर्ट्रांड रसेल ह्याने अतिशय सोप्या भाषेत ते समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषे स्पष्ट करण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला होता (एबीसी ऑफ रिलेटिविटी)आणि हा प्रयत्न यशस्वी झाला इतका की खुद्द आईन्स्टाईनने जगात फक्त तीनच लोकांना सापेक्षता कळलेली आहे आणि त्यातील एक रसेल आहेत असे सर्टिफिकेट दिले होते आणि तिथून पुढे लोकप्रिय वैज्ञानिक वाङ्मयाचे एक नवीन रसेल स्कूल निर्माण झाले हरारीचे पूर्वज निपजायला सुरुवात झाली याला मी रसेलियन पॉप लिटरेचर म्हणतो हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण मांडणी ठेवत असतात आणि त्याचबरोबर काही इन्साइटससुद्धा पुरवत असतात कारण मुळात ते स्वतः तत्त्वज्ञ असतात हरारी या स्कूलमध्ये येतो असे लोकांना गाभा समजावून सांगणारे काही सोफिस्ट लोक प्रत्येक पिढीमध्ये निर्माण होणे फार गरजेचे असते पाश्चात्त्य देशांमध्ये अशी परंपरा कायमच राहिलेली आहे आपल्याकडेही धार्मिक क्षेत्रात मोक्षिक क्षेत्रात अनेक कीर्तनकार हेच करत असतात मात्र आपल्याकडे अनेकदा मूळ गाभा अत्यंत भ्रष्ट होत जातो उदाहरणार्थ पुराणे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत किंवा वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तने आपण ऐकली तर आपणाला असे दिसते की संत तुकारामांच्या अभंगाची कधीकधी चांगली आणि कधीकधी टोकाची सोपी करण्याच्या नादामध्ये मनोरंजक विश्लेषणे झालेली आहेत विज्ञानामध्ये मात्र जितकी निर्मिती या अंगाने व्हायला हवी होती त्या अंगाने झालेली नाही त्यामुळे साहजिकच हरारीचे महत्त्व मराठीसाठी तरी प्रचंड आहे किंबहुना प्रत्येक ग्रंथालयामध्ये हा मनुष्य जाणे आवश्यक आहे कारण त्या निमित्ताने का होईना पण चौथी नवता ही भानगड काय आहे हे अधिकाधिक उलगडत जाण्याची शक्यता असते 


श्रीधर तिळवे नाईक


चौथ्या नवतेची दुसरी पिढी युवाल हरारी २


उत्तराधुनिकतेने धर्म पुन्हा केंद्रस्थानी आणायला मदत केली आणि चौथ्या नवतेमधल्या सर्व विचारवंतांना त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी पेलावी लागली हरारी याला अपवाद नाही 


माझी स्वतःची याबाबतीतले मांडण अशी होती की धर्माशी आणि धार्मिक कट्टरतेशी सामना करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी मोक्ष प्रमोट करावा लागेल धर्म हा धर्माला उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे धर्माला उत्तर द्यायचे असेल तर ते मोक्षानेच देता येते हरारीला मोक्ष उपलब्ध नाही हे त्याचे दुर्दैव किंवा असे म्हणू की झियोनिस्ट दुर्दैव ! साहजिकच तो पुन्हा एकदा ज्यू धर्माच्या सेकंड टेम्पल वार कडे जातो आणि पुढे मग झियानिजमिक राष्ट्रवाद कसा आहे हे सांगायला लागतो इतकेच नव्हे तर जू लोकांचा राष्ट्रवाद ज्यू लोकांना का नाकारला जातो असा प्रश्नही तो उपस्थित करतो ज्या भूमीवर ज्यू लोक क्लेम करतायेत तो क्लेम कसा ऐतिहासिक आहे हेही पटवण्याचा प्रयत्न करतो प्रश्न असा आहे की हे त्याला का करावे लागते? दुसरा प्रश्न असा आहे की हे हिंदुत्ववादी लोकांच्या सारखे आहे का ? म्हणजे ब्राह्मण धर्माला अलीकडे जो लोकांच्या सारखी स्वतंत्र राष्ट्राची आवश्यकता वाटायला लागलेली आहे ब्राह्मणे तर चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जर भारतात पसरली तर ब्राह्मण धर्माचे हकालपट्टी होणे अटळ आहे असे ब्राह्मण धर्मे लोकांना वाटते प्रत्यक्षात त्या तथ्य नाहीये परंतु त्यांना तसे वाटते हे मात्र खरे आहे म्हणूनच अधून मधून ब्राह्मणांसाठी स्वतंत्र राष्ट्र मागितले जाते प्रश्न असा आहे की ब्राह्मणांना स्वतःचा हा ब्राह्मण धर्म जो सरळ सरळ वंशवादी आणि वर्णवादी आहे टिकवावासा का वाटतो एवढे सगळे रामायण आणि महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा वारंवार मुस्लिम आणि इंग्रजांच्या कडून पराभूत झाल्यानंतर सुद्धा वर्ण व्यवस्थेचा हा दुराग्रह का सुटत नाही स्वतःला टॉपला ठेवण्याचा हा आग्रह का सुटत नाही हे खरे तर खरोखर अवघड होऊन बसलेले आहे एक प्रकारे हा एक वंशवाद आहे आणि तो जेनेटिकल नाहीये तर ज्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला ते ब्राह्मण अशा प्रकारच्या कट्टर व्याख्येतून तो आलेला आहे त्यात ब्राह्मण्यतरांचे स्थान हे कायमच दुय्यम राहणार हे उघड आहे पण आश्चर्यकारकरीत्या हे दुय्यम स्थान सुद्धा अनेकांना सुखकारक वाटते की काय अशी सद्यस्थिती आहे ज्यू लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाहीये कारण मुळात ज्यू च एक महाटोळी आहे अशी त्यांची धारणा आहे जिच्यात अनेक किमान 13 टोळ्या येतात असे त्यांना वाटते ज्यू आणि ब्राह्मण लोकांना आपण देवाकडून निवडले गेलेलो आहोत असे वाटत असतं ब्राह्मण स्वतःला त्यामुळेच बिनधास्तपणे भूदेव म्हणवून घेऊ शकतात खरे तर बौद्धिक पातळीचा विचार केला तर जितके क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन जीव लोकांचे आहे त्याच्या धड २% कॉन्ट्रीब्युशन सुद्धा ब्राह्मण धर्माला आणि ब्राह्मण लोकांना देता आलेले नाही याचे कारण त्यांची बुद्धी त्यांनी धर्मामध्ये वाया घालवली याउलट ज्यू लोकांनी आपली बुद्धी सायन्स व तंत्रज्ञानाकडे वळवून अनेक जागतिक दर्जाचे सायन्स आणि तंत्रज्ञानातले काम करून दाखवले आणि त्यामुळे ज्यू लोकांच्या बद्दल एक प्रचंड आदर सर्वत्र आहे अपवाद फक्त मुस्लिम लोक आहेत अशा प्रकारचे काम करून दाखवले तरी हिटलरला हे लोक शत्रू वाटावे शत्रु वाटावेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे सर्वात वाईट गोष्ट त्याचा अहंकार हा आर्य अहंकार होता आणि आश्चर्यकारकडी त्या ब्राह्मण लोकांना हा आरे असण्याचा अहंकार फार प्राचीन काळापासून आहे किंबहुना भारताला आर्यावर्त म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली होती ब्राह्मण असो किंवा रोमन कॅथोलिक असोत या दोघांच्याही मुळामध्ये मुळात युरेशियन मुळे आहेत आणि आश्चर्यकारकरीत्या ती अजूनही ऍक्टिव्ह आहेत की काय अशी मला शंका येत असते कारण हे दोघेही कायम स्वतःला वेगळे काढत असतात मुळसा ख्रिश्चन धर्म आर्यन ख्रिश्चन धर्म कसा काय बनला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा इतिहास आहे आणि त्यामध्ये रोमन अरे लोकांनी अत्यंत मेजर बजावलेला आहे असे असून सुद्धा आश्चर्यकार्यक रित्या हे दोन धर्म एकमेकाचे शत्रू होण्याऐवजी आता एकत्र येऊ बघतात याचे कारण हिटलरने स्वतःला आर्य वंशी म्हणून प्रमोट केले असले तरी स्वतःचा धर्म मात्र त्याने ख्रिश्चन असा सांगितलेला आहे तो खरंतर कितपत ऑथेंटीक आहे याविषयी मला शंका आहेत कळत नकळतपणे  प्रोटेस्टन्ट धर्मात त्यांच्या संस्थापकाचा म्हणजेच मार्टिन ल्युथर याचा जो धर्म होता त्यात जू लोकांचा जो द्वेष चालला होता तो द्वेष जर्मन परंपरेतून त्याच्याकडे चालत आलेला होता असे आता दिसते त्यासाठी लागणारे तर्कशास्त्र आर्य सिद्धांताने त्याला पुरवावे आणि हेच सिद्धांतन ब्राह्मणांना सुद्धा आपले वाटावे याहून शोकांतिका काय ? हरारी जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला हे सगळे डायनॅमिक्स किती कळलेले असते याबद्दल मला शंका आहेत साहजिकच हिटलरच्या सर्व कारवायांनी जीव लोकांच्या मध्ये ज्यू लोकांच्या मध्ये एक प्रकारे असुरक्षितता निर्माण केली आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या सर्वांसाठी आणि स्वतःच्या धर्माच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज भासायला लागली ही परिस्थिती आपण जर का हिटलरच्या काळात गेलो तर आपण नीट समजून घेऊ शकतो आणि ज्यू राष्ट्राला मान्यता ही देऊ शकतो त्यामुळे भारताचा इस्त्राईल या स्वतंत्र राष्ट्राला असलेला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा भारताने कायम स्वरूपात ठेवलाच पाहिजे कारण नैतिकदृष्ट्या तो योग्य आहे पुन्हा कोणी ज्यू विरोधात काही करणारच नाही याची कसलीही खात्री माणसाच्या संदर्भात देता येत नाही आता ही जी इनसिक्युरिटी आहे ज्यामधून इस्त्राईल तयार झाला त्याच्याबाबतीत ऑब्जेक्शन कोणाचे आले तर आश्चर्यकारक लिहिता हिटलर यातून सुटला आणि मुस्लिमांना आता इस्त्राईल नकोसे झाले आहे साहजिकच इस्त्रायल पासून मुस्लिम आणि मुस्लिमांच्या पासून इस्त्राईल आता इन सिक्युअर झालेले आहेत आणि त्यातूनच आत्ताच्या गाजा पट्टीचा प्रश्न आलेला आहे 

प्रश्न असा आहे की ब्राह्मण लोकांच्या मध्ये ही जी इन सक सिक्युरिटी आली आहे तिचे मूळ नेमके कशात आहे आणि  कुठून आली ?

 

वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जी प्रचंड ज्यू लोकांची हिंसा केली तशीच हिंसा काश्मीरमध्ये पंडित लोकांच्या वाट्याला आली त्यामुळे साहजिकच एक प्रचंड भय ब्राह्मण धर्मी लोकांच्या मध्ये निर्माण झालेले आहे साहजिकच आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावेच लागेल ही एक प्रखर जाणीव ज्या मागे खुद्द त्यांचे धार्मिक टेक्स्ट आहे सतत जो लोकांच्या मध्ये जशी  वाढत गेली आणि शेवटी इस्त्राईलची निर्मिती झाली  तसे काही भारतात झाले आहे का महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये अचानक ब्राह्मण लोकांच्यावर हल्ले झाले ते खरोखरच इतके तीव्र होते का की ज्यामुळे ही इन्सिक्युरिटी निर्माण व्हावी ? की ब्राह्मण लोकांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी लोक ते गप्प बसतील त्यांनी प्रतिकार करता कामा नये कारण ब्राह्मणाची हत्या करू नये असे ब्राह्मणांच्या धर्मात सांगितलेलेच आहे प्रत्यक्ष मध्ये ब्राह्मणे तर लोक हे पाळतात असे नाही त्यामुळे मग ही इन्सिक्युरिटी आली आहे का भारतातले ब्राह्मण लोक आणि त्यांचा ब्राह्मण धर्म हा अनेकदा ज्यू लोकांच्या धर्मासारखा आहे असे ब्राह्मण लोकांना वाटत असते आणि म्हणूनच त्यांना इस्त्राईलबद्दल आणि ज्यू धर्माबद्दल प्रेम वाटत असते त्यामुळेच हरारीच्या अनुवादाला आपल्याकडे अनेकदा हिंदुत्ववादी प्रचंड प्रमाणामध्ये उत्तेजन देताना दिसतात कारण शेवटी हरारी फिरून फिरून गंगावेस या म्हणीप्रमाणे ज्यू धर्माकडे परततो 


प्रश्न असा आहे की ज्यूधर्म हा काही आंतरराष्ट्रीय धर्म आहे का? तर नाही ! त्यामुळेच एकीकडे हरारी स्वतःची मांडणी आंतरराष्ट्रीय असे आहे असे मानतो आणि दुसरीकडे झियनिझमचे पूनरागमन झाले पाहिजे असेही म्हणतो चौथ्या नवतेत ही सक्ती झालेली आहे कारण शेवटी इस्लामला पर्याय म्हणून कोणता धर्म द्यायचा हा सर्वांच्या पुढेच प्रश्न ठाकला आहे आणि याचे कारण इस्लाम हा पसरत चाललेला आहे धर्म नाकारला की धर्म येत नाही अशी एक पुरोगामी समजूत होती त्या समजूतिला पूर्ण छेद इस्लामने दिलेला आहे आणि याचा दबाव युवाल हरारी वर आहे मला स्वतःला वैयक्तिक रित्या शैव धर्म निवडण्याची सक्ती झाली याचे कारण आत्ताची इस्लामने आणि ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली परिस्थिती आहे मी बौद्ध धर्म निवडण्याचाही प्रयत्न केला होता परंतु ते शक्य नाही हे माझ्या लक्षात आले विशेषतः भारतात तर ते अजिबात शक्य नाही पण जिथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे तिथे बौद्ध धर्माची शक्यता नाकारता येत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की आज ना उद्या चीनला बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल जापान ने तो आधीच स्वीकारलेला आहे भले त्यांनी त्याला झेन हे नाव दिले असेल याला पर्याय नाही कारण ब्रम्हांडाशी आणि निसर्गाशी नाते जोडणे हे माणसाला आवश्यक वाटते त्याची ती एक मूलभूत गरज आहे आणि ती अन्न आणि वस्त्र यांच्या इतकीच खोल आहे अशा वेळेला तुम्ही एक तर काल्पनिक नाते जोडू शकता किंवा खरे नाते जोडू शकता मोक्ष खरे नाते जोडतो धर्म काल्पनिक नाते जोडतो यापैकी काय निवडायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे याबाबतीत माझे म्हणणे असे की काल्पनिक नाते निवडायचे असेल तर निदान मग असा धर्म निवडावा जो अधिकाधिक शैक्षणिक दृष्ट्या ओपन असेल सहिष्णू असेल ज्याने पुरोगामी वाद पचवलेला असेल आणि भारतात असा धर्म शैव धर्म असल्याने मी शैव धर्माची निवड करतो आता कोणी त्याला हिंदूशैव म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही कारण टायटल पेक्षा माझा मुख्य भर हा आशयावर आहे 

हरारी याच्यापुढे असलेला पेच हा काँग्रेस पुढे असलेल्या हिंदू मुस्लिम प्रश्नासारखा आहे त्यामुळेच पाकिस्तान द्यायचे की नाही असा जो प्रश्न होता तसेच पॅलेस्टाईन द्यायचे की नाही असा हा प्रश्न आहे पॅलेस्टाईन नंतर आलेत आणि तरीही ते स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र क्लेम करतात हा क्लेम हिस्टॉरिकल आहे की नाही हा खरा मुद्दा आहे गमतीचा भाग असा आहे की सांगितले जाते ते सर्व दंतकथात्मक आहे धार्मिक आहे आणि ती श्रद्धा आहे असा मांडण केला जातो साहजिकच मग भारत पाकिस्तान युद्धासारखी ज्यू पॅलेस्टाईन युद्ध चालू राहणे अटळ आहे कारण मूळ भूमी आमची आहे अशी ज्यू लोकांची श्रद्धा आहे तर नंतर आलेल्या मुस्लिम लोकांनी आमची भूमि का मागावी आणि तीही एका दंतकथेच्या आधारे असा त्यांचा प्रश्न आहे वास्तविक इस्त्राईलसाठी स्वतंत्र राष्ट्र ही सुद्धा धार्मिक दंतकथा आहे तर प्रत्यक्षात देवाने असे प्रॉमिस दिले होते की नाही हे कोण ठरवणार ? शेवटी हा सारा खेळ श्रद्धेच्या प्रदेशात जातो आज ना उद्या हरारीला मोक्षाकडे वळावेच लागेल किंबहुना अलीकडे जू-धर्मामध्ये हादिस हा एक संप्रदाय कळत नकळत मोक्षाच्या दिशेने जातो की काय अशी शंका येणे इतपत वाटचाल करतो आहे त्यामुळे आज ना उद्या हरारी या दिशेने जाईल पण सध्या तरी तो ही धार्मिक चौकट घेतो आहे आणि त्या आधारे इस्त्राईलच्या काही गोष्टींना प्रमोट करतो आहे आणि काही ठिकाणी रिव्हॅल्युएशन मागतो आहे 

पुढे जाऊन मग अर्थातच टेररिझमच्या संदर्भात मांडणी करणे अटळ बनते उत्तर आधुनिकतेने दहशतवाद हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक प्रश्न म्हणून पाहिला पण चौथ्या नवतेमध्ये मात्र तो इतका झिरपला की तो वैयक्तिक आयुष्यात आला माझ्या बांधकाम चालू आहे या काव्यसंग्रहामध्ये यासंदर्भात अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि चॅनेल लव हॉरर अँड टेरर या काव्यसंग्रहात सुद्धा अनेक गोष्टी आलेल्या आहेतच वेगवेगळ्या प्रसिद्ध प्रकाशित काव्यसंग्रहात काही कविता आहेतच कारण चौथ्या नवतेमध्ये दहशतवाद ही फक्त धार्मिक गोष्ट राहत नाही तर मुळात ती वैयक्तिक होत जाते मोहम्मद अली जिना यांनी पुरोगामी दहशतवाद मांडलाा आयातुला खोमेनी यांनी उत्तराधुनिक दहशतवाद मांडला आणि आता अल कायद्याने चौथ्या नवतेचा दहशतवाद मांडलेला आहे यामध्ये सर्वात गाजलेला अमेरिकेवरचा ट्विन टॉवर अटॅक होता ज्याचे जगभर पडसाद उमटले आणि साहजिकच सर्वच विचारवंतांना त्याविषयी चर्चा करणे आवश्यक बनले माझ्या कव्हीं या काव्यसंग्रहात त्यामुळेच आयातुला खोमनी आणि ट्वीन टॉवर वरचा अटॅक या दोन्ही घटनांच्या वर कविता आहेत 

पुरोगामी दहशतवाद हा पुरोगामी राष्ट्र निर्माण करण्यासाठी केला जातो जिना यांची स्वतःची अशी खात्री होती की हिंदू हे अत्यंत मागासलेले असून ते पुरोगामी नाहीत उलट पुरोगामी वादाला इस्लाम हा जास्त पूरक आहे जी त्यांची गैरसमजुत होती अगदी अशाच प्रकारे धार्मिक तत्वावर आधारित आपणाला इस्रायली ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेले दिसेल बहुतांशी उत्तर आधुनिक विचारवंत हे ज्यू असल्यामुळे साहजिकच इस्त्राईलच्या निर्मितीला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला कारण त्यांची स्वतःची सिक्युरिटी त्यामध्ये होती हरारी ही याला अपवाद नाहीत परंतु कळत नकळत अमेरिका ही ज्यू लोकांची सेकंड ज्यू भूमी असल्यामुळे ती इस्त्रायलला नेहमी प्रोटेक्शन देत असते उत्तर आधुनिकता त्यामुळे नेहमीच ज्यू धर्माला पूरक राहिलेली दिसते भारतात ब्रााह्मण धर्माला अशा प्रकारचे प्रोटेक्शन क्षत्रिय वर्ण देतो अगदी वैचारिक पातळीवर सुद्धा सदानंद मोरे यांच्यासारखे लोक स्वतःला क्षत्रिय घोषित करून ब्राह्मण धर्माालाा व वर्णाला व्यवस्थित संरक्षण देत असतात या नात्यामुळे साहजिकच चौथ्या नवतेत शैव धर्माची पुन्हा एकदा नवीन मांडणी करायची वेळ आली आहे. त्याची पार्श्वभूमी अर्थातच पुरोगामी कालखंडामध्ये शैव धर्माने जे केले त्यात आहे ह्या कालखंडामध्ये मात्र शैव धर्म पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिलेला होता कारण त्यामागे बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराज संभाजी महाराज होळकर आणि महात्मा फुले यांचे अथक प्रयत्न होते हरारीला आधुनिकतेसंदर्भात असे काही करण्याची गरज भासली नाही त्याला ऑलरेडी आधुनिक आणि उत्तर आधुनिक ज्यू वारसा आहे त्यामुळे साहजिकच तो अधिक स्पष्टपणे चौथ्या नवतेची भूमिका खुलेपणाने मांडू शकतो मात्र बेसिक कडे जाण्याची गरज त्यालाही भासते 

मुळात जी भूमी एकेकाळी  डायनासोरची वस्तीस्थान होती ती आता पॅलेस्टाईन आणि ज्यू यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे अशी मांडणी करत तो पुढे सरकत असतो कारण त्याला हे आता हमास आणि इस्त्राईल यांच्यातील युद्ध संपुष्टात यावे असे वाटत असते कळत नकळत आत्ताचे वातावरण हे कट्टर धार्मिक आहे असे त्याला वाटत असते आणि तो काही मधला मार्ग काढता येईल का ते चाचपत असतो शांती प्रस्थापित कशी करता येईल ते चाचपत असतो प्रश्न असा आहे की संपूर्ण चौथ्या नवतेचाच हा लोच्या आहे काय? 

कारण एकीकडे कट्टर धार्मिक उन्माद आहे आणि दुसरीकडे नव्याने निर्माण झालेले चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान आहे यातील ज्यांना चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान निवडायचे आहे त्यांच्यापुढे जो पेच निर्माण होतो तो स्पेशल चौथा नवतेचा पेच आहे यावर एक उपाय म्हणून संपूर्ण नास्तिकता स्वीकारत धर्म संपूर्णपणे नाकारत पुढे जाता येते परंतु हे पुढे जाणे  नकळत इस्लामवादाला प्रोत्साहन देते जरा सर्वच धर्मावर चौफेर हल्ला झाला तरच हा धर्माविरोधात असलेला हल्ला यशस्वी होऊ शकतो पण आपल्याकडे काही अतिशहाणे पुरोगामी लोक सेक्युलर दृष्टिकोनातून मांडणी करताना इस्लामची बाजू मांडत बसतात आणि ते मांडताना अल्पसंख्यांक वादाला ते उत्तेजन देतात त्यांच्या अधिकारांना उत्तेजन देतात त्यामुळे हा मार्ग अंतिमता इस्लामच्या इस्लामीकरणाला पूरक ठरत जातो आणि यामुळेच अधिक सावळा गोंधळ वाढलेला आहे किंबहुना पुरोगामी लोकांची जी दिशा आणि दशा झालेली आहे ती यामुळे झालेली आहे लोकांचा पुरोगामी लोकांच्यावर विश्वास उरलेला नाही कारण ते इस्लामच्या मागे ठाम उभे आहेत अशी त्यांची समजूत आहे किंवा कदाचित लोकांचे बरोबर असलेले आकलन आहे पुरोगामी लोक हे सर्व काही स्पॉन्सर केलेले आहे असे म्हणून मखलाशी करत बसतात आणि सामान्य माणसं ही काहीतरी बिनडोक असतात आणि हिंदुत्ववाद्यांना ती मॅनेज करणे फार सोपे जाते वगैरे गैरसमजुती बाळगून आपला डिस्कोर्स रेटत असतात प्रत्यक्षात लोकांनाच इस्लामचे भय वाटत आहे हे यांच्या लक्षात येत नाही आणि हे भय त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेले असते याची ते साधी दखल सुद्धा घेत नाहीत त्यांना वाटते की गोळवलकरांची पुस्तके वाचून सामान्य माणूस बिथरला आहे 

इस्त्राईल बाबत असे काही होत नाही त्यामुळे एका अर्थाने हरारी काही गोष्टी साफ बघू शकतो मांडू शकतो एका अर्थाने चौथी नव्हता जितकी भारतामध्ये धर्मामुळे डागाळली जाते तितकी इस्त्राईलमध्ये डागाळली जात नाही आणि त्याचा फायदा कळत नकळत हरारीला मिळतो 

श्रीधर तिळवे नाईक

 चॅनेल ज्ञा 

तुझ्यासाठी लायक बनण्याची प्रक्रिया 

आणि तिचं प्रेशर 

प्रत्येक हाडावर 

तळमळीचा स्टॅमिना टिकवत 

मी धडपडतोय 

तुझ्या डोळ्यातील त्या होकाराला 

जो फक्त माझ्यासाठी असेल 


आयुष्याच्या अँप्युटेशनचे प्रयोग माझ्या फोकस्ड चालण्यात 

मुंबईचे आयझोमर्स सर्वत्र 

जाणार तरी कोठे ?

आयुष्य थोडंच पायमोजा आहे 

सुपरइम्पोझिशन एक सारखं असायला ?


बिल्डिंगा किंचाळत नाहीत आताशा 

कान पेनिट्रेट करणारी किंचाळी थाटून मॉडेलसारख्या बसतात 


मी हात उंचावतोय होकाराचा 

समोरचा नकार डाऊन करत 

शटर तोंडावर मारत 


"निदान घरात ऑफिस घेऊन येतो म्हणून भांडायला 

ऑफिस कमव"


मी जिथे जातो तिथे शून्य निर्विकारपणे हाकलले जाते 


ह्या देशाला मुमुक्षु फक्त आश्रमात हवेत 

ऑफिसमध्ये नकोत 


जुन्या गोष्टी निगुतीनं मरायच्या 

नव्या थेट युजलेस म्हणून फेकल्या जातात कचऱ्यात मरायला 

नव्या जागा ह्याही अशाच 

तात्कालिक कॉन्ट्रॅक्टवर कितीकाळ काम करणार 

आणि कचऱ्यात कितीवेळा जाणार ?


बुद्धिमान माणसं कुणालाच नको असतात ह्या देशात 

ज्याला त्याला दास हवेत 

सरंजामदारी मानसिकता 

आधुनिक कपड्यात 

कार्पोरेट फेफड्यात 


मी फाफडा खात खात फाफडतोय फाफलत 

कफल्लत 


घरी परतावंसं वाटत नाहीये मला 

पण रस्त्यावर थांबून तरी 

कोणता समुद्र कमावणार आहे ?

 

मी घरात शिरतोय फ्लॉप चेहरा घेऊन 


तुला वाटतंय 

मी बूट पुरेसे झिजवलेले नाहीत  


मी झिजलेले पाय तुला दाखवत नाही 

बुटात लपवतो 


श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

Saturday, June 9, 2018

श्रीवाहिनी हे फेसबुकवर सादर केलेले महाकाव्य संपले सोमवार ते रविवार अश्या सात दिवसातील घडामोडी न्यूज चॅनेल प्रमाणे सादर करत २० थिम्स हाताळणे असे त्याचे स्वरूप झाले होते हे ठरवून झाले न्हवते तर लिहिता लिहिता झाले होते एखादा लेखक एखाद्या संस्कृतीला पेलत नाही किंवा त्या संस्कृतीतील साहित्याचे ठेकेदार तो पेलू देत नाही म्हणून त्या लेखकाने थांबून चालत नाही त्याने आपले काम नीट करणे गरजेचे असते मराठीत दोन्ही बाजुंनी गोंधळ असतो स्वतःला कलावादी , संरचनावादी वा सहिंतावादी म्हणवणारे समीक्षक लेखकही केवळ निखळ संहिता वाचून मत बनवत नाहीत तर स्वतःचे हितसंबंध बघून मत बनवतात तर सामाजिक बांधिलकी मानणारे लेखक समीक्षक युरोपियन प्रबोधनाने स्पॉन्सर केलेल्या विचारप्रणालीत अद्यापही रांगत आणि रंगत असतात ह्यांच्या वैचारिक बाललीला ह्या प्रचंड बोर करतात अशावेळी चौथ्या नवतेला मिळणारा अल्प प्रतिसाद हा गृहीत धरावा लागतो . ज्या मोजक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचे आभार

ह्या महाकाव्यातील मुख्य  थिम्स पुढीलप्रमाणे होत्या

१ बातम्या देण्यापुर्वीची मानसिक हालचाल आरंभ
२ फेक न्यूज ,बाबरी मशीद, जाहीर रित्या घेतलेल्या चुंबनाचा वाद , ज्योतिषशास्त्र , बाबालोक व अनुयायी , लेखन आणि अभिनय व पोस्टमॉडर्निझम  या विषयावरील सात दिवसाच्या बातम्या
३ फॅशन आणि किचन
४ कॉलेज जगत आणि तरुणाईचे स्वगत
५ रुईया कॉलेजमधील रोमान्स
६ जे एस हॉल मधील रोमान्स
७ मीरारोड दहिसरमधील लिव्ह इन रिलेशनशिपमधील रोमान्स
८ स्पोर्ट्स
९ वर्किंग प्लेस
१० चौथी नवता
११ कविता आणि सॉंग्ज
१२ मार्क्सवादी व परिवर्तनवादी कार्यकर्त्याची सात स्वगते इंटिमेट इंटीलिजन्स
१३ मुंबईत चाललेली मोबाइलवरची संभाषणे आणि त्यांचा येणारा मोबाईला फील
१४इंटरनेट चॅटिंग
१५मुलाकात INTERVIEW
१६प्रार्थना
१७सिनेमा
१८स्वतःलाच फेस TO फेस करणे
१९मृत्युशय्येवरून सात स्वगते
२० थोडं अध्यात्मिक

ह्या थिम्स सात दिवसांच्या सातत्यात वावरत्या ठेवून १९९२ ते २००७ ह्या दरम्यानची मुंबई जालनगरी व तिच्यातील नागरी जीवन  पेलणे असे ह्या महाकाव्याचे स्वरूप होते असे आता दिसते ह्या संग्रहानंतर  २००७ नंतर माझे अनुभवविश्व पूर्ण बदलले आणि त्यातून थोड्या वेगळ्या कविता जन्मल्या ज्यांना मी नेट सिरीज मध्ये टाकले आहे.

माझा स्वतःचा आणि माझ्या साधनेचा भूतकाळ हा माझ्या लिखाणात विखुरला गेलेला असा अचानक पाहावा लागतो आणि हे मजेशीर असते माझे मित्र माझ्या ह्या कविता ज्या नेटाने टाईप करून वा संकलित करून इथे टाकतायत ते तारीफके काबील ! हे लोक नसते तर माझ्या ह्या कविता इतक्या सातत्याने फेसबुकवर दिसल्या नसत्या . ते मला गुरु मानत असले तरी मी त्यांना मित्र मानतो कारण माझा गुरु वैग्रे भानगडीवर विश्वास नाही . सुदैवाने ते भक्त नाहीत अन्यथा त्यांच्यापासूनही दूर जावे लागले असते . त्यांचे आभार !

अलीकडे मी फार कमी कविता लिहितोय कारण कवितेचा फ्लो थांबलाय क्वचित एखादेवेळी झिरपणी झिरपते . एकेकाळी आपण इतक्या भरभरून कविता लिहीत होतो हेच आता आश्चर्यकारक वाटते आणि साधकाचा टोकाचा एकांत तर त्याला जबाबदार नसावा ना असा प्रश्न पडतो . असो सर्वांचे पुन्हा आभार !

श्रीधर तिळवे नाईक