Wednesday, January 29, 2025

 चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी १


महाराष्ट्रात अलीकडे युवाल हरारी याची चर्चा जोरदार चालू आहे याचे कारण अमेरिकेतल्या पॉप लिटरेचरची एकंदरच जगभर असलेली लोकप्रियता आहे अत्यंत सोप्या भाषेत वैज्ञानिक सत्य सांगणे हे सायंटिफिक पॉप लिटरेचरचे वैशिष्ट्य असते ते हरारीच्या लेखनामध्ये ओतप्रत भरलेले आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आश्चर्यकारकरीत्या हे करताना तो व पु काळ्यांच्याइतकाच लाघवी असतो साहजिकच अशा प्रकारचे वाचन करणाऱ्या लोकांना तो एक देवदूत वाटला तर आश्चर्य नाही 


आमच्या पिढीने चौथ्या नवतेचे काही प्रश्न निर्माण केले त्यांची स्वतःच्या डाटा उपलब्धतेनुसार उत्तरेही दिली आणि हे प्रश्न आता अधिक व्यापक डाटा घेऊन दुसऱ्या पिढीत सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणे झिरपलेले आहेत हे आपणाला हरारीच्या लेखनावरून स्पष्टपणे प्रतीत होते मराठीत त्याचा अनुवाद होतो हा नेहमीच मला पॉझिटिव्ह इव्हेंट वाटत असतो याचे कारण मराठीमध्ये चौथी नवता पसरवायची असेल तर असे सर्व वैज्ञानिक पॉप लिटरेचर अनुवादित होणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्या भोवताली काय चालले आहे हे नीट समजून घेईल मला नेहमीच या गोष्टीचा आनंद होतो की चौथ्या नवतेच्या दुसऱ्या पिढीतील प्रणव सखदेव हे अत्यंत ताकतीने त्याचा अनुवाद करत आहेत


कुठलेही तत्त्वज्ञान जेव्हा उदयाला येते तेव्हा ते अत्यंत किचकट असते उदाहरणार्थ जिला आज आपण उत्तर आधुनिकता म्हणतो ती प्रथम फ्रेडरिक Nietzsche याने अत्यंत व्यवस्थित मांडली परंतु त्याच्या समकालीन लोकांना ती झेपलेली दिसत नाही कारण त्या काळामध्ये उत्तर आधुनिक विज्ञान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले नव्हते पुढे आईन्स्टाईन मुळे सर्व गोष्टी सोप्या होत गेल्या आणि Nietzsche काय म्हणतो हे अधिक नीट समजत गेले पुढे मग उत्तराधुनिकता नीट समजावून सांगणाऱ्या पॉप लिटरेचरची निर्मिती व्हायला लागली फार प्राचीन काळापासून युरोपमध्ये ही प्रथा आहे आणि सोफिस्ट लोक ती नेहमीच चालवत आलेले आहेत अलीकडे तर या लोकांचे मूळ सॉकॅटिस मध्ये आहे आणि सॉक्रेटीस हा त्यांचा आद्य पुरुष आहे अशा प्रकारची मांडणी पुढे येते आहे भारतामध्ये शैव परंपरेमध्ये हा सर्व खटाटोप पंडित लोकांच्याकडे दिलेला होता त्यांनी तो कितपत नीट पार पाडला हा एक आता मोठा प्रश्न आहे युरोशीयन परंपरेमध्ये श्रुतीमध्ये हे काम ब्राह्मण लोकांनी हातात घेतले खरे परंतु त्यांनी चक्क त्या आधारे एक धर्म निर्माण करून टाकला आणि प्रत्येक धर्म स्वतःच्या ताब्यात घेण्याचे व ताब्यात ठेवण्याचे टेकनिकच डेव्हलप केले पाश्चात्त्य देशांमध्ये असा उद्योग तिकडच्या धर्माधिकारी लोकांनी केलेला होता आणि जीजस बळकावला होता त्या विरोधात प्रोटेस्ट ठेवून प्रोटेस्टंट निर्माण झाले आपल्याकडे मात्रे अजूनही असे प्रोटेस्ट निर्माण झालेले नाहीत अपवाद फक्त बसवेश्वर गुरुनानक आणि महात्मा फुले हे शैवच आहेत युरेशियन धर्मांनी मात्र कायमच तडजोडी स्वीकारलेल्या दिसतात आणि ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य केलेले दिसते अलीकडेच कुंभमेळ्यावर ब्राह्मण धर्माने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो पण सरते शेवटी तो फसलेला दिसतो खुद्द अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांनी हर हर महादेव म्हणतच पवित्र स्नानाची डुबकी घेतलेली दिसते अशा प्रकारचे वर्चस्व पाश्चात्त्य देशांमध्ये धर्माधिकारी लोकांचे राहिलेले नाही साहजिकच तिथे वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक पॉप लिटरेचर अतिशय चांगल्या रीतीने निर्माण होते अर्थात तिथेही कधीकधी सपाट करण्याच्या नादामध्ये मूळ सिद्धांताला धक्का लागतो तेव्हा वाद निर्माण होतो

साहजिकच असे लोक निर्माण होणे योग्य की अयोग्य हा कायमच वाद आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात तो कायमच निर्माण होऊन राहिलेला आहे


युवाल हराळीचे स्कूल कुठले असा प्रश्न नेहमी मला अनेक लोक विचारत असतात माझे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे त्यासाठी आपणाला थोडे आईन्स्टाईन कडे जावे लागते उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन ची सापेक्षतेची थेरी नीट समजत नव्हती तेव्हा बर्ट्रांड रसेल ह्याने अतिशय सोप्या भाषेत ते समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषे स्पष्ट करण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला होता (एबीसी ऑफ रिलेटिविटी)आणि हा प्रयत्न यशस्वी झाला इतका की खुद्द आईन्स्टाईनने जगात फक्त तीनच लोकांना सापेक्षता कळलेली आहे आणि त्यातील एक रसेल आहेत असे सर्टिफिकेट दिले होते आणि तिथून पुढे लोकप्रिय वैज्ञानिक वाङ्मयाचे एक नवीन रसेल स्कूल निर्माण झाले हरारीचे पूर्वज निपजायला सुरुवात झाली याला मी रसेलियन पॉप लिटरेचर म्हणतो हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण मांडणी ठेवत असतात आणि त्याचबरोबर काही इन्साइटससुद्धा पुरवत असतात कारण मुळात ते स्वतः तत्त्वज्ञ असतात हरारी या स्कूलमध्ये येतो असे लोकांना गाभा समजावून सांगणारे काही सोफिस्ट लोक प्रत्येक पिढीमध्ये निर्माण होणे फार गरजेचे असते पाश्चात्त्य देशांमध्ये अशी परंपरा कायमच राहिलेली आहे आपल्याकडेही धार्मिक क्षेत्रात मोक्षिक क्षेत्रात अनेक कीर्तनकार हेच करत असतात मात्र आपल्याकडे अनेकदा मूळ गाभा अत्यंत भ्रष्ट होत जातो उदाहरणार्थ पुराणे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत किंवा वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तने आपण ऐकली तर आपणाला असे दिसते की संत तुकारामांच्या अभंगाची कधीकधी चांगली आणि कधीकधी टोकाची सोपी करण्याच्या नादामध्ये मनोरंजक विश्लेषणे झालेली आहेत विज्ञानामध्ये मात्र जितकी निर्मिती या अंगाने व्हायला हवी होती त्या अंगाने झालेली नाही त्यामुळे साहजिकच हरारीचे महत्त्व मराठीसाठी तरी प्रचंड आहे किंबहुना प्रत्येक ग्रंथालयामध्ये हा मनुष्य जाणे आवश्यक आहे कारण त्या निमित्ताने का होईना पण चौथी नवता ही भानगड काय आहे हे अधिकाधिक उलगडत जाण्याची शक्यता असते 


श्रीधर तिळवे नाईक


चौथ्या नवतेची दुसरी पिढी युवाल हरारी २


उत्तराधुनिकतेने धर्म पुन्हा केंद्रस्थानी आणायला मदत केली आणि चौथ्या नवतेमधल्या सर्व विचारवंतांना त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी पेलावी लागली हरारी याला अपवाद नाही 


माझी स्वतःची याबाबतीतले मांडण अशी होती की धर्माशी आणि धार्मिक कट्टरतेशी सामना करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी मोक्ष प्रमोट करावा लागेल धर्म हा धर्माला उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे धर्माला उत्तर द्यायचे असेल तर ते मोक्षानेच देता येते हरारीला मोक्ष उपलब्ध नाही हे त्याचे दुर्दैव किंवा असे म्हणू की झियोनिस्ट दुर्दैव ! साहजिकच तो पुन्हा एकदा ज्यू धर्माच्या सेकंड टेम्पल वार कडे जातो आणि पुढे मग झियानिजमिक राष्ट्रवाद कसा आहे हे सांगायला लागतो इतकेच नव्हे तर जू लोकांचा राष्ट्रवाद ज्यू लोकांना का नाकारला जातो असा प्रश्नही तो उपस्थित करतो ज्या भूमीवर ज्यू लोक क्लेम करतायेत तो क्लेम कसा ऐतिहासिक आहे हेही पटवण्याचा प्रयत्न करतो प्रश्न असा आहे की हे त्याला का करावे लागते? दुसरा प्रश्न असा आहे की हे हिंदुत्ववादी लोकांच्या सारखे आहे का ? म्हणजे ब्राह्मण धर्माला अलीकडे जो लोकांच्या सारखी स्वतंत्र राष्ट्राची आवश्यकता वाटायला लागलेली आहे ब्राह्मणे तर चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जर भारतात पसरली तर ब्राह्मण धर्माचे हकालपट्टी होणे अटळ आहे असे ब्राह्मण धर्मे लोकांना वाटते प्रत्यक्षात त्या तथ्य नाहीये परंतु त्यांना तसे वाटते हे मात्र खरे आहे म्हणूनच अधून मधून ब्राह्मणांसाठी स्वतंत्र राष्ट्र मागितले जाते प्रश्न असा आहे की ब्राह्मणांना स्वतःचा हा ब्राह्मण धर्म जो सरळ सरळ वंशवादी आणि वर्णवादी आहे टिकवावासा का वाटतो एवढे सगळे रामायण आणि महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा वारंवार मुस्लिम आणि इंग्रजांच्या कडून पराभूत झाल्यानंतर सुद्धा वर्ण व्यवस्थेचा हा दुराग्रह का सुटत नाही स्वतःला टॉपला ठेवण्याचा हा आग्रह का सुटत नाही हे खरे तर खरोखर अवघड होऊन बसलेले आहे एक प्रकारे हा एक वंशवाद आहे आणि तो जेनेटिकल नाहीये तर ज्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला ते ब्राह्मण अशा प्रकारच्या कट्टर व्याख्येतून तो आलेला आहे त्यात ब्राह्मण्यतरांचे स्थान हे कायमच दुय्यम राहणार हे उघड आहे पण आश्चर्यकारकरीत्या हे दुय्यम स्थान सुद्धा अनेकांना सुखकारक वाटते की काय अशी सद्यस्थिती आहे ज्यू लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाहीये कारण मुळात ज्यू च एक महाटोळी आहे अशी त्यांची धारणा आहे जिच्यात अनेक किमान 13 टोळ्या येतात असे त्यांना वाटते ज्यू आणि ब्राह्मण लोकांना आपण देवाकडून निवडले गेलेलो आहोत असे वाटत असतं ब्राह्मण स्वतःला त्यामुळेच बिनधास्तपणे भूदेव म्हणवून घेऊ शकतात खरे तर बौद्धिक पातळीचा विचार केला तर जितके क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन जीव लोकांचे आहे त्याच्या धड २% कॉन्ट्रीब्युशन सुद्धा ब्राह्मण धर्माला आणि ब्राह्मण लोकांना देता आलेले नाही याचे कारण त्यांची बुद्धी त्यांनी धर्मामध्ये वाया घालवली याउलट ज्यू लोकांनी आपली बुद्धी सायन्स व तंत्रज्ञानाकडे वळवून अनेक जागतिक दर्जाचे सायन्स आणि तंत्रज्ञानातले काम करून दाखवले आणि त्यामुळे ज्यू लोकांच्या बद्दल एक प्रचंड आदर सर्वत्र आहे अपवाद फक्त मुस्लिम लोक आहेत अशा प्रकारचे काम करून दाखवले तरी हिटलरला हे लोक शत्रू वाटावे शत्रु वाटावेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे सर्वात वाईट गोष्ट त्याचा अहंकार हा आर्य अहंकार होता आणि आश्चर्यकारकडी त्या ब्राह्मण लोकांना हा आरे असण्याचा अहंकार फार प्राचीन काळापासून आहे किंबहुना भारताला आर्यावर्त म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली होती ब्राह्मण असो किंवा रोमन कॅथोलिक असोत या दोघांच्याही मुळामध्ये मुळात युरेशियन मुळे आहेत आणि आश्चर्यकारकरीत्या ती अजूनही ऍक्टिव्ह आहेत की काय अशी मला शंका येत असते कारण हे दोघेही कायम स्वतःला वेगळे काढत असतात मुळसा ख्रिश्चन धर्म आर्यन ख्रिश्चन धर्म कसा काय बनला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा इतिहास आहे आणि त्यामध्ये रोमन अरे लोकांनी अत्यंत मेजर बजावलेला आहे असे असून सुद्धा आश्चर्यकार्यक रित्या हे दोन धर्म एकमेकाचे शत्रू होण्याऐवजी आता एकत्र येऊ बघतात याचे कारण हिटलरने स्वतःला आर्य वंशी म्हणून प्रमोट केले असले तरी स्वतःचा धर्म मात्र त्याने ख्रिश्चन असा सांगितलेला आहे तो खरंतर कितपत ऑथेंटीक आहे याविषयी मला शंका आहेत कळत नकळतपणे  प्रोटेस्टन्ट धर्मात त्यांच्या संस्थापकाचा म्हणजेच मार्टिन ल्युथर याचा जो धर्म होता त्यात जू लोकांचा जो द्वेष चालला होता तो द्वेष जर्मन परंपरेतून त्याच्याकडे चालत आलेला होता असे आता दिसते त्यासाठी लागणारे तर्कशास्त्र आर्य सिद्धांताने त्याला पुरवावे आणि हेच सिद्धांतन ब्राह्मणांना सुद्धा आपले वाटावे याहून शोकांतिका काय ? हरारी जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला हे सगळे डायनॅमिक्स किती कळलेले असते याबद्दल मला शंका आहेत साहजिकच हिटलरच्या सर्व कारवायांनी जीव लोकांच्या मध्ये ज्यू लोकांच्या मध्ये एक प्रकारे असुरक्षितता निर्माण केली आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या सर्वांसाठी आणि स्वतःच्या धर्माच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज भासायला लागली ही परिस्थिती आपण जर का हिटलरच्या काळात गेलो तर आपण नीट समजून घेऊ शकतो आणि ज्यू राष्ट्राला मान्यता ही देऊ शकतो त्यामुळे भारताचा इस्त्राईल या स्वतंत्र राष्ट्राला असलेला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा भारताने कायम स्वरूपात ठेवलाच पाहिजे कारण नैतिकदृष्ट्या तो योग्य आहे पुन्हा कोणी ज्यू विरोधात काही करणारच नाही याची कसलीही खात्री माणसाच्या संदर्भात देता येत नाही आता ही जी इनसिक्युरिटी आहे ज्यामधून इस्त्राईल तयार झाला त्याच्याबाबतीत ऑब्जेक्शन कोणाचे आले तर आश्चर्यकारक लिहिता हिटलर यातून सुटला आणि मुस्लिमांना आता इस्त्राईल नकोसे झाले आहे साहजिकच इस्त्रायल पासून मुस्लिम आणि मुस्लिमांच्या पासून इस्त्राईल आता इन सिक्युअर झालेले आहेत आणि त्यातूनच आत्ताच्या गाजा पट्टीचा प्रश्न आलेला आहे 

प्रश्न असा आहे की ब्राह्मण लोकांच्या मध्ये ही जी इन सक सिक्युरिटी आली आहे तिचे मूळ नेमके कशात आहे आणि  कुठून आली ?

 

वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जी प्रचंड ज्यू लोकांची हिंसा केली तशीच हिंसा काश्मीरमध्ये पंडित लोकांच्या वाट्याला आली त्यामुळे साहजिकच एक प्रचंड भय ब्राह्मण धर्मी लोकांच्या मध्ये निर्माण झालेले आहे साहजिकच आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावेच लागेल ही एक प्रखर जाणीव ज्या मागे खुद्द त्यांचे धार्मिक टेक्स्ट आहे सतत जो लोकांच्या मध्ये जशी  वाढत गेली आणि शेवटी इस्त्राईलची निर्मिती झाली  तसे काही भारतात झाले आहे का महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये अचानक ब्राह्मण लोकांच्यावर हल्ले झाले ते खरोखरच इतके तीव्र होते का की ज्यामुळे ही इन्सिक्युरिटी निर्माण व्हावी ? की ब्राह्मण लोकांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी लोक ते गप्प बसतील त्यांनी प्रतिकार करता कामा नये कारण ब्राह्मणाची हत्या करू नये असे ब्राह्मणांच्या धर्मात सांगितलेलेच आहे प्रत्यक्ष मध्ये ब्राह्मणे तर लोक हे पाळतात असे नाही त्यामुळे मग ही इन्सिक्युरिटी आली आहे का भारतातले ब्राह्मण लोक आणि त्यांचा ब्राह्मण धर्म हा अनेकदा ज्यू लोकांच्या धर्मासारखा आहे असे ब्राह्मण लोकांना वाटत असते आणि म्हणूनच त्यांना इस्त्राईलबद्दल आणि ज्यू धर्माबद्दल प्रेम वाटत असते त्यामुळेच हरारीच्या अनुवादाला आपल्याकडे अनेकदा हिंदुत्ववादी प्रचंड प्रमाणामध्ये उत्तेजन देताना दिसतात कारण शेवटी हरारी फिरून फिरून गंगावेस या म्हणीप्रमाणे ज्यू धर्माकडे परततो 


प्रश्न असा आहे की ज्यूधर्म हा काही आंतरराष्ट्रीय धर्म आहे का? तर नाही ! त्यामुळेच एकीकडे हरारी स्वतःची मांडणी आंतरराष्ट्रीय असे आहे असे मानतो आणि दुसरीकडे झियनिझमचे पूनरागमन झाले पाहिजे असेही म्हणतो चौथ्या नवतेत ही सक्ती झालेली आहे कारण शेवटी इस्लामला पर्याय म्हणून कोणता धर्म द्यायचा हा सर्वांच्या पुढेच प्रश्न ठाकला आहे आणि याचे कारण इस्लाम हा पसरत चाललेला आहे धर्म नाकारला की धर्म येत नाही अशी एक पुरोगामी समजूत होती त्या समजूतिला पूर्ण छेद इस्लामने दिलेला आहे आणि याचा दबाव युवाल हरारी वर आहे मला स्वतःला वैयक्तिक रित्या शैव धर्म निवडण्याची सक्ती झाली याचे कारण आत्ताची इस्लामने आणि ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली परिस्थिती आहे मी बौद्ध धर्म निवडण्याचाही प्रयत्न केला होता परंतु ते शक्य नाही हे माझ्या लक्षात आले विशेषतः भारतात तर ते अजिबात शक्य नाही पण जिथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे तिथे बौद्ध धर्माची शक्यता नाकारता येत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की आज ना उद्या चीनला बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल जापान ने तो आधीच स्वीकारलेला आहे भले त्यांनी त्याला झेन हे नाव दिले असेल याला पर्याय नाही कारण ब्रम्हांडाशी आणि निसर्गाशी नाते जोडणे हे माणसाला आवश्यक वाटते त्याची ती एक मूलभूत गरज आहे आणि ती अन्न आणि वस्त्र यांच्या इतकीच खोल आहे अशा वेळेला तुम्ही एक तर काल्पनिक नाते जोडू शकता किंवा खरे नाते जोडू शकता मोक्ष खरे नाते जोडतो धर्म काल्पनिक नाते जोडतो यापैकी काय निवडायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे याबाबतीत माझे म्हणणे असे की काल्पनिक नाते निवडायचे असेल तर निदान मग असा धर्म निवडावा जो अधिकाधिक शैक्षणिक दृष्ट्या ओपन असेल सहिष्णू असेल ज्याने पुरोगामी वाद पचवलेला असेल आणि भारतात असा धर्म शैव धर्म असल्याने मी शैव धर्माची निवड करतो आता कोणी त्याला हिंदूशैव म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही कारण टायटल पेक्षा माझा मुख्य भर हा आशयावर आहे 

हरारी याच्यापुढे असलेला पेच हा काँग्रेस पुढे असलेल्या हिंदू मुस्लिम प्रश्नासारखा आहे त्यामुळेच पाकिस्तान द्यायचे की नाही असा जो प्रश्न होता तसेच पॅलेस्टाईन द्यायचे की नाही असा हा प्रश्न आहे पॅलेस्टाईन नंतर आलेत आणि तरीही ते स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र क्लेम करतात हा क्लेम हिस्टॉरिकल आहे की नाही हा खरा मुद्दा आहे गमतीचा भाग असा आहे की सांगितले जाते ते सर्व दंतकथात्मक आहे धार्मिक आहे आणि ती श्रद्धा आहे असा मांडण केला जातो साहजिकच मग भारत पाकिस्तान युद्धासारखी ज्यू पॅलेस्टाईन युद्ध चालू राहणे अटळ आहे कारण मूळ भूमी आमची आहे अशी ज्यू लोकांची श्रद्धा आहे तर नंतर आलेल्या मुस्लिम लोकांनी आमची भूमि का मागावी आणि तीही एका दंतकथेच्या आधारे असा त्यांचा प्रश्न आहे वास्तविक इस्त्राईलसाठी स्वतंत्र राष्ट्र ही सुद्धा धार्मिक दंतकथा आहे तर प्रत्यक्षात देवाने असे प्रॉमिस दिले होते की नाही हे कोण ठरवणार ? शेवटी हा सारा खेळ श्रद्धेच्या प्रदेशात जातो आज ना उद्या हरारीला मोक्षाकडे वळावेच लागेल किंबहुना अलीकडे जू-धर्मामध्ये हादिस हा एक संप्रदाय कळत नकळत मोक्षाच्या दिशेने जातो की काय अशी शंका येणे इतपत वाटचाल करतो आहे त्यामुळे आज ना उद्या हरारी या दिशेने जाईल पण सध्या तरी तो ही धार्मिक चौकट घेतो आहे आणि त्या आधारे इस्त्राईलच्या काही गोष्टींना प्रमोट करतो आहे आणि काही ठिकाणी रिव्हॅल्युएशन मागतो आहे 

पुढे जाऊन मग अर्थातच टेररिझमच्या संदर्भात मांडणी करणे अटळ बनते उत्तर आधुनिकतेने दहशतवाद हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक प्रश्न म्हणून पाहिला पण चौथ्या नवतेमध्ये मात्र तो इतका झिरपला की तो वैयक्तिक आयुष्यात आला माझ्या बांधकाम चालू आहे या काव्यसंग्रहामध्ये यासंदर्भात अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि चॅनेल लव हॉरर अँड टेरर या काव्यसंग्रहात सुद्धा अनेक गोष्टी आलेल्या आहेतच वेगवेगळ्या प्रसिद्ध प्रकाशित काव्यसंग्रहात काही कविता आहेतच कारण चौथ्या नवतेमध्ये दहशतवाद ही फक्त धार्मिक गोष्ट राहत नाही तर मुळात ती वैयक्तिक होत जाते मोहम्मद अली जिना यांनी पुरोगामी दहशतवाद मांडलाा आयातुला खोमेनी यांनी उत्तराधुनिक दहशतवाद मांडला आणि आता अल कायद्याने चौथ्या नवतेचा दहशतवाद मांडलेला आहे यामध्ये सर्वात गाजलेला अमेरिकेवरचा ट्विन टॉवर अटॅक होता ज्याचे जगभर पडसाद उमटले आणि साहजिकच सर्वच विचारवंतांना त्याविषयी चर्चा करणे आवश्यक बनले माझ्या कव्हीं या काव्यसंग्रहात त्यामुळेच आयातुला खोमनी आणि ट्वीन टॉवर वरचा अटॅक या दोन्ही घटनांच्या वर कविता आहेत 

पुरोगामी दहशतवाद हा पुरोगामी राष्ट्र निर्माण करण्यासाठी केला जातो जिना यांची स्वतःची अशी खात्री होती की हिंदू हे अत्यंत मागासलेले असून ते पुरोगामी नाहीत उलट पुरोगामी वादाला इस्लाम हा जास्त पूरक आहे जी त्यांची गैरसमजुत होती अगदी अशाच प्रकारे धार्मिक तत्वावर आधारित आपणाला इस्रायली ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेले दिसेल बहुतांशी उत्तर आधुनिक विचारवंत हे ज्यू असल्यामुळे साहजिकच इस्त्राईलच्या निर्मितीला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला कारण त्यांची स्वतःची सिक्युरिटी त्यामध्ये होती हरारी ही याला अपवाद नाहीत परंतु कळत नकळत अमेरिका ही ज्यू लोकांची सेकंड ज्यू भूमी असल्यामुळे ती इस्त्रायलला नेहमी प्रोटेक्शन देत असते उत्तर आधुनिकता त्यामुळे नेहमीच ज्यू धर्माला पूरक राहिलेली दिसते भारतात ब्रााह्मण धर्माला अशा प्रकारचे प्रोटेक्शन क्षत्रिय वर्ण देतो अगदी वैचारिक पातळीवर सुद्धा सदानंद मोरे यांच्यासारखे लोक स्वतःला क्षत्रिय घोषित करून ब्राह्मण धर्माालाा व वर्णाला व्यवस्थित संरक्षण देत असतात या नात्यामुळे साहजिकच चौथ्या नवतेत शैव धर्माची पुन्हा एकदा नवीन मांडणी करायची वेळ आली आहे. त्याची पार्श्वभूमी अर्थातच पुरोगामी कालखंडामध्ये शैव धर्माने जे केले त्यात आहे ह्या कालखंडामध्ये मात्र शैव धर्म पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिलेला होता कारण त्यामागे बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराज संभाजी महाराज होळकर आणि महात्मा फुले यांचे अथक प्रयत्न होते हरारीला आधुनिकतेसंदर्भात असे काही करण्याची गरज भासली नाही त्याला ऑलरेडी आधुनिक आणि उत्तर आधुनिक ज्यू वारसा आहे त्यामुळे साहजिकच तो अधिक स्पष्टपणे चौथ्या नवतेची भूमिका खुलेपणाने मांडू शकतो मात्र बेसिक कडे जाण्याची गरज त्यालाही भासते 

मुळात जी भूमी एकेकाळी  डायनासोरची वस्तीस्थान होती ती आता पॅलेस्टाईन आणि ज्यू यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे अशी मांडणी करत तो पुढे सरकत असतो कारण त्याला हे आता हमास आणि इस्त्राईल यांच्यातील युद्ध संपुष्टात यावे असे वाटत असते कळत नकळत आत्ताचे वातावरण हे कट्टर धार्मिक आहे असे त्याला वाटत असते आणि तो काही मधला मार्ग काढता येईल का ते चाचपत असतो शांती प्रस्थापित कशी करता येईल ते चाचपत असतो प्रश्न असा आहे की संपूर्ण चौथ्या नवतेचाच हा लोच्या आहे काय? 

कारण एकीकडे कट्टर धार्मिक उन्माद आहे आणि दुसरीकडे नव्याने निर्माण झालेले चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान आहे यातील ज्यांना चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान निवडायचे आहे त्यांच्यापुढे जो पेच निर्माण होतो तो स्पेशल चौथा नवतेचा पेच आहे यावर एक उपाय म्हणून संपूर्ण नास्तिकता स्वीकारत धर्म संपूर्णपणे नाकारत पुढे जाता येते परंतु हे पुढे जाणे  नकळत इस्लामवादाला प्रोत्साहन देते जरा सर्वच धर्मावर चौफेर हल्ला झाला तरच हा धर्माविरोधात असलेला हल्ला यशस्वी होऊ शकतो पण आपल्याकडे काही अतिशहाणे पुरोगामी लोक सेक्युलर दृष्टिकोनातून मांडणी करताना इस्लामची बाजू मांडत बसतात आणि ते मांडताना अल्पसंख्यांक वादाला ते उत्तेजन देतात त्यांच्या अधिकारांना उत्तेजन देतात त्यामुळे हा मार्ग अंतिमता इस्लामच्या इस्लामीकरणाला पूरक ठरत जातो आणि यामुळेच अधिक सावळा गोंधळ वाढलेला आहे किंबहुना पुरोगामी लोकांची जी दिशा आणि दशा झालेली आहे ती यामुळे झालेली आहे लोकांचा पुरोगामी लोकांच्यावर विश्वास उरलेला नाही कारण ते इस्लामच्या मागे ठाम उभे आहेत अशी त्यांची समजूत आहे किंवा कदाचित लोकांचे बरोबर असलेले आकलन आहे पुरोगामी लोक हे सर्व काही स्पॉन्सर केलेले आहे असे म्हणून मखलाशी करत बसतात आणि सामान्य माणसं ही काहीतरी बिनडोक असतात आणि हिंदुत्ववाद्यांना ती मॅनेज करणे फार सोपे जाते वगैरे गैरसमजुती बाळगून आपला डिस्कोर्स रेटत असतात प्रत्यक्षात लोकांनाच इस्लामचे भय वाटत आहे हे यांच्या लक्षात येत नाही आणि हे भय त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेले असते याची ते साधी दखल सुद्धा घेत नाहीत त्यांना वाटते की गोळवलकरांची पुस्तके वाचून सामान्य माणूस बिथरला आहे 

इस्त्राईल बाबत असे काही होत नाही त्यामुळे एका अर्थाने हरारी काही गोष्टी साफ बघू शकतो मांडू शकतो एका अर्थाने चौथी नव्हता जितकी भारतामध्ये धर्मामुळे डागाळली जाते तितकी इस्त्राईलमध्ये डागाळली जात नाही आणि त्याचा फायदा कळत नकळत हरारीला मिळतो 

श्रीधर तिळवे नाईक

 चॅनेल ज्ञा 

तुझ्यासाठी लायक बनण्याची प्रक्रिया 

आणि तिचं प्रेशर 

प्रत्येक हाडावर 

तळमळीचा स्टॅमिना टिकवत 

मी धडपडतोय 

तुझ्या डोळ्यातील त्या होकाराला 

जो फक्त माझ्यासाठी असेल 


आयुष्याच्या अँप्युटेशनचे प्रयोग माझ्या फोकस्ड चालण्यात 

मुंबईचे आयझोमर्स सर्वत्र 

जाणार तरी कोठे ?

आयुष्य थोडंच पायमोजा आहे 

सुपरइम्पोझिशन एक सारखं असायला ?


बिल्डिंगा किंचाळत नाहीत आताशा 

कान पेनिट्रेट करणारी किंचाळी थाटून मॉडेलसारख्या बसतात 


मी हात उंचावतोय होकाराचा 

समोरचा नकार डाऊन करत 

शटर तोंडावर मारत 


"निदान घरात ऑफिस घेऊन येतो म्हणून भांडायला 

ऑफिस कमव"


मी जिथे जातो तिथे शून्य निर्विकारपणे हाकलले जाते 


ह्या देशाला मुमुक्षु फक्त आश्रमात हवेत 

ऑफिसमध्ये नकोत 


जुन्या गोष्टी निगुतीनं मरायच्या 

नव्या थेट युजलेस म्हणून फेकल्या जातात कचऱ्यात मरायला 

नव्या जागा ह्याही अशाच 

तात्कालिक कॉन्ट्रॅक्टवर कितीकाळ काम करणार 

आणि कचऱ्यात कितीवेळा जाणार ?


बुद्धिमान माणसं कुणालाच नको असतात ह्या देशात 

ज्याला त्याला दास हवेत 

सरंजामदारी मानसिकता 

आधुनिक कपड्यात 

कार्पोरेट फेफड्यात 


मी फाफडा खात खात फाफडतोय फाफलत 

कफल्लत 


घरी परतावंसं वाटत नाहीये मला 

पण रस्त्यावर थांबून तरी 

कोणता समुद्र कमावणार आहे ?

 

मी घरात शिरतोय फ्लॉप चेहरा घेऊन 


तुला वाटतंय 

मी बूट पुरेसे झिजवलेले नाहीत  


मी झिजलेले पाय तुला दाखवत नाही 

बुटात लपवतो 


श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

Saturday, June 9, 2018

श्रीवाहिनी हे फेसबुकवर सादर केलेले महाकाव्य संपले सोमवार ते रविवार अश्या सात दिवसातील घडामोडी न्यूज चॅनेल प्रमाणे सादर करत २० थिम्स हाताळणे असे त्याचे स्वरूप झाले होते हे ठरवून झाले न्हवते तर लिहिता लिहिता झाले होते एखादा लेखक एखाद्या संस्कृतीला पेलत नाही किंवा त्या संस्कृतीतील साहित्याचे ठेकेदार तो पेलू देत नाही म्हणून त्या लेखकाने थांबून चालत नाही त्याने आपले काम नीट करणे गरजेचे असते मराठीत दोन्ही बाजुंनी गोंधळ असतो स्वतःला कलावादी , संरचनावादी वा सहिंतावादी म्हणवणारे समीक्षक लेखकही केवळ निखळ संहिता वाचून मत बनवत नाहीत तर स्वतःचे हितसंबंध बघून मत बनवतात तर सामाजिक बांधिलकी मानणारे लेखक समीक्षक युरोपियन प्रबोधनाने स्पॉन्सर केलेल्या विचारप्रणालीत अद्यापही रांगत आणि रंगत असतात ह्यांच्या वैचारिक बाललीला ह्या प्रचंड बोर करतात अशावेळी चौथ्या नवतेला मिळणारा अल्प प्रतिसाद हा गृहीत धरावा लागतो . ज्या मोजक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचे आभार

ह्या महाकाव्यातील मुख्य  थिम्स पुढीलप्रमाणे होत्या

१ बातम्या देण्यापुर्वीची मानसिक हालचाल आरंभ
२ फेक न्यूज ,बाबरी मशीद, जाहीर रित्या घेतलेल्या चुंबनाचा वाद , ज्योतिषशास्त्र , बाबालोक व अनुयायी , लेखन आणि अभिनय व पोस्टमॉडर्निझम  या विषयावरील सात दिवसाच्या बातम्या
३ फॅशन आणि किचन
४ कॉलेज जगत आणि तरुणाईचे स्वगत
५ रुईया कॉलेजमधील रोमान्स
६ जे एस हॉल मधील रोमान्स
७ मीरारोड दहिसरमधील लिव्ह इन रिलेशनशिपमधील रोमान्स
८ स्पोर्ट्स
९ वर्किंग प्लेस
१० चौथी नवता
११ कविता आणि सॉंग्ज
१२ मार्क्सवादी व परिवर्तनवादी कार्यकर्त्याची सात स्वगते इंटिमेट इंटीलिजन्स
१३ मुंबईत चाललेली मोबाइलवरची संभाषणे आणि त्यांचा येणारा मोबाईला फील
१४इंटरनेट चॅटिंग
१५मुलाकात INTERVIEW
१६प्रार्थना
१७सिनेमा
१८स्वतःलाच फेस TO फेस करणे
१९मृत्युशय्येवरून सात स्वगते
२० थोडं अध्यात्मिक

ह्या थिम्स सात दिवसांच्या सातत्यात वावरत्या ठेवून १९९२ ते २००७ ह्या दरम्यानची मुंबई जालनगरी व तिच्यातील नागरी जीवन  पेलणे असे ह्या महाकाव्याचे स्वरूप होते असे आता दिसते ह्या संग्रहानंतर  २००७ नंतर माझे अनुभवविश्व पूर्ण बदलले आणि त्यातून थोड्या वेगळ्या कविता जन्मल्या ज्यांना मी नेट सिरीज मध्ये टाकले आहे.

माझा स्वतःचा आणि माझ्या साधनेचा भूतकाळ हा माझ्या लिखाणात विखुरला गेलेला असा अचानक पाहावा लागतो आणि हे मजेशीर असते माझे मित्र माझ्या ह्या कविता ज्या नेटाने टाईप करून वा संकलित करून इथे टाकतायत ते तारीफके काबील ! हे लोक नसते तर माझ्या ह्या कविता इतक्या सातत्याने फेसबुकवर दिसल्या नसत्या . ते मला गुरु मानत असले तरी मी त्यांना मित्र मानतो कारण माझा गुरु वैग्रे भानगडीवर विश्वास नाही . सुदैवाने ते भक्त नाहीत अन्यथा त्यांच्यापासूनही दूर जावे लागले असते . त्यांचे आभार !

अलीकडे मी फार कमी कविता लिहितोय कारण कवितेचा फ्लो थांबलाय क्वचित एखादेवेळी झिरपणी झिरपते . एकेकाळी आपण इतक्या भरभरून कविता लिहीत होतो हेच आता आश्चर्यकारक वाटते आणि साधकाचा टोकाचा एकांत तर त्याला जबाबदार नसावा ना असा प्रश्न पडतो . असो सर्वांचे पुन्हा आभार !

श्रीधर तिळवे नाईक 

Thursday, March 15, 2018


बांधकाम चालू आहे शेवटचा भाग 
श्रीधर तिळवे 
 तुझ्या भक्तांनी 
  तुझ्या नावाची एक वीट भिरकावून 
  मला कोर्टात  उभं केलंय 
  
  मी कर कटीवर ठेवून 
  कोर्टात  उभा 

 गांडीला पाय लावून 
 मी पळून जाणार नाही 
 मी माझ्या लाथेने 
आख्खी मराठी संस्कृति उडवून लावणार आहे 

 संताना  फुटबॉल येत नव्हता 
 आणि मी तर खानदानी फुटबॉल प्लेअर 

 विठ्ठला 
 भेटणारच असशील तर 
 सॉकरच्या  पावलांनी दारात ये 

 मी वीट फेकणार नाही 
 फुटबॉल फेकेन 
 आणि फुटबॉल म्हणजे 
 चालती पळती वीज 

 ये 
 कडाडून ये 

 एकमेकात खेळू एकमेकांशी खेळू 
 आणि विटेत अडकलेल्यांना 
 पळायला लावू 


 भक्तात अडकलेले देवा 
 जस्ट कीक 

 *******
घराच्या चार कोपऱ्यात आम्ही बसलोय 

पहिला नशेत आहे
त्याला सर्वत्र देव दिसतोय 

दुसरा ज्याला देव दिसतोय 
त्याला पाहतोय 
त्याला माहित आहे ही केवळ भक्तीची नशा आहे 

तिसरा मेडिटेशन करतोय 
त्याला वाटतंय कि फक्त मेडिटेशनच नशा उतरवू शकतं 

चौथा कविता लिहितोय 
आणि पाचवा चौघांना पाहतोय 

हे घर प्रसिद्धीची प्रार्थना करत नाही 
ही ह्या घराची जमेची बाजू आहे 

पहिल्याच्या डोळ्यात आता जंगलं दारू पितायत 

तिसऱ्याचं मेडिटेशन फरश्या पकडतंय 

दुसरा माणसाला निवारा लागतो 
तसा देवालाही लागतो का असा स्वतःलाच प्रश्न विचारतोय 

चौथा शब्दांची नखं काढतोय 
भाषेचा नकाशा मिळवण्याची ही प्राचीन रीत आहे 
अशी त्याची 
अंधश्रद्धा आहे 

पाचवा आकाशाचा टॉवेल गुंडाळून 
अंघोळीला चाललाय 

ज्ञ सोबतची शांतता स्पेशल चहासारखी असते 
कडक आणि गोड 

सूर्यप्रकाश काहीतरी डिस्टर्ब् झाल्यासारखा फकफकतोय 

तिच्या हाताचा नाजूकपणा पूर्वीसारखा निर्लज्ज होत नाहीये 
उलट बांगड्यांची किणकिण सावधानत तरंगतीये 

ह्या घराचा पाया भिंती छप्पर सर्वकाही भाड्यानं घेतलेलं आहे 

पहिला डोळ्यातून निघणाऱ्या गांडूळांना पहात बसलाय 

पाचवा कुंपणावर बसून सरड्यांची आंघोळ करतोय 

तिसरा दवबिंदूतला समुद्र शब्दाच्या ढगात बांधण्याची तयारी करतोय 

ज्ञच्या गळ्यातील बागा गुलाबाचं रॅपसॉन्ग गावं कि चाफ्याचं मौन पत्करावं 
ह्याचा विचार करतायत 

एक अनएंडींग गारठा फरशीवर पसरलाय 

हिवाळा डोअरबेल वाजवावी कि नाही म्हणून दाराबाहेर संभ्रमात 

चौथा पहिल्याला विचारतोय 
जे झालं ते व्हायला हवं होतं का ?

ज्ञ कर्टन टाकतीये कि लावतीये ?

माझं स्वातंत्र्य पुन्हा अस्तित्वात येतं आहे का 
कि ही नव्या हकालपट्टीची सुरवात आहे ?

हा ज्ञानोत्सर्ग कि रागस्फोट ?

ज्ञचं सौंदर्य अलीकडे जांभया द्यायला शिकलय 

खालच्या भाडेकरूंचे आवाज भांडण विणतायत 

पहिल्याचे ढग पाऊस पाडण्याऐवजी सावल्या पाडतायत 

तिसरा मेरू पर्वत गिळत श्वास घेतोय 

मुंबईतल्या सगळ्याच बिल्डिंगा हिमालयाकडे उडत गेल्या तर 

पुरुष बर्फासारखा असतो स्त्री पाण्यासारखी असते 
ईश्वर समुद्रासारखा  असतो वासना वाफेसारखी असते 
आयुष्य नदीसारखं असतं आणि संस्कृती प्रदूषणासारखी असते 

पहिला झाडं मोजतोय 
जणू झाडं मोजल्यानं जन्गल ताब्यात येणार आहे 

वीज तर कोसळली 
पण राख काय झालंय ते पाचही जणांना  कळत नाहीये 

सहाहीजण एकमेकाच्या नजरा चुकवत टीव्ही पाहतायत 










+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

घरमालक भाभीसाठी एक कविता 

" प्रॉपर्टी है तो आदमी आदमी हैं 

प्रॉपर्टी बिना आदमी जानवर हैं भाईजान 
ये फकिरीवकीरी छोडो 
और बम्बईमे पयले घर खरीद लो "

भाड्यासाठी घर मागायला गेलो कि ऐकू येणारा टिपिकल डायलॉग 

इस्लामिक चेहऱ्यावर 
मुसलमानांना संन्यास मान्य नसतो त्यामुळे ऐकू येणारा 
मी ऐकण्याच्या मनःस्थितीत 
आणि अनपेक्षित 

" फकिरा आदमी काय का लाडकी साथम तो घरगृहस्थी हाथमे "


मिडिएटर : हिंदू भाडा चलेगा ना 


चलेगा 


आपको मुस्लिम घर चलेगा ना ?आप बोले तो जांगीड में भी देख सकता हूँ 


मी आणि ज्ञ मरणघाईत हो म्हणतोय 

आणि तुझ्या चेहऱ्यावर संतोष आशुतोष पारितोष 

तोषोनि मज द्यावे घर दान हे 


आणि मग खळांची व्यकंटी सांडत आलेली केस 


मी मुस्लिम घरात राहतोय म्हणून मुसलमानच असणार 

म्हणून केसची वाढलेली इंटेन्सिटी 
"  श्रीधर भाई लढते रहो मैं घर छोडनेको नहीं बोलूंगी  खुदाकसम  "

एका वाक्यात महाकाव्य 

पूर्णविरामात श्वास जिद्द आणि ठामपणाची आग 

"ह्या घरात सुख दुःखाची अनेक पार्सल्स आली 

पण आमच्या संसाराचा टीनएज चेहरा कधी ढळला नाही 

कधी मॅच्युरिटीचे धबधबे एका तिलीपुढे  वाफ होऊन गेले 

तर कधी एका चांदणीने आकाशगंगेचा क्लायमेक्स दाखवला 
म्हणून हे घर मी विकत नाही भाईजान "

खरंतर हे घर विकावे असे प्रसंग तुझ्या दारात हत्ती झुलवतायत 

त्यांच्या डोकयात दारू आहे 
आणि तुला पायी द्यायला ते आतुर आहेत 
पण तू त्यांच्यापुढे स्तब्ध आणि ठाम 

आणि आता खळांची व्यंकटी सांडत माझ्या केसचा  हत्ती तुझ्या दारापुढे 

आणि तू मुक्ताबाईसारखी स्तब्ध 

धुक्यावर फोकस ठेवणं सोपं नसतं 

विशेषतः आयुष्याची कम्फर्टेबल गती वियर्ड झाल्यावर 

माझी फॅमिली साईट काळीठिक्कर पडलीये 

आणि तुझा गौर चेहरा तिची एकमेव आशा आहे 

वारा फ़ाटलाय 

आणि श्वास घराला डॉलसारखे उचलतायत 
ठेवतायत 

माझ्या काळजाचा बर्फ झालाय 

आणि तो मेणबत्तीसारखा जळत रक्ताचं मेण कमी करतोय 

घरातील भांडी  रोज भयानं काठोकाठ भरतायत 

आणि तुला वाटतंय कि मी मराठीचा मिर्झा गालीब आहे 

" भाईजान तो शायर हैं और उनकी बिविभी 

शायरीकाही कूच लफडा हुआ 
ये हिंदू लोग शायरको जीने नही  देते  "

" मुसलमान कौंसे देते हैं शायरी तक्लीफ देती हैं भाडा देता हैं ना बराबर "


तुझा अडोसपडोस संवाद 


एक तारखेला यायचं 

भाडं घेऊन जायचं 

ह्या केसनं तुझ्या घरात एक विहीर खणून ठेवलीये 

आणि मी आणि ज्ञ त्यात पडलोय 

माणसाला झोपायला एक ड्राय स्पॉट लागतो 

म्हणून तर हे घर 

" चार लोगोने फिल्डिंग लागाया तब ये घर बना "


विहिर बुजावी म्हणून तू रोज एक पर्वत विहिरीत टाकतीयेस 

मी त्यांची उशी करून झोपी जावं का ?

" आपकी बीवी किसी औरके प्यारमे गिरफ्तार 

शायर होके आप इतने अंधे कैसे "

" शायर हूँ इसीलिये अंधा हूँ भाभी 

इश्क हैं आज यहाँ कल वहाँ"

"आपकी बाते मेरी समझमे नही आती 

या तो आप उल्लू हो या सुफी हो "

तुझं घराचं घरगृहस्थीचं वास्तुशास्त्र पक्कं आहे 

आणि त्यात माझं फकिरीपण बसत नाहीये 

माणसांचं जग म्हणजे घरांची उपस्थिती 

आणि त्यातील पाहुण्यांचा उगम रहिवास आणि लय 

लोकांना आधीचे पाहुणे सतावतात 

म्हणून भूतं जन्म घेतात 
ही केस म्हणजेही भूत आहे 
एका पाहुण्याचं 

माझ्या घराचं पाणी तोडण्यात आलंय 

नद्या नळात आल्या कि पाणी तोडणं बंद होईल असं मला वाटलं होतं 
पण झालंय उलटं 

वजनशून्य दहशतीचा चेहरा पाण्याच्या अभावामुळे 

पुन्हा वजनदार झालाय 

दहशतीला शक्य असतं 

तर तिने समुद्र लॉक केला असता 

प्रकाशाच्या घड्या घालत फिरणारी ज्ञची हालचाल 

पाण्याअभावी कोळसा झालीये 

" मला पाणी हवंय "


गळ्यात कोरड उगवतीये मावळतीये 


माझी गदर पार्टी काहीच गॅदर करत नाहीये 


लोकांना घेऊन येते ती लोकल 

लोकांना गोळा करते ते लोकल 

हे लोकल लोकल पॉलिटिक्स आहे 


दहशतीत रोल निभावू इच्छिणारे 


आमच्याही स्थानिक शाखेने 

कवीला घाबरवण्यात 
योग्य तो वाटा उचलला 
हे सिद्ध करण्यासाठी चाललेलं 

आमच्या सर्वत्र शाखा आहेत


मराठीची मूळं नेमकी कशात शोधायची
सह्याद्रीत कि शाखांत ?

हवेचा सेपिया टोन माझे केस विंचरतोय 

कुठला डोअर क्लिक केला कि पाण्याची खिडकी उघडेल ?

"  भाईजान मुझपे प्रेशर डाला जा रहा हैं
आपको निकालनेकेलीये  "

तुझ्या आवाजात खरखर

"घराची बॉर्डर कापसापासून बनलेली असते
म्हणून तिच्यावर जास्त विसंबून राहू नको
आमच्या भक्तिवेदांत मध्ये ये आणि राहा "

माझा भक्तिवेदांती संन्यासी मित्र मला सल्ला देतोय
त्याला मी वैष्णव बनावं असं मनापासून वाटतं

मी कायमच हिरो पब्लिसिटी  टाळून
झिरो पब्लिसिटी चेहऱ्यावर मिरवली
आणि आता मीडियाकडे जाण्याचे उपाय चालून येतायत

" अरे ह्यांना कुणीतरी सांगा
मला फक्त पाणी हवंय "

माझी नजरेची वायर पाणी नसल्याने
मलूल झालीये

अनंताचा दरवाजा उघडत नसतो
सगळे दरवाजे कोसळतात
तेव्हा अनंत सर्वत्र असते

ते सर्वत्र आहे तर पाणी का धाडत नाही


" सब्र करो  भाईजान
अल्लाह आपके सब्रका इमतेहान ले रहा हैं "

" टेररीजम अल्लाहका इंम्तेहान हैं ? भाभी प पागल हो क्या "

ऑफिसर्स पाण्याचा क्ल्यू देत नाहीयेत

सापांचा ऑर्केस्ट्रा रोज एक नवी थेरी मांडतोय
शेजारधर्म पाळणाऱ्या गायी मला डिच करून निघून गेलेत
ज्ञचे मळलेले मफलर गॅम्बलर बनतायत

खेपा घालून घालून तिचे शब्द शिणलेत

ह्या मीरा रोडमधल्या सर्व बिल्डिंगा गुलामांनी बांधलेत काय ?

अख्खे शहर मी बॉटम अप करून पिऊन टाकावे काय 


तहानलेल्या माणसाला सर्वत्र फक्त पाणी दिसतं 


हातभर लाइफला गळाभर तहान 

एक तांब्या दान कुणी करेल का ?

काळजाचा ग्रॅनाईट बनलाय चीख 

नळाची टिकटिक कुणी ऐकवेल का ?

असे वाटे नदी  झाली  रिटायर 

माझ्या आतील फायर ती विझवेल  का ?

वॉटर कम्पॅनियन रद्दीत झाला जमा 

पाय तम्मा तम्मा करून दमले का ?

ज्ञ पाण्याअभावी भूत झालीये 

आणि पंचमहाभूतांना तिने पाठवलेला लिफाफा
रॉंग ऍड्रेस म्हणून परत आलाय

चिखलांना पंख फुटण्याएव्हढेही पाणी शिल्लक नाही

पाण्याचे आभास झोपेत तरंगतायत
आणि स्वप्नात नद्या रिझ्युम होतायत

पाण्याच्या मीटरच्या चाव्या कुणी चोरल्या ?

" भाईजान कही ऐसा तो नहीं कि आपके बीवीके यारने
ये सब किया हो ऊसपे इम्प्रेशन जमानेकेलिये
बादमे चाबी देगा
और ताला खोलेगा ?"

मी हे ऐकतोय
मी हे ऐकलं पाहिजे

बायको सांभाळता न आलेला मनुष्य

माझ्या अश्रूंच्यात डिमर फ्लिकरतोय
हे बरंच आहे कि अजून डोळ्यात पाणी शिल्लक आहे

नजर अंधेरी स्टेशनवर जाते
परतते

माझी सगळ्या बाजूनं ठासली गेलीये
आणि मी निराशेच्या कड्यावरून आत्महत्या करावी
असा आग्रह सार्वत्रिक आहे

मी आंब्याची झाडं मागतोय
आणि आयुष्य गवत डिपॉझिट करून
निघून चाललंय

लोकल्स मला चिरडायला तयार आहेत
त्यांनी तसा मेसेज मला कितीदातरी पाठवलाय

मेंदूत गेलेली केसची बुलेट
काळजात शिरलेला प्रेयसीच्या व्यभिचाराचा बाण
पाठीत घुसलेला मित्राचा सुरा
पायात घुसवलेली दहशितीची पायपीट
हातांवर रेंगाळणारी चणचणीची बोटं
आणि रक्तात पसरलेले कवितेचे विष

मी अस्ताला कधीच घाबरलो नाही
फक्त तो अस्त मोक्षात व्हावा
म्हणून प्राणांतिक धडपड करत राहिलो

पाणी येईलच
जाणार कुठं ?

पाणी चिल्लर आहे
ढग नोट आहे
पावसाळा ती सुट्टी करतो
आणि पाऊस पडतो

माणूस ते पाणी ताब्यात ठेवतो
आणि मग पाण्याच्या जीवावर
इतर माणसांशी खेळतो

खेळणारा कोण आहे ?

तू परेशान आहेस
मी परेशान आहे
ज्ञ परेशान आहे

जो जो खेळाडू वाटतोय
मी त्याच्याशी बोलतोय

तू  आकांतून बोलीतीयेस
" उसके बीवीका क्या दोष
उसने शायरी लिख्खी हैं क्या
बददुआ मत लो उसकी "

बददुआ , हाय , शाप
हे भारतात कधीकधी शार्प शूटरसारखं काम करतात

तुझी गोळी बरोबर लागलीये

एक माणूस दारात आलाय

" श्रीधर भाई आपको घर छोडना होगा
वैसेभी आपका क्या बचा हैं
जो मर्द  बचाना चाहता हैं
वही लूट चूका हैं आपका
कमसे कम बीवीको तो चैनसे जीने दो  "

मी स्तब्ध

सत्यापासून पळून जाणे माझ्या स्वभावात नाही

तो म्हणतोय ते खरं आहे

प्रार्थनेने भिरकावलेला दगड माझ्या डोळ्यावर आदळलाय
पण तो नेमका कुणाचा मला कळत नाहीये

तू बुरखा घालून निघून चाल्लीयेस

मी ओरडतोय
"   भाभीजी शुक्रिया  "

तू बुरखा काढून हसतीयेस
त्याच डोळ्यांनी
जे मला कायमच सांगत आलेत

"  प्रॉपर्टी है तो आदमी आदमी हैं 
प्रॉपर्टी बिना आदमी जानवर हैं भाईजान 
ये फकिरीवकीरी छोडो 
और बम्बईमे पयले घर खरीद लो   "

मी स्माईल देतोय
जे सांगतंय
" फकिरको फकीरही रहने दो   "

तुझी पाठ हे तुझं  शेवटचे दर्शन होतं


*****************************************************************************



















" "



  रहस्य 

  पश्चाताप नाही 
 आणि चूकही नाही 

  जे होतंय ते मी आपल्या आत दुरुस्तही करतोय 
  ह्या कविता दुरुस्तीही आहेत 
 आणि माझी तंदुरीस्तीही 

 ********


  कारण 
  
  समजुदारपणाची अपेक्षा नाहीये 
  
  घड्याळानेच काळ फोडला 
  आणि मोडका क्षण 
  तुझ्या काळजात सोडला 

  लांबणीवर टाकलेला नात्यांचा केऑस 
  गारुड आहे कि गरुड 

  भूतकाळाला  एक्सपायरी डेट नसतेच 
  त्यामुळे हा क्षण परत परत परतणार 
  आणि आयुष्याच्या सिनेमात इंटरवल करत राहणार 

  पूर्वग्रहांची वीज रक्तातच खेळतीये तुझ्या 
  लाल पेशींचा अनुवाद श्वेत पेशी असतो का ?
  
  पाऊस पडला 
  आणि निमोनिया झाला प्रेमाला 
  
  आपण दुसऱ्याच्या आयुष्यात अस्तित्वात नाही 
  हाच तर प्रेमभंगाचा पुरावा नव्हे ?
  
  टेहेळणी चालूच आहे तुझी 
  आणि मी नेमके तुला हवे असलेले शॉट देत 
  तुला हवा असलेला सिनेमा देतोय 
  
  खिडक्या सापेक्ष असतात तशी घरेही 

  तुझा आवाज फिका पडतोय 
  आणि किक मारतोय 

  कर्कशता हा आपला क्रायसीस आहे 
  तू स्वतःला पॅक करतीयेस कि पार्क करतीयेस ?
  
  मला दाराशी कोसळायचं नाहीये 
  म्हणून मी घर सोडून चाललोय 
  
    ******* 



  **** पुंढचे मागचे 
  

  पुढचे काही दिसत नाही 
  मागचे काही पाहावत नाही  
  
  ही केस म्हणजे पाण्याची सावली होती 
  कि आगीची बाहुली

  बासऱ्यांनी ड्रम वाजवले  हवा ताणवून 
  तबल्याने जलतरंग पिघळवले काचा बाणवून 

  माझ्यातील आध्यात्मिक मूलद्रव्य थोड्या थोड्या कणांनी हलके होतंय 
  तू बोट  चाटुन पळून चाललीयेस आजच्या ताज्या व्यभिचारात 
  तुझे पाय/ पलायनाच्या हिप्नॉटिझममध्ये 
  गोते खात फ्लॅश करतायत 
  झोपेचा कॅमेरा 
  फोटोजनीक सक्ससमधल्या सेक्सच्या कॉपी काढत 

  शांतीनगर 
  पारदर्शक दंगलबाजीतील दुःखाचे सल्फर बनवून 
  मला अर्पण करतय सफरिंगचे धडे 
  
  डेलिकेट चंद्राचे ऑफिशीअल अवर्स  - दहशतवादी 

   किरणांचे करंन्ट इवेंट लिहितायत कन्टी कन्टी  अमावस्या 
   एकांतातील लढ्याचा  फोकस मचूळ होऊन पडतोय - आकांतात 
   
   मला लोकांतात कन्फेशन देऊन 
   नॉइज वाढवायचा नाहीये 

  फक्त कविता लिहून 
  पुन्हा जन्मायचंय ह्या सडलेल्या रक्ताच्या गर्भाशयातून 

  मी उभा आहे ओरिजनल साऊंड ट्रॅकमध्ये 
  पुढे मरणाचे ब्लॅक होल 
  आणि मागून शब्दांनी 
  गांडीवर मारलेली शेवटची किक 
  
  वरती काय आहे माहीत नाही 
  खालती काय आहे दिसत नाही 

  मी कोसळत कोसळत स्वतःला जन्म देतोय 
  किंवा हे ब्लॅक होल त्याचा शेवटचा स्पेल 
  मला आऊट करण्यासाठी खर्च करतय 
  
  अलविदा दोस्त 
  अलविदा विठ्ठला 

  फक्त कोसळल्यानंतर 
  यदाकदाचित दोन पायावर उभा राहिलो 
  तर खाली तुझी वीट असू नये 
  एवढी विनंती 

  ******   

बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे  नाईक 

प्रश्न 
संदर्भ काय ? स्पष्टीकरण काय ?
आता काय आपण निबंध लिहायचा ह्या केसवर 
एकमेकाच्या त्वचेवर ?

तुझं काळीज शिफ्ट होतंय 
हे काय मला कळत नाहीये ?

इफेक्टिवली बोल स्लो बोल वा कर्कश बोल 
रिलेशनशिपला घोडा लागलाय 
हे  कळायला 
ती गाढव विरामचिन्हे हवीत कशाला ?

क्रोकरी फोडून घराची कॉपी थोडीच सुधारणारय ?

तुझी जीभ तू घरभर पसरून ठेवलीयेस 
आत्ता मी काढता  पाय घेऊ 
कि छताला लटकू ?
***

खाणे  
आपले घर उडते 
कधीपासून  सरपटायला लागले ?

मला दहशतीचे गँगरीन झालंय 
पण  मी अजूनही चालतोच आहे 

चाव्यांच्या स्फोट होऊन 
कुलुपे तुटतायत 
पण तुझा चेहरा 
मला अडकवून  आहे 

तू म्हणजे विकतच्या दुःखांचे बॅड कलेक्शन आहेस 

माझी डरकाळी वाढतीये 
आणि तू माझा चट्टामट्टा करून 
त्या डरकाळीत ढेकर देतीयेस 
***

ज्याने केस टाकली त्याच्यासाठी एक कविता 
ही माहिती मला एग्झोस्ट करण्याचा कट आखतीये 
आणि मी माहितीच्या ढुंगणावर लाथ मारून 
तिला हवी तशी पळवतोय 

मी आध्यात्मिक अबाधित 
कायम शून्यवत 
माहिती भरायला हरदम तय्यार 

लोकांना वाटतं कि मी पुराणकाळातला हिरो म्हणून जगतोय 
मला माहिती आहे कि 
मी सर्व पुराण्या  काळावर हगतोय 

अमक्या तमक्या एन्ड ना मी कधीच भीक घातली नाही 
मी आयुष्य फ्रेशर  म्हणूनच जगलो 

तुम्ही केस टाकली 
आणि मी पुन्हा एकदा फ्रेश झालो 

महेश लोहार धन्यवाद 
तुझ्या हस्तक्षेपाने माझी बोटे वाढली
***

१९९६
मी तिकडे पोलीस कारवाईत 
तुझा्या इकडे मित्राबरोबर रोमान्स 
हा डान्स आहे कि ट्रान्स ......कि स्टान्स ?

क्षितिज विस्तारले कि घटले ?
मी लक्ष्य होतो कि भक्ष्य ?

फ्रिक्वेन्सीचे स्पेलिंग चुकलय 
आणि आपण वेवलेन्थ जुळवण्यावर 
गप्पा मारतोय 

हेमंतने काय केले हा प्रश्न नाही 
त्याच्या वाढीची कुवत मर्यादित आहे 
प्रश्न आपण  का फांद्या कापतोय ?
केसचा इसेन्स काय ?
अत्तरे उडून  चालली  ?
मी तर सुगंधावर विश्वास ठेवला होता
***

इच्छा 
माझ्या 
कॉप्यावर कॉप्या कॉप्यांच्या कॉप्या 
ओरिजनल इतकी डाऊनमार्केट झालीये 
कि मला कुणी हिंग लावून विचारत नाही 

माझा शर्ट मारला गेलाय  
आणि माझ्या शरीराला 
माझा बटण्यात राहण्याची सजा 
फर्मा्वण्यात  आलीये 

मी बटवा होऊन चाललोय  
आणि माझ्या बटव्याच्या  आत पैसेच  नाहीत  

मला फर्स्ट डेटवर  जायचं होतं 
आणि लोक मला तिचे सिम्युलेटेड फोटो दाखवतायत 

साठमारी ते एलिफंटा केवज 
मला अकारण मी ज्याच्यावर  खराखुर्रा बसलो होतो 
तो हत्ती आठवतोय 

माझ्याच वाट्याला हा भगवटा का

विटेला विकण्याचा  मला हक्क नाही का ?
मला मुळात परतायचे नाही  मित्र हो 
मला सर्वत्र फळायचे आहे 
***
आपणाला फक्त भयभीत होण्याचं स्वातंत्र्य आहे 
आणि त्यांच्याजवळ फक्त घाबरवण्याची सत्ता आहे 

त्यांना ती लोकशाही मार्गाने खुद्द लोकांनी दिली आहे 

लोकांना भयभीत व्हायला आवडतं का 
कि लोकांना अजूनही राजकारणाचे महत्व कळत नाहीये ?

आणि ते फक्त घाबरवण्याचीच सत्ता कमावतात काय 
कि त्यांना ओरिजनल काही सुचतच नाहीये 

सत्ता हि फक्त लोकांचे इमिटेशन असते का 
जे कल्पनेच्याद्वारे कमावले जाते 
आणि दंडुकेशाहीच्या आधारे राबवले जाते 

सत्तेची ओरिजिनॅलिटी कुठे आहे 
कि ईश्वरच सत्तेचा स्पॉन्सर आहे किंवा बिग बँग 

विश्व म्हणजे सत्तेचा बिग बॅंग आहे का 
जो स्वतःच्या विस्ताराच्या मोहमायेत अडकून 
विस्तार नष्ट होईल म्हणून घाबरतो 

भयच सत्तेचे आदिकारण आहे कि काय ?

सत्ताधारी हेच तर सर्वाधिक भ्यालेले लोक नाहीत ना ?

महाकवीसाठी 
माझी प्रेयसी एक लवडेबाज आहे 
पण तुम्ही कसे एवढे च्युतिया निघालात ?

आधाराला आलो  होतो 
आणि तुम्ही पाण्याच्या धारेने 
आमचे नाते कापायचा  प्रयत्न केला 

आता काय तुमचं श्याट  ऍनॅलिसिस करू ?

ज्या केसांनी गळा कापला जातो 
ते वरती नव्हे 
खाली असतात 
एवढाच महाकवी  म्हणून मेसेज काय 

मी 'केस 'ला तोंड देत होतो 
पुढेही 
आणि मागेही 

श्रीधरला काहीच कळणार नाही 
असं  वाटण्याइतपत 
माझा चेहरा कधी मूर्ख झाला ?

माझे दुःख सर्वांनीच वाढवले 
तिने 
तुम्ही 
विठ्ठल भक्तांनी 
तरीही मी शाबूत आहे सर्वांगाने 
सर्व कोसळत असताना 

तुमच्या बायकोला तिने वारंवार  सांगूनही 
मी xxx  म्हणत  नाही 
xxx ताई म्हणतो 

मी शिव आहे 
तुम्ही शिवशक्ती समावेशन लिहित राहा 
काय आहे 
ज्यांचे अध्यात्म  'चकणाआहे 
त्यांच्या दारूलासुद्धा मी उभा रहात नाही
***


एका कुल गायसाठी कविता 
कुल कुल काय करतोयस 
आणि सुपरकुलने काय होणारय ?

सपाटपणा  लपवायला का हा एसी ?

कविता कायमच रिलेशनमध्ये असते 
म्हणूनच तिला टंचाईचे प्रश्न जाणवत नाहीत 

भूक कमवून जिने आतडे कमावले 
तिला उपासाचे काय भय ?
मान्यतेचा दुष्काळ माझ्यावर सतत पडेल 
म्हणून भीती काय दाखवतोयस ?

मी उपेक्षित कांडाचा शेवटचा अध्याय आहे 

आख्ख्या  मराठी संस्कृतीने वाळीत टाकले तरी 
मी कविता लिहीनेच लिहीन 

वाचक नसतील तर नसोत 

मला स्वतःच्या कविता वाचता येतात 
आणि मी स्वतःला दाद देऊ  शकतो 

शेवटी फायनली अंतिमतः 
मला स्वतःपर्यंतच पोहचायचे आहे 
***

योगायोगाने 
योगायोगाने फेकला गेलो 
योगायोगाने वाचला गेलो 
योगायोगाने दुखावणारा झालो 

मी चुकीच्या प्रसिद्धीने 
अस्तित्वात आलो 
चमकलो  

हळूहळू हे सगळं विरत जाईल 
आणि मी पुन्हा एकदा 
सर्वांना  फाट्यावर मारणारा कवी  होईन 
***

ते 

घाबरलेले सर्व एक होतील 
आणि म्हणतील 
ते धाडसी होते 
आणि कवीच फक्त घाबरलेला होता 

बहुमत घाबरलेल्यांचे आहे 
आणि ते 
'जो धाडसी आहे '
त्याला बहुमताच्या जीवावर 
'घाबरलेला ' ठरवू शकतात 

काय करशील ?
निधड्या छातीने  विठ्ठलाविरुद्ध लिहिशील ?
कि विठ्ठलापासून  पळून जाशील ?

कुणाच्या गांडीत दम आहे 
आणि कोण गांडीला पाय लावून पळाला 
हे सर्वांच्या पुढल्या लेखणावरून सिद्ध होईल 

तेव्हा लेखनात धाडस पसर 
आणि ते कधीतरी पब्लिकमध्ये उगवेल   
म्हणून वाट बघ 

शेवटी  लेखनाइतकं पारदर्शक  काहीच नसतं 
विठ्ठल टिको ना टिको 
लेखनाची  वीट मजबूत राख 
***

मला पुरु पाहणाऱ्यांनो 
बुद्धी आणि विवेकाचे दफ्तर फेकून 
अंधश्रद्धेच्या एस्केपिस्ट शाळेत स्वतःहून  दाखल  होतायत 
नवे विध्यार्थी 

स्पर्धेची ऑफर झेपणारे 
कमर्शियलच्या प्रकाशाने  दीपणारे  
डोळ्यातील अंधारात जादूच्या अभंग आवाजाने झोपणारे 
हे नवे भक्त 

त्यांना कळून चुकलय कि 
विठ्ठल हा आत्ता  काळे युग बनलाय 
त्याच्या विटेतील वीज 
बरखास्त झालीये 

तरीही हेतुपूर्वक दिण्डी चालवत  
मंडीपासून पळत 
अभंगांनी बाजाराचा आलेला कंटाळा झटकत 
ते चालतायत 

त्यांना  ग्राहक बनण्यापासून पळायचे आहे 
आणि हे मार्केट त्यांना पुन्हा पुन्हा 
स्वतःच्या बांधकामात दाखल करतय 

ग्यानबा तुकारामाची  प्रॉमिस्ड लॅण्ड 
सेंद्रिय शेतीच्या लायकीची राहिलेली नाही 
ती चिन्ह सृष्टीची फर्टिलायझर्स खाऊन खाऊन 
थकत  चाललीये 

मुळात परतून थोडीच झाडे सुधारता  येतात ?
नीती कळाली म्हणून नियती टाळता येते ?

टेन्शनची रिस्क घेत 
मी लिहितोय विठ्ठलाच्या अगेन्स्ट जाणारी ही कविता 

आषाढाचा  क्युरेटर माझ्या वाट्याला नाही 
वैकुंठाचा फायनान्सर माझ्या खिश्याला नाही 

बाजार मेला तरी बाजार जिवंत  राहतो 
विठ्ठल वारला तरी विठ्ठल  जिवंत  राहतो 

दोघेही अमर्त्य आहेत 
कि एकाच शवाच्या दोन बाजू आहेत ?
विठ्ठल ही निगेटीव पॉसिबिलीटी आहे का ?
विठ्ठल हे  मनाचे अमर्याद कंझम्सशन आहे का ?
टाळातं ग्लोबल वोर्मिंग वाजत नाही  
पुण्य कमावणारी क्षणभंगुर शांतता वाजते 

मला  कळत नाहीये कि 
मी ह्या व्हायोलंट प्रोलिफरेशनमध्ये 
पुन्हा  पुन्हा का भटकतोय ?

तुकारामाची कंटिन्यूटी  ही सूज आहे कि वाढ ?
ही सिनीकल रॅशनॅलिटी 
कि माझा स्पिरिच्युअल कोलॅप्स ?
ही परिस्थिती आहे 
कि मी इमॅजिन  केलेली  भोवतालची स्थिती ?

वारकरी पंथ  मेला तरी भक्ती  मरेल काय ?

माहितीचे प्रवाह आणि सेल्फिश कोऑपरेशन  
ह्यांच्यातून चालत  
कुठं चाललय माझं ग्लोबल पझेशन ?



मी खोलवरात दुखावला गेलोय 
कल्चरल जॅमर्सकडून 
माझ्या काळजाचा बटाटा बटाटा झालाय 
रक्ताची अटीट्युड बॉसल राहिलेली नाहीये 
तिला सर्विस सेक्टरचे  नेट्वर्कल दांडगे 
रप्चरल धक्के मारतायत 

माझ्या लेखणीची पोझिशन  
मी कधीच कलरफूल विदूषकांनी  भरली नाही 
माझा विनोदही बुद्धाचा होता 
आणि हास्य निर्वाणाची तपस्या 

कविता कळलेले  लोक 
माझ्याविरोधात कॅम्पेन  चालवतायत 
म्हणून  मी माझा थोडाच 
कॅम्प बनवू ?

मी जमावांचा प्रोग्रामर असलो तरी
जमावाचा प्रोग्राम नाही 

तुमचा कुल बार्बारिझम 
ह्या काळाचा पर्मनन्ट मौसम झाला म्हणून 
मी थोडाच फळे द्यायचा  थांबणार आहे ?
मला पुरु पाहणाऱ्यांनो 
मी तो  आहे 
ज्याचे हात 
पुरून उरतात
***

जिद्द 
कविताच लिहिली होती 
आणि पुन्हा कविताच लिहिणार आहे 

हात वाळलाय पण जिवंत आहे 
बोटे कापली गेलेत 
पण नवी पालवीही फुटतीये 

पाय दमलेत 
पण त्यांना माहित आहे कि 
ही केस म्हणजे काही शेवटचा माईलस्टोन नव्हे 

श्वास कोंडला  गेलाय 
पण हवेचं आमंत्रण अद्याप शाबूत आहे 

मी येणार आहे 
आणि पुन्हा कविताच लिहिणार आहे 
***