परंपरा म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक
परंपरा म्हणजे काय ह्या प्रश्नाचा विचार करायचा असेल तर सर्वात प्रथम स्मृती या प्रोसेसचा विचार करावा लागतो कारण स्मृती ठेवण्याची प्रोसेस आपल्या मेंदूमध्ये जिवंत आहे म्हणूनच आपण परंपरेचा विचार करू शकतो . आपल्या परंपरेचे मूळ आपल्या स्मृती ठेवण्याच्या मेंदूच्या सवयी मध्ये आहे.
माणसाच्या स्मृती विषयी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत पण आता मुळातच या संदर्भातले जे विज्ञान आहे तेच प्रमाण मानले जाते आणि मानायला हवे
सर्वसाधारणपणे आता स्मृतीच्या सहा प्रोसेस आपण स्वीकारायला हव्यात आणि त्यापैकी काही स्वीकारल्याही जातात पहिली चिन्हीकरण म्हणजेच माणसाला जे जे इंद्रियांच्या द्वारे प्राप्त होते ते सर्व तो किंवा त्याचा मेंदू पूर्णपणे स्वतःमध्ये चिन्हीफाय करतो कोडीफाय करतो हे फाय होताना नेमके काय काय घडते हे सांगणे मात्र अलीकडे अधिक गुंतागुंतीचे आणि अजूनही विश्लेषणाला खुले आहे .
दुसरी प्रोसेस अर्थातच अर्थनिर्णयन आहे या प्रोसेसमध्ये जे सर्वच्या सर्व आलेले आहे किंवा इंद्रियांच्या द्वारे किंवा मज्जा संस्थेच्या मार्फत प्राप्त झालेले आहे त्याचे अर्थ निर्णयन केले जाते आणि काय साठवायचे काय नाही कशासाठी साठवायचे का साठवायचे यासारख्या अनेक प्रश्नांचा आदमास घेत आलेला डाटा साठवला जातो अनेकदा त्या डाटावर प्रोसेस सुद्धा होतात जे साठवणे जगण्यासाठी गरजेचे नाही असे मेंदूला किंवा मेंदूतील नियंत्रकाला (मी याला इंग्लिश मध्ये कंट्रोल सेटर म्हणतो) वाटते ते फेकून दिले जाते .
तिसरी प्रोसेस अर्थातच साठवण आहे यामध्ये पूर्णपणे जे जे आवश्यक वाटते ते ते सर्व काही साठवले जाते. साठा करून ठेवणे ही माणसाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच माणूस अनेक गोष्टींचा साठा करत असतो यामध्ये कळत नकळत भविष्यकाळ फार महत्त्वाचा होत जातो कारण साठा हा नेहमी भविष्यकाळाची तरतूद म्हणून केला जातो आपण एखाद्या व्यक्तीची स्मृति जेव्हा साठवतो तेव्हा त्यामागचा उद्देश एकच असतो तो म्हणजे भविष्यात त्या व्यक्तीशी डील करताना व्यवहार करताना भावविवाह करताना आपणाला निर्णय घेता यावेत. माणसाला शेवटी निवड करावी लागते आणि निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला काही गोष्टींची निवड करावी लागते आणि काही गोष्टी सावडून सोडून द्याव्या लागतात . सिलेक्शन ऑफ चॉईस ही एक अपरिहार्य अशी माणसाच्या आयुष्यात असलेली स्थिती असते आणि ती मेंदूमध्ये आणि स्मृतीमध्ये कार्यरत असते . तसे तिला कार्यशील व्हावे लागते . सर्वसाधारणपणे दुःख देणाऱ्या स्मृती या सावधगिरीसाठी म्हणून कधी कधी जिवंत ठेवल्या जातात पण त्या फक्त सावधगिरीला गरजेच्या असलेल्या अंशात्मक भागांना सामावून घेतात आणि ज्या ताप देतात त्यांना फेकून देतात .
चौथी प्रोसेस ही अर्थातच स्मरण किंवा आठवण आहे जर का एखादी गोष्ट समोर आली की आपण ती यापूर्वी आपल्या स्टोरेज मध्ये आहे का नाही याचा पडताळा करतो आणि जर का ती स्मरण साठ्यात असेल तर तिचे कनेक्शन ताबडतोब समोरच्या गोष्टीशी जोडतो त्यामुळे जगण्यात अनेक प्रकारचे येऊ शकत असलेले अडथळे आपणाला टाळता येतात उदाहरणार्थ आपल्याला गोष्टी ओळखणे फार गरजेचे असते आता प्रत्येक वेळेला व्यक्तीसमोर आली की नवी ओळख निर्माण करणे हे अनेकदा वेळ घालवणारे ठरते त्यामुळे साहजिकच असा आपला वेळ जाऊ नये आपले आयुष्य वाया आज जाऊ नये म्हणून मेंदू प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र स्वतःमध्ये आपल्या पद्धतीने तयार करतो त्यामुळेच आपणाला चटकन स्मरण होऊन आपणाला त्या गोष्टीची ओळख ताबडतोब पटते आणि आपण त्याप्रमाणे आपल्या वागण्याची पद्धत ठरवतो
पाचवी प्रोसेस स्मरणरंजन आहे अनेकदा आपण एकांतात बसलो की आपणाला चांगल्या आणि सुखद वाटणाऱ्या गोष्टींचे स्मरण होते आणि आपण स्वतःच्या सुखद गोष्टींचे रंजन करत बसतो स्मरण सुख आणि स्मरण दुःख यादेखील दोन प्रक्रिया कायमच ऍक्टिव्ह असतात आणि आपण अनेकदा त्यांना कुरवाळत राहतो विशेषता हे एकांतात घडत असते मात्र ते एकांतात घडत असले तरी अनेकदा लोकांच्या लोकांतात सुद्धा स्मरण रंजन नावाचा प्रकार असतो इथे आपण कळत नकळत स्वतःच्या सुखासाठी म्हणून त्या आठवणी कुरवाळत बसतो . कारण ते आपल्याला गोड फील देतात . सार्वजनिक गोड फील आणि गुड फील हा कळत नकळत उत्सवाचा भाग असतो .
याशिवाय स्मृतीची पडताळण ही सहावी प्रोसेस सुद्धा कधी कधी ऍक्टिव्हेट होते कारण आपण नेटवर्किंग करत असताना अनेकदा होते काय की आपला निर्णय चुकलाय असे आपल्या लक्षात येते आणि हा निर्णय का चुकला किंवा हा निर्णय का बरोबर आला किंवा आता पुढचा निर्णय कसा घ्यावा या संदर्भामध्ये ज्या घटना घडून गेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या आपण स्मरणात आणून त्यांची कनेक्शन्स इंटर कनेक्टिव्हिटी या सगळ्यांची पडताळणी करतो या सगळ्याला पडताळण असे म्हणतात उजळणी करताना सुद्धा अनेकदा आपण पडताळणच करत असतो किंबहुना उजळणी केल्याशिवाय पडताळण करता येऊ शकत नाही .
स्मृती ही या सर्व प्रोसेसची बनलेली असते आणि ती बायोलॉजिकल असते जैविक असते आणि त्यामुळेच स्मृतीचा विचार हा सर्वाधिक महत्त्वाचा विचार होय .
स्मृती ही जीवनावश्यक आहे हे एकदा कळाले की मग तिचा विचार करताना आपणाला अनेक गोष्टींचा विचार करता येतो .
माणसाला ज्याप्रमाणे जगण्यासाठी स्मृती आवश्यक असते त्याचप्रमाणे संपूर्ण त्याच्या गणाला स्मृती आवश्यक असते का हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे माणसाला जगताना फक्त स्वतःच्या स्मृतीच नाही तर अनेकदा इतरांच्या स्मृती सुद्धा उपयोगी पडतात म्हणूनच तर आपण अनेकदा दुसऱ्याचा ऑपिनियन दुसऱ्याचे मत विचारतो . विशेषतः काही लोक आपल्याला आपल्यापेक्षा जास्त शहाणे आहेत असे वाटते आणि त्यामुळे आपण त्यांचे मत विचारात घेतो एका अर्थाने ही सुद्धा पडताळणी असते पण या पडताळणी मध्ये आपण इतरांचे स्मृति सहाय्य घेतो आणि त्यांचे अर्थनिर्णन सुद्धा निर्णय करताना विचारात घेतो
यातूनच मग सामूहिक स्मृती नावाची गोष्ट निर्माण होते आणि खरा गोंधळ तिच्यामुळे चढतो कारण कुठलीही गोष्ट सामूहिक झाली सामाजिक झाली की तिच्या स्वतःच्या म्हणून काही सत्ता तयार होत जातात आणि या सत्ता अनेकदा तुमच्या वैयक्तिक स्मृतींना आणि स्मृती समृद्धींना हानिकारक ठरू शकतात अनेकदा सत्ताधारी या सामूहिक स्मृतींच्या जीवावरच समाजावर राज्य करायला बघत असतात आणि म्हणूनच आपणाला आपल्या स्मृतीचा जितका विचार करावा लागतो तितका सामूहिक स्मृतीचा सुद्धा कधी कधी विचार करावा लागतो .
प्रश्न असा आहे की यांचे स्वरूप नेमके काय आहे तर त्यासाठी आपणाला सामूहिक स्मृतींची कालिक बाजू लक्षात घेतली पाहिजे
जगामध्ये आत्तापर्यंत ५ महायुगे होऊन गेली आणि यातल्या प्रत्येक महायुगाने स्वतःचे सामूहिक स्मृती म्हणून काही स्मरण जागे ठेवलेले दिसते आणि अनेकदा तर या जागे ठेवण्याची विशिष्ट पद्धत बनलेली दिसते
यातून अनेकदा काही गुंतागुंतीच्या गोष्टी तयार होतात मुख्य म्हणजे माणसाची वैयक्तिक स्मृती आणि त्याच्या आसपास असणाऱ्या त्याच्या गणाची म्हणजेच राष्ट्राची किंवा जगाची समृद्धी स्मृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का की त्यांच्यामध्ये अद्वैत आहे की द्वैत आहे की पूर्ण भेद आहे ?
माझ्या मते सर्वच्या सर्व अवस्थांची शक्यता असते म्हणजे अद्वैत अभेद विशिष्ट अद्वैत ,विशिष्ट अभेद , युग्म, द्वंद्व भेद ,पूर्ण भेद वगैरे वगैरे ज्यांची चर्चा मी मार्गी आणि देशी या ग्रंथांमध्ये केलेली आहे
सामूहिक स्मृती आणि वैयक्तिक स्मृती यांचे संबंध कधी सौख्याचे तर कधी ताणलेले राहतात आणि त्यातूनच कधीकधी व्यक्तीचे समाजाशी खटके उडायला लागतात
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण अधिक परंपरेचा विचार नीट करू शकतो
स्मृति म्हणजे परंपरा असे मानले जाते काय हा पहिला प्रश्न आहे माझ्या मते परंपरेवर ज्यांनी ज्यांनी गांभीर्याने चर्चा केलेली आहे त्या सर्वांना स्मृती वेगळी आणि परंपरा वेगळी हे मान्य केले आहे
जर या गोष्टी भिन्न आहेत तर मग त्या नेमक्या काय आहेत असा प्रश्न आपोआपच यातून निर्माण होतो
माणसाच्या होमोसोपियन या रूपाची उत्क्रांती कशी झाली ते आता तुम्हाला उत्क्रांतीच्या कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळेल आपण याला आदिम महायुग असे म्हणू शकतो आणि त्याची सुरुवात होमो इरेक्टस पासून करू शकतो त्यानंतर मग तो होमो सेपियन म्हणून विकसित झाला आणि ज्याला आता आपण आदिम कालखंड किंवा प्रागेतिहासिक कालखंड म्हणतो तिथे येतो या कालखंडामध्ये आपण असे म्हणू शकतो की चिन्ह व्यवस्था माणूस तयार करायला लागला . एका अर्थाने हा चिन्ह मानवाचा कालखंड आहे जो एकमेकांशी संदेशवहन करत एकमेकांची कॉपी करत एकमेकांना चिन्ह गोष्टी द्यायला शिकला उत्क्रांत होऊ लागला एक प्रकारची संवेदनज्ञानशिलता त्याच्यात विकसित होत गेली आपल्या आजच्या स्मृतीचे मूळ या कालखंडात आहे माणसाच्या आजच्या स्मृतीचे बीज या कालखंडात प्रामुख्याने रुजत गेले . पूर्वीही ते होते परंतु त्याची उगवण्याची क्षमता खूप अल्प होती पण चिन्हव्यवस्थेच्या उदयामुळे हळूहळू गोष्टी लक्षात ठेवणे तो शिकला आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टी इतरांना द्यायला ही शिकल्या .
या आदीम महायुगात त्याला स्वतःची कल्पनाशक्ती सापडली आणि कलेचा उदय झाला कलेमधून हळूहळू शहाणपण , श्रद्धा आणि सत्ता प्रणाली उदयाला आल्या आणि पुढे मग याला शह देण्यासाठी म्हणून मोक्षयुग आले या मोक्ष युगाने श्रद्धांना आव्हान दिले पण राजकीय सत्तांना मोक्ष धोकादायक वाटायला लागल्यामुळे त्यांनी हळूहळू पुन्हा एकदा धर्म नावाची राजकीय विचार प्रणाली निर्माण करून मोक्ष बळकावला आणि श्रद्धा तर त्यांच्याच ताब्यात होती
यातून एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कला ही स्वतःच परंपरा आहे का ? आणि कला ही जर स्वतःच परंपरा असेल तर मग कलेचे आणि परंपरेचे नाते अद्वैती मानावे का ?
मोक्षाने केवळ अनुभवाला महत्त्व देण्या ऐवजी विद्यांना सुद्धा महत्त्व द्यायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक विद्या उदयाला आल्या या विद्यांना अनेकदा भारतामध्ये भगवान शंकर जबाबदार आहेत आणि त्यांचा अत्यंत समर्थपणे वारसा चालवला तो त्यांच्या मुलाने ज्याचा उत्सव आता आपण साजरा करणार आहोत आणि तुम्ही लोक सुट्टीवर जाणार आहात
त्यामुळे साहजिकच जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा आपल्याकडे परंपरेचा विचार अधिक होतो . कारण गणपती हा काही फक्त परंपरेचा देव नव्हे तो विद्येचा देव आहे . साहजिकच गणपतीच्या नावाखाली तुम्ही वाटेल तेवढी बौद्धिक चिकित्सा करू शकता किंवा हाच एक असा काळ असतो ज्या वेळेला भारतामध्ये काही विचारमंथन होण्याची शक्यता असते . त्यामुळेच बापटांच्या सारखे काही विद्वान परंपरेच्या विषयी आपल्याला प्रश्न विचारू शकतात मी पहिल्याच व्याख्यानामध्ये परंपरा शिकणे का आवश्यक आहे ते सांगितले होते याचे कारण परंपरेचा प्रश्न कायमच उत्सव जेव्हा येतो तेव्हा तेव्हा निर्माण होतो
याचे कारण उघड आहे कारण उत्सव हा नेहमीच परंपरेतून निर्माण होतो
प्रश्न असा आहे की मग स्मृति वेगळी आणि परंपरा वेगळी असे जर असेल तर इतिहास वेगळा आणि परंपरा वेगळी असे आहे का तर या प्रश्नाचे सुद्धा उत्तर होकारार्थी आहे
सर्वसाधारणपणे आपण कालखंडाची जेव्हा मांडणी करतो तेव्हा इतिहास पूर्व , प्राचीन, मध्ययुगीन ,अर्वाचीन, आधुनिक आणि उत्तराधुनिक असे युरोपियन लोकांनी स्पॉन्सर केलेले कालखंड आपल्याला सहज माहिती असतात तुमच्यापैकी इतिहास शिकलेल्या लोकांना हे कालखंड नक्की माहिती असतील
यातील जो उत्तर आधुनिक आणि आधुनिक कालखंड आहे त्याने प्रामुख्याने परंपरेचा विचार पुढे आणला हा विचार का पुढे आणला गेला
या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला गेलो तर आपण आणखी एका ज्ञानाच्या महायुगात पोहचतो याला ज्ञानाचे महायुग किंवा विज्ञानाचे महायुग म्हणता येते याचे कारण त्या कालखंडाच्या केंद्रस्थानी विज्ञान आहे या विज्ञानयुगामध्ये सुधारणावादी , प्रबोधनवादी , पुरोगामी आणि उत्तर पुरोगामी असे चार कालखंड येतात
आणि याच कालखंडामध्ये सामूहिक स्मृतीची रचना वैज्ञानिक पद्धतीने करण्याची पद्धत उदयाला आली जिला आपण आता इतिहासाची पद्धत किंवा इतिहास म्हणतो . वैज्ञानिक पुरावे मिळत नाही तोवर त्या भूतकालीन गोष्टीवर किंवा स्मृतीवर विश्वास ठेवायचा नाही असा दृष्टिकोन इतिहासामध्ये असतो . यावर माझे एक पुस्तकच आहे त्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही . चौथी नवता : नवअनियतकालिकांचा इतिहास यामध्ये मी इतिहासाचा सांगोपांग विचार केलेला आहे
तर परंपरेचा विचार मी अलीकडेच रंगभूमीच्या रंगवाच्या नावाच्या एका नियतकालिकामध्ये मांडलेला आहे तोही तुम्ही पाहायला हरकत नाही
इतिहासाला शह देण्यासाठी म्हणून आधुनिकतेने परंपरेची संकल्पना पुढे आणली असे म्हटले जाते इतिहास आणि परंपरा यांच्यामध्ये एक मोठा फरक असा असतो की इतिहास भूतकालीन असतो तर परंपरा ही आत्ता वर्तमानात उपस्थित असते जिवंत असते सळसळत असते किंबहुना इतिहास नेहमी मेलेला असतो आणि परंपरा नेहमी जिवंत असते हाच या दोघांच्यातला फरक आहे . विठ्ठल हा इतिहास नाही ती महाराष्ट्राची परंपरा आहे भगवान शंकर हा इतिहास नाही ती भारताची परंपरा आहे कारण वर्तमान काळात सुद्धा ती उपस्थित आहे
प्रश्न असा आहे की परंपरा काय आहे किंवा हा इतिहास काय आहे याबाबत आधुनिकता असे सांगते की या सर्व कन्स्ट्रक्शन्स आहेत रचना आहेत आणि हा दृष्टिकोन खूप क्रांतीकारक होता याचे कारण असे की आत्तापर्यंत आपण असे समजत होतो की इतिहास म्हणजे वैज्ञानिक सत्य असते. प्रत्यक्षामध्ये आधुनिकतेने आधुनिक इतिहासकारांनी हे सिद्ध केले की प्रत्यक्षात जे जे पुरोगामी कालखंडात इतिहास लिहिले गेले ते सर्वच्या सर्व कन्स्ट्रक्टेड होते रचले गेलेले होते आणि रचणाऱ्या लोकांनी ते अत्यंत पद्धतशीरपणे स्वतःच्या हितसंबंधांच्यासाठीच रचले होते . आपल्याकडे या गोष्टीचा अजूनही पुरेसा प्रभाव पडलेला नाही . आपण इतिहासाबाबत अजूनही पुरेसे आधुनिक झालेलो नाही किंवा उत्तर आधुनिक झालेलो नाही .कारण हे गृहीतक स्वीकारले तर मग फुले आणि आंबेडकर यांनी निर्माण केलेला इतिहास रचलेला इतिहास ठरतो किंवा सावरकर प्रबोधनकार ठाकरे यांनी निर्माण केलेला इतिहास रचलेला इतिहास ठरतो आणि असे रचलेले इतिहास असतील तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात या प्रश्नांना तोंड देण्याची नैतिक ताकद आपल्यामध्ये नसल्यानेच आपण असे प्रश्न उभा करत नाही आपण पुरोगामी वादामध्ये जास्तीत जास्त घोटमळत राहतो आणि इतरांना सुद्धा तसेच घोटमळत ठेवतो आधुनिक तिच्या दृष्टिकोनातून मात्र हे सर्व इतिहास रचलेले इतिहास आहेत आणि असे सर्व रचलेले इतिहास विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधातून निर्माण होतात अशी आधुनिकतेची धारणा आहे साहजिकच या लोकांनी आपले इतिहास रचले तेव्हा त्यांचे काय प्रकारचे हितसंबंध गुंतलेले होते ते हे आता तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे पण अशा प्रकारचे धाडस दाखवले जात नाही याचे कारण फुले किंवा आंबेडकर यांची अशा प्रकारची आधुनिक चिकित्सा कोणीही करू इच्छित नाही सर्वजण पुरोगामी होण्यातच धन्यता मानत आहेत .
साहजिकच भारतामध्ये आता परंपरेचा विचार करताना ही परंपरा नेमकी कशी रचली गेली कोणी रचली तिच्यामध्ये कसे कोणी कोणी कसे फेरफार घडवले यामागे कोणाकोणाचे कसे हितसंबंध गुंतलेले होते अशा प्रकारचे प्रश्न आपण उपस्थित करत आहोत . परंपरा ही जर कन्स्ट्रक्टेड असेल तर मग अशा प्रकारचे विश्लेषण अपरिहार्य आहे .
एका अर्थाने संपूर्ण परंपराच आपण विश्लेषणाच्या चौकटीत आणू पाहतो आहोत चौकटीत आणायला पाहतो आहोत कारण आता आपण एका उत्तर आधुनिक कालखंडामध्ये जगत आहोत . उत्तर आधुनिकता इतिहासाच्या केवळ रचनेकडे फक्त लक्ष देत नाही तर ती त्या इतिहासाची त्या भूतकाळाची त्या स्मृतीची विरचना करते आधुनिकता रचना असेल तर उत्तराधुनिकता विरचना आहे. साहजिकच खंडी खंडी करणे खांडोळी करणे हे वीरचनेच्या तत्त्वांमध्ये बसत असल्याने ते आता खूप प्रचलित होताना दिसते आणि आवेशगिरी वाढताना दिसते .
प्रश्न असा आहे की रचनेमध्ये वैज्ञानिक सत्य असते की नाही तथ्य असते की नाही असले तर त्याचे काय प्रमाण असते हे आपण पाहणार आहोत की नाही की वैज्ञानिक पुराव्यांच्याकडे पाठ करून आपण परंपरांची फक्त खोटी कन्स्ट्रक्शन तयार करणार आहोत ? चौथ्या नवतेमध्ये आता फक्त आधुनिक रचना आणि उत्तर आधुनिक विरचना येत नाही तर वैज्ञानिक चिकित्सा पण येते इतिहास सुद्धा पुन्हा येतो जो इतिहास मेलेला होता तो चौथ्या नवतेने पुन्हा जिवंत केलेला आहे मात्र जिवंत करताना जे रचले गेलेले इतिहास होते ते नेमके कोणी रचले कसे रचले का असले यांचे विश्लेषण करावे लागते हे करत असतानाच त्या सर्व इतिहासांच्या मध्ये जे जे वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे सिद्ध होणारे आहे त्याला स्वीकारण्याची तयारी आपण केली पाहिजे असे चौथी नवता सांगते. इथे इतिहास एक जालना आहे . म्हणजेच आता वर्तमान काळामध्ये आपण हळूहळू इतिहासाकडून रचनेकडे रचने कडून वीरचनेकडे आणि वीरचने कडून आपण चौथ्या नवतेमध्ये जालनेमध्ये आणि उत्तर जालनेमध्ये दाखल झालेलो आहोत .
स्मृतींचा मुख्य उद्देश हाच मुळात कनेक्टिव्हिटी जिवंत ठेवणे हा असतो . त्यामागे सुरक्षिततेचा उद्देश असतो . प्रत्येक मेंदू स्वतःला आणि स्वतःच्या जीवाला शाबूत ठेवण्याची धडपड करतो आणि त्यामुळे या धडपडीचा एक भाग म्हणून स्मृती अस्तित्वात येते त्याचप्रमाणे सामूहिक स्मृती सुद्धा यासाठीच अस्तित्वात असते एक तर पिढ्यान पिढ्या आपण आपल्याला मिळालेले शहाणपण आपल्याला मिळालेले दर्शन आपल्याला मिळालेले तत्त्वज्ञान आपल्याला मिळालेले विज्ञान पुढच्या पिढ्यांना देऊ इच्छितो आणि साहजिकच त्यामुळे स्मृती आवश्यक बनते तशीच इतिहास ,परंपरा आणि जालना आवश्यक बनते
म्हणजे एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की इतिहास हे सुद्धा एका अर्थाने स्मृती सारखे सहा प्रोसेसने बनलेले आहे त्याचप्रमाणे परंपरा ही सुद्धा या सहा प्रोसेसने युक्त आहे आणि आता जालना सुद्धा या सहा प्रोसेसने युक्त आहे त्यांना कुणाला टाळता आलेले नाही म्हणजेच एका अर्थाने आपण परंपरा पाहतो म्हणजे स्मृतीचे नव्याने अर्थनिर्णयन करतो आपण ते आपल्या स्मृतीतून सामूहिक स्मृतीतून बाहेर काढतो तिचे वैज्ञानिक पद्धतीने अर्थनिर्णयन करतो तिला ज्ञानाच्या नव्या प्रकाशात पुन्हा रचतो पुन्हा एकदा नीट आठवतो मग आपणाला असे म्हणता येईल का इतिहास असो की परंपरा या दोन्ही गोष्टी म्हणजे स्मृति नव्हे तर स्मृतीसमृद्धीचे केलेले मानवी अर्थनिर्णयन आहे चिन्ह निर्णयन आहे.
याच्याही पुढे जाऊन मग असे म्हणता येईल का की या सर्व गोष्टी चिन्ह सृष्टीत घडतात म्हणूनच त्या फक्त चिन्हसृष्टीतच रेंगाळत राहतात आणि माणूस हा चिन्हसृष्टीतच रेंगाळत असल्याने त्याच्यासाठी त्या सर्वात महत्त्वाच्या बनत जातात .
म्हणजे एका अर्थाने परंपरा रचल्या जातात . त्या विरचीत होतात . जालीत होतात आणि विजालीत होतात . वर्तमान काळात त्यांचे रूपांतर जालनामध्ये होते .
श्रीधर तिळवे नाईक
( मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकॅडमी मध्ये ७ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ दिलेल्या व्याख्यानाचा आणि प्रश्नोत्तरांचा एक तुकडा )